शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

कुठलेही शास्त्र शाश्वत नसते - अशोक वाजपेयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:37 IST

कुठलेच शास्त्र शाश्वत स्वरूपाचे नसते काळानुसार त्यात बदल घडत असतो. शास्त्राची निर्मिती प्रयोगातून होते. प्रयोग हे शास्त्राच्या आधी आणि नंतरही घडत असतात हा सर्जनात्मक अधिकार जाणकारांनी समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन विख्यात विचारवंत व लेखक अशोक वाजपेयी यांनी केले.

मल्हारीकांत देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कुठलेच शास्त्र शाश्वत स्वरूपाचे नसते काळानुसार त्यात बदल घडत असतो. शास्त्राची निर्मिती प्रयोगातून होते. प्रयोग हे शास्त्राच्या आधी आणि नंतरही घडत असतात हा सर्जनात्मक अधिकार जाणकारांनी समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन विख्यात विचारवंत व लेखक अशोक वाजपेयी यांनी केले.महागामीतर्फे आयोजित शारंगदेव संगीत महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, विविध परंपरेचा समुच्चय हे या देशाचे वैशिष्ट्य व बलस्थान राहिले आहे. अभिजात परंपरेचा उल्लेख करताना इतरही परंपरांचा विसर पडू नये. गायन परंपरेत मार्गीच्या जागेवर ख्याल आलाच ना! १९ व्या शतकापर्यंत संगीतात असे भेद नव्हते. नृत्याच्या क्षेत्रात आजही बंदिस्तपणा अधिक जाणवतो. शास्त्र आणि व्याकरण गातो, तो गायक, पण रागाला आपले करून गातो तो महान गायक ठरतो, असे पं. भीमसेन म्हणायचे.परिवर्तनाशिवाय तुमचे वेगळेपण दिसणार नाही. शास्त्राचा अस्वीकार करू नका; परंतु त्यात नवता भरली पाहिजे. आपल्या गुरूला श्रेष्ठ म्हणा; परंतु आपलेच गुरू सर्वश्रेष्ठ ठरवाल तर इतरांचे चांगले गुण तुम्हाला टिपता येणार नाहीत. सहचर्य ही आमची धारणा बनली पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.ख्याल गायकीवर चर्चाधृपद धमारनंतर गायन क्षेत्रात ख्याल रूढ झाला. ख्याल गायकीने सातत्याने परिवर्तन स्वीकारल्यामुळे ही पद्धती रूढ व विकसित होते आहे. लय, तालाशी खेळत खेळत स्वरांचा विस्तार, आलाप ताना, बहेलावे, गमक स्वरांचा वापर, मींड यामुळे गायन प्रकारात विविधता आली आहे, असे प्रतिपादन ग्वाल्हेर घराण्याचे गायक पं. सत्यशील देशपांडे यांनी केले.किन्नरी वादनदर्शनम् मोगलैया या दक्षिणेतील किन्नरी वीणा वादक लोककलावंताने आपल्यावादन शैलीने सर्वांना मोहून टाकले. या ग्रामीण कलावंताला आणि त्याच्या कलेला राजाश्रय मिळवून देणा-या डॉ. दासरी रंगय्या यांनी हा कार्यक्रम घडवून आणला. कलावंत व रसिक श्रोत्यांमध्ये मात्र भाषिक अडसर येत गेल्यामुळे अवघ्या वीस वीस मिनिटांत हे सादरीकरण संपवण्यात आले.शारंगदेव संगीत महोत्सवाची सांगता पार्वती दत्ता यांच्या कथ्थक नृत्य व ग्वाल्हेर घराण्याचे गायक पं. सत्यशील देशपांडे यांच्या गायनाने झाली. या महोत्सवाचे हे नववे वर्ष होते. शास्त्र आणि परंपरा यांचा अनोखा मेळ घालणारा हा देशपातळीवरील संगीतोत्सव महागामीची एक देण म्हणावी लागेल.