शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

"पाणी नाही, पाहुण्यांनो येऊ नका";गोकुळनगरवासीयांनी नातेवाईकांना कळविला संदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 17:41 IST

संपूर्ण वसाहत टँकरवर अवलंबून

औरंगाबाद : चार ते पाच  दिवसांनी टँकर येते. त्यात एक ड्रम पाणी मिळते. अधिकचे पैसे मोजूनही नंतर पाणी मिळत नाही. एका ड्रमातूनच काटकसरीने पिण्यासाठी व सांडपाण्यासाठी वापर करावा लागतो. पाणीटंचाई लक्षात घेता उन्हाळ्याच्या सुटीत कोणी येऊ नये, असे आम्ही नातेवाईकांना कळविले आहे, असे गोकुळनगरवासीयांनी सांगितले. या ‘वाक्यातूनच’ शहरात पाण्याची किती भीषण परिस्थिती आहे हे दिसून येते.

जाधववाडी परिसरातील सुरेवाडीतील अखेरच्या तीन गल्ल्या, तसेच गोकुळनगर, घृष्णेश्वरनगर, वसंतनगर, छत्रपती कॉलनी, भक्तीनगर, व्यंकटेशनगर या सुमारे १२०० लोकांची वसाहत संपूर्णपणे टँकरवर अवलंबून आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत असूनही मागील १४ ते १५ वर्षांपासून या परिसरात पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली नाही. परिसरातील लोकांनी बोअर घेतले आहेत. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस पाणी अटत असते. मात्र, यंदा जानेवारी महिन्यातच येथील बहुतांश बोअरचे पाणी अटले. सुरुवातीला एक दोन महिने सुरेवाडीतील नागरिकांनी नळाचे पाणी भरू दिले, पण त्यांनाच पाणी कमी पडू लागल्याने त्यांनी पाणी देणे बंद केले. यामुळे आता येथील रहिवाशांची संपूर्ण भिस्त टँकरवरच आहे.

गोकुळनगरातील रहिवासी ज्योती जैस्वाल यांनी सांगितले की, प्रत्येक गल्लीतील २० घरांनी मिळून एक टँकर लावले आहे. तीन महिन्याला प्रत्येक जण ११६० रुपये देतो तेव्हा दर चार दिवसांनी मनपाचे टँकर येते. एक ड्रम भरून दिला जातो. मात्र, आता तीन महिन्यांऐवजी प्रत्येक महिन्याला ५०० रुपये घेतले जात आहेत. दुसरा ड्रम भरण्यासाठी ५० रुपये अधिकचे द्यावे लागत आहेत. याशिवाय पाणी कमी पडले तर अधूनमधून २ हजार लिटरचे खाजगी टँकर ५०० रुपये देऊन आणावे लागत आहे. कैलास जाधव यांनी सांगितले की, पाणीटंचाईमुळे नातेवाईकांना उन्हाळ्याच्या सुटीत येऊ नका, असे कळविले आहे.  नगरसेवक सीताराम सुरे यांनी सांगितले की, गोकुळनगर व आसपासच्या कॉलनीत १२०० लोकांची वसाहत आहे. तेथे पाईपलाईन टाकण्यात यावी, असा प्रस्ताव मनपाकडे अनेकदा दिला, पण तो मंजूर होत नाही.

जलवाहिनीची प्रतीक्षा विशाल जगधने म्हणाले की, गोकुळनगर परिसरातील नागरिक मागील १४ वर्षांपासून पाईपलाईनची प्रतीक्षा करीत आहोत. मनपाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका येथील रहिवाशांना बसत आहे. 

टॅग्स :WaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद