शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

कुठलेही शास्त्र शाश्वत नसते - अशोक वाजपेयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:35 AM

कुठलेच शास्त्र शाश्वत स्वरूपाचे नसते काळानुसार त्यात बदल घडत असतो. शास्त्राची निर्मिती प्रयोगातून होते. प्रयोग हे शास्त्राच्या आधी आणि नंतरही घडत असतात हा सर्जनात्मक अधिकार जाणकारांनी समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन विख्यात विचारवंत व लेखक अशोक वाजपेयी यांनी केले.

मल्हारीकांत देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कुठलेच शास्त्र शाश्वत स्वरूपाचे नसते काळानुसार त्यात बदल घडत असतो. शास्त्राची निर्मिती प्रयोगातून होते. प्रयोग हे शास्त्राच्या आधी आणि नंतरही घडत असतात हा सर्जनात्मक अधिकार जाणकारांनी समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन विख्यात विचारवंत व लेखक अशोक वाजपेयी यांनी केले.महागामीतर्फे आयोजित शारंगदेव संगीत महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, विविध परंपरेचा समुच्चय हे या देशाचे वैशिष्ट्य व बलस्थान राहिले आहे. अभिजात परंपरेचा उल्लेख करताना इतरही परंपरांचा विसर पडू नये. गायन परंपरेत मार्गीच्या जागेवर ख्याल आलाच ना! १९ व्या शतकापर्यंत संगीतात असे भेद नव्हते. नृत्याच्या क्षेत्रात आजही बंदिस्तपणा अधिक जाणवतो. शास्त्र आणि व्याकरण गातो, तो गायक, पण रागाला आपले करून गातो तो महान गायक ठरतो, असे पं. भीमसेन म्हणायचे.परिवर्तनाशिवाय तुमचे वेगळेपण दिसणार नाही. शास्त्राचा अस्वीकार करू नका; परंतु त्यात नवता भरली पाहिजे. आपल्या गुरूला श्रेष्ठ म्हणा; परंतु आपलेच गुरू सर्वश्रेष्ठ ठरवाल तर इतरांचे चांगले गुण तुम्हाला टिपता येणार नाहीत. सहचर्य ही आमची धारणा बनली पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.ख्याल गायकीवर चर्चाधृपद धमारनंतर गायन क्षेत्रात ख्याल रूढ झाला. ख्याल गायकीने सातत्याने परिवर्तन स्वीकारल्यामुळे ही पद्धती रूढ व विकसित होते आहे. लय, तालाशी खेळत खेळत स्वरांचा विस्तार, आलाप ताना, बहेलावे, गमक स्वरांचा वापर, मींड यामुळे गायन प्रकारात विविधता आली आहे, असे प्रतिपादन ग्वाल्हेर घराण्याचे गायक पं. सत्यशील देशपांडे यांनी केले.किन्नरी वादनदर्शनम् मोगलैया या दक्षिणेतील किन्नरी वीणा वादक लोककलावंताने आपल्यावादन शैलीने सर्वांना मोहून टाकले. या ग्रामीण कलावंताला आणि त्याच्या कलेला राजाश्रय मिळवून देणा-या डॉ. दासरी रंगय्या यांनी हा कार्यक्रम घडवून आणला. कलावंत व रसिक श्रोत्यांमध्ये मात्र भाषिक अडसर येत गेल्यामुळे अवघ्या वीस वीस मिनिटांत हे सादरीकरण संपवण्यात आले.शारंगदेव संगीत महोत्सवाची सांगता पार्वती दत्ता यांच्या कथ्थक नृत्य व ग्वाल्हेर घराण्याचे गायक पं. सत्यशील देशपांडे यांच्या गायनाने झाली. या महोत्सवाचे हे नववे वर्ष होते. शास्त्र आणि परंपरा यांचा अनोखा मेळ घालणारा हा देशपातळीवरील संगीतोत्सव महागामीची एक देण म्हणावी लागेल.