शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वाळूच्या ठेक्याला मुहूर्त ठरेना: अवैध उपसा काही थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 19:10 IST

नवीन नियमानुसार जिल्हास्तरीय समितीची बैठक तीन महिन्यांतून तर तालुका समितीला दोन महिन्यांतून एकदा बैठक घेण्याची तरतूद होती; परंतु कोरोनामुळे बैठकच झाली नाही.

ठळक मुद्दे सध्या जिल्ह्यात कुठेही वाळूउपसा होत नाही, तरीही चोरट्या मार्गाने वाळू शहरात आणली जातेचितेगाव परिसरात अवैध उत्खनन

औरंगाबाद : नवीन नियमानुसार वाळू ठेक्यांच्या उत्खननाचा कालावधी पाच वर्षांसाठी केला; परंतु अंमलबजावणी होण्यापूर्वीच कोरोनाचे संकट आल्यामुळे शासनाच्या महसुलाला फटका बसला. ठेक्याला ठेंगा दाखवीत चोरट्या मार्गाने वाळूचा उपसा सुरूच असून लॉकडाऊनच्या काळातही महसूल विभागाला वाळू जप्त करण्याच्या कराव्या लागल्या. 

नवीन नियमानुसार जिल्हास्तरीय समितीची बैठक तीन महिन्यांतून तर तालुका समितीला दोन महिन्यांतून एकदा बैठक घेण्याची तरतूद होती; परंतु कोरोनामुळे बैठकच झाली नाही. या धोरणानुसार वाळूघाटांचे लिलाव जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात आहेत. यातून ग्रामपंचायतींना उत्पन्न मिळणार आहे; परंतु समितीची बैठकच न झाल्याने सर्व काही रखडले. 

नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ मध्ये वाळूठेका निश्चिती, वाळू उत्खननाची प्रक्रिया व किंमत निश्चित करण्यासाठी  नियमावली तयार केली. त्याचीही अंमलबजावणी झाली नाही.  सध्या जिल्ह्यात कुठेही वाळूउपसा होत नाही, तरीही चोरट्या मार्गाने वाळू शहरात आणली जात आहे. अनेक ठिकाणी अवैधरीत्या वाळूचे साठे केले जात असून तेथून वाळूची विक्री होते. समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, जि.प. सीईओ, पोलीस अधीक्षक, अपर जिल्हाधिकारी, सार्वजिनक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आदी सदस्य, तर जिल्हा खनिकर्म अधिकारी सदस्य सचिव पदावर राहतील. तालुकास्तरीय वाळू सनियंत्रण समितीही स्थापण होाईल.

चितेगाव परिसरात अवैध उत्खननतालुक्यातील चितेगाव तांडा नं. २ येथे अवैध मुरूम उत्खननामुळे डोंगर पोखरला जात आहे. त्यामुळे  ग्रामस्थांना गावातील मुख्य रस्त्यावर ये-जा करताना अडचण येत आहे.  प्रशासनाची परवानगी न घेता उत्खनन चालू असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. मागील काही वर्षांपासून अवैध उत्खनन होत असून, यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या प्रकरणाची माहिती तलाठी, तहसीलदारांना ग्रामस्थांनी तक्राररूपाने दिली; परंतु यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. प्रशासनाने अवैध उत्खननाला आळा घालावा, अशी मागणी होत आहे.  

टॅग्स :sandवाळूAurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद