शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

"पाणी नाही, पाहुण्यांनो येऊ नका";गोकुळनगरवासीयांनी नातेवाईकांना कळविला संदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 17:41 IST

संपूर्ण वसाहत टँकरवर अवलंबून

औरंगाबाद : चार ते पाच  दिवसांनी टँकर येते. त्यात एक ड्रम पाणी मिळते. अधिकचे पैसे मोजूनही नंतर पाणी मिळत नाही. एका ड्रमातूनच काटकसरीने पिण्यासाठी व सांडपाण्यासाठी वापर करावा लागतो. पाणीटंचाई लक्षात घेता उन्हाळ्याच्या सुटीत कोणी येऊ नये, असे आम्ही नातेवाईकांना कळविले आहे, असे गोकुळनगरवासीयांनी सांगितले. या ‘वाक्यातूनच’ शहरात पाण्याची किती भीषण परिस्थिती आहे हे दिसून येते.

जाधववाडी परिसरातील सुरेवाडीतील अखेरच्या तीन गल्ल्या, तसेच गोकुळनगर, घृष्णेश्वरनगर, वसंतनगर, छत्रपती कॉलनी, भक्तीनगर, व्यंकटेशनगर या सुमारे १२०० लोकांची वसाहत संपूर्णपणे टँकरवर अवलंबून आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत असूनही मागील १४ ते १५ वर्षांपासून या परिसरात पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली नाही. परिसरातील लोकांनी बोअर घेतले आहेत. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस पाणी अटत असते. मात्र, यंदा जानेवारी महिन्यातच येथील बहुतांश बोअरचे पाणी अटले. सुरुवातीला एक दोन महिने सुरेवाडीतील नागरिकांनी नळाचे पाणी भरू दिले, पण त्यांनाच पाणी कमी पडू लागल्याने त्यांनी पाणी देणे बंद केले. यामुळे आता येथील रहिवाशांची संपूर्ण भिस्त टँकरवरच आहे.

गोकुळनगरातील रहिवासी ज्योती जैस्वाल यांनी सांगितले की, प्रत्येक गल्लीतील २० घरांनी मिळून एक टँकर लावले आहे. तीन महिन्याला प्रत्येक जण ११६० रुपये देतो तेव्हा दर चार दिवसांनी मनपाचे टँकर येते. एक ड्रम भरून दिला जातो. मात्र, आता तीन महिन्यांऐवजी प्रत्येक महिन्याला ५०० रुपये घेतले जात आहेत. दुसरा ड्रम भरण्यासाठी ५० रुपये अधिकचे द्यावे लागत आहेत. याशिवाय पाणी कमी पडले तर अधूनमधून २ हजार लिटरचे खाजगी टँकर ५०० रुपये देऊन आणावे लागत आहे. कैलास जाधव यांनी सांगितले की, पाणीटंचाईमुळे नातेवाईकांना उन्हाळ्याच्या सुटीत येऊ नका, असे कळविले आहे.  नगरसेवक सीताराम सुरे यांनी सांगितले की, गोकुळनगर व आसपासच्या कॉलनीत १२०० लोकांची वसाहत आहे. तेथे पाईपलाईन टाकण्यात यावी, असा प्रस्ताव मनपाकडे अनेकदा दिला, पण तो मंजूर होत नाही.

जलवाहिनीची प्रतीक्षा विशाल जगधने म्हणाले की, गोकुळनगर परिसरातील नागरिक मागील १४ वर्षांपासून पाईपलाईनची प्रतीक्षा करीत आहोत. मनपाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका येथील रहिवाशांना बसत आहे. 

टॅग्स :WaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद