शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'देशापुढे कोणी मोठे नाही'; ध्वजारोहणासाठी डॉ. कराड उशिरा आल्याने जलील, दानवे भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 19:00 IST

घरोघरी तिरंगा लावा म्हणता आणि स्वतः ध्वजारोहणास उशीर करता.

औरंगाबाद: किल्ले अर्क परिसरात उभारण्यात आलेल्या १०० फुट उंच तिरंगा ध्वजाचे लोकार्पण कार्यक्रमात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड २० मिनिटे उशिरा आल्याने खा. इम्तियाज जलील चांगलेच भडकले. घरोघरी तिरंगा लावा म्हणता आणि स्वतः ध्वजारोहणास उशीर करता. देशापुढे कोणीही मोठे नाही, कोणतेही काम मोठे नाही, अशा शब्दात खा. जलील यांनी डॉ. कराड यांना कार्यक्रमस्थळी सुनावले. विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील ध्वजारोहणास उशीर झाल्याने नाराजी व्यक्त केली.

आज सकाळी किल्लेअर्क परिसरात सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी शहरातील तिसऱ्या सर्वात उंच झेंड्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड याच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. यासाठी जिल्ह्याचे खासदार आणि सर्व आमदार आमंत्रित होते. खा. इम्तियाज जलील, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, मंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण वेळेच्या आधी कार्यक्रम स्थळी आले होते. दरम्यान, नियोजित ९.४५ वाजेची वेळ टळून गेली तरी केंद्रीय मंत्री भागवत कराड ध्वजारोहणास आले नाही. यामुळे खा. जलील आणि विरोधीपक्ष नेते दानवे चांगलेच संतप्त झाले. दरम्यान, १० वाजून २ मिनिटांनी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. जलील आणि दानवे यांनी रोष व्यक्त करताच, देशाच्या कार्यक्रमास विरोध करू नका, असे आवाहन करत डॉ. कराड यांनी वेळ मारून नेत ध्वजारोहण पार पाडले.

देशापुढे कोणी मोठे नाही

एकीकडे घरोघरी तिरंगा झेंडा लावा म्हणता आणि ध्वजारोहणास उशीर येऊन झेंड्याचा अपमान करता. दुसऱ्यांना आदर करा असे सांगता. २० मिनिटे मंत्री उशिरा कसे आले. दुसऱ्या कार्यक्रमास ठीक आहे . पण ध्वजारोहणास नको. देशा पुढे कोणी मोठे नाही.

- खा. इम्तियाज जलील

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBhagwat Karadडॉ. भागवतImtiaz Jalilइम्तियाज जलीलAmbadas Danweyअंबादास दानवेAtul Saveअतुल सावे