शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

तण वाढ नाही, पाणीही लागते कमी; शेतकऱ्यांसाठी मल्चिंग पेपर ठरतोय उत्पन्न वाढीसाठी वरदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 20:17 IST

पारंपरिक शेती केल्याने शेतीतून उत्पन्न कमी आणि कष्ट आणि खर्च जास्त होत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आधुनिक शेती करण्याकडे वळले आहेत.

- सोपान कोठाळेकेळगाव : सिल्लोड तालुक्यातील केळगाव परिसरातील अनेक शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. भाजीपाल्यासह इतर पिकांसाठी शेतकरी मल्चिंग पेपरचा वापर करत असून या पेपरमुळे जमिनीत तणाची वाढ होत नसून पिकांसाठी पाणीदेखील कमी लागत आहे. परिणामी, हा पेपर शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.

पारंपरिक शेती केल्याने शेतीतून उत्पन्न कमी आणि कष्ट आणि खर्च जास्त होत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आधुनिक शेती करण्याकडे वळले आहेत. शेतात तण वाढू नये, पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये, त्यासाठी पाणी कमी लागावे, पिकाचे संरक्षण व्हावे, शेतीतून अधिक उत्पन्न मिळावे, याकरिता सद्य:स्थितीत शेतकरी अनेक उपाययोजना करताना दिसून येत आहेत. केळगावसह आमठाणा, शिंदेफळ परिसरातील शेतकरी मिरची, कापूस यासारख्या पिकाला संरक्षण मिळावे म्हणून मल्चिंग पेपरचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. याशिवाय या पेपरमुळे तापमान आणि आर्द्रतेवर नियंत्रण राहत असल्याने पीक वाढीला मोठा फायदा होतो. अधिक पाऊस झाला तरी त्याचा फारसा परिणाम या पिकावर होत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या पेपरची मागणी बाजारात वाढताना दिसत आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे पाण्याची कमतरता शेतकऱ्यांना भासत असते. त्यामुळे अनेक शेतकरी या पेपरचा पिकासाठी वापर करत आहेत.

मल्चिंग पेपरचे बंडल मिळते चौदाशे रुपयांनामल्चिंग पेपरच्या एका बंडलची किमत बाजारात १ हजार ४०० रुपये असून त्याचा वापर मिरचीच्या एक हजार रोपांसाठी केला जातो. या रोपासाठी पाच गुंठे शेती लागते. हा पेपर महाग जरी असला तरी मिरचीचे उत्पन्न वाढत असल्याने ते खरेदी करण्यास शेतकऱ्यांना परवडत आहे.

पिकाची उगवण्याची क्षमता चांगलीमल्चिंग पेपरमुळे पिकातील खुरपणीच्या खर्चात मोठी बचत असून त्याला हाताने खत टाकण्याची गरज नसते. यामुळे मजुरी खर्च वाढतो. या पेपरमुळे ड्रीपद्वारे पिकास खत सोडण्यास सोपे जात असून खर्चाची बचत होते. पिकाची उगवण्याची क्षमता चांगली असते.- सागर पंडित, शेतकरी, शिंदेफळ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र