शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचे पुन्हा थैमान; रब्बी पिकांच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 20:06 IST

नुकसानीचे पंचनामा करण्याची शेतकऱ्यांची मागणी

ठळक मुद्देमोसंबी ,संत्री पिकाला मोठे नुकसान शेतकऱ्यांना मोठा फटका

पैठण - पैठण शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी दोन दिवसा नंतर आज पुन्हा   जोरदार अवकाळी पावसाने फटका दिला.  पैठण शहरात सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान पावसास सुरवात झाली सुमारे अर्धा तास पाऊस सुरू होता. उकाड्यामुळे हैराण झालेल्या पैठण शहरातील नागरिकांना या पावसामुळे एकीकडे दिलासा मिळाला आहे. तर, दुसरीकडे रब्बीच्या पिकांचे शेतात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला . शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा अशी मागणी होत आहे.

 पैठण शहर व परिसरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. अखेर, सायंकाळी साडेपाच च्या सुमारास पावसाला सुरवात झाली.  शहरात वारा, वीजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला तालुक्यातील जायकवाडी, पिंपळवाडी, कडेठान, पाचोड , वडवाळी, नांदर, दावरवाडी, टाकळी अंबड, विहामांडवा आदी परिसरात रिमझीम पाऊस बरसल्या नंतर थांबला. पावसाचे हलके आगमन झाल्याने परिसरातील शेतकरी जोरदार पावसाच्या भितीने धास्तावला होता.

पैठण परिसर व तालुक्यातील नांदर डेरा कोंदर दावरवाडी   परिसरात बुधवारी झालेल्या पावसामुळे गहू, व उन्हाळी ज्वारीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. वारा आणि गारांमुळे नांदर परिसरातील आंब्याचा मोहरदेखील गळून पडला.  मेथी, पालक, टोमॅटो, झेंडूचे देखील मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी तलाठी यांनी केली आहे ; परंतु प्रशासनाचे आदेश नसल्याने पंचनामे करण्यास असमर्थता तलाठ्यानी व्यक्त केली.

पिके अजून शेतात.....सध्या सर्वत्र रब्बी हंगामाची सोंगणी अंतिम टप्यात आलेली आहे. या परिस्थितीत  ‘कोरोना’ च्या संकटाने मजुर सोंगणीला नेता येत नाहीत. मजुर देखील यायला तयार नाहीत, त्यात हार्वेस्टर यंत्रचालकही  पिकाच्या काढणीला तयार होत नसल्याने शेतात अजुनही  पिके उभे आहेत. त्यामुळे एक-दोन मजुरांच्या सहायाने शेतकऱ्याची सोंगणी सुरू आहे. मात्र,  अवकाळी पाऊसाने या कामावरही गदा आणली आहे.दोन दिवसाच्या पावसाने 

शेतकऱ्यांना मोठा फटका......बुधवारी झालेल्या गारपीट व पावसाने नांदर शिवारात  फळबागा सह सोंगून ठेवलेली ज्वारी, उन्हाळी बाजरी, गहू पिकाचे नुकसान झाले. मोसंबी व संत्र्याचेही नुकसान झाले .परवाच्या पावसाने हाता तोंडाशी आलेले संत्र्याचे पीक वादळी वाऱ्यामुळे गळून पडले असून, काही संत्र्याची झाडे उन्मळून पडली असे नांदर येथील शेतकरी दिनकर सुखदेव सोनवने यांनी सांगितले. शेवग्याची शेती करणारे शेतकरी राजेंद्र गवारे यांची गट न.२१० मध्ये दिड हजार शेवग्याची   झाडे होती. परंतु, या बेमोसमी पावसामुळे शेवग्याच्या बगीच्याचे मोठे नुकसान झाले असून १५००पैकी जवळपास  सहाशे झाडे मोडून पडली.  अर्जुन काळे, बाळासाहेब खुळे, भास्कर सोनवने आदी शेतकऱ्यांनी गहू व उन्हाळी बाजरीचे नुकसान झाल्याचे सांगितले

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी