शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

ना कोणी मत मागायला येतो ना जाहीरनाम्यात उल्लेख; आम्ही तर मत ‘नोटा’ला देतो: सँडी गुरू

By प्रशांत तेलवाडकर | Updated: April 9, 2024 18:39 IST

जाहीरनाम्यातही ‘बिना झोली के फकीर’ दुर्लक्षितच

छत्रपती संभाजीनगर : तृतीयपंथी समोर दिसला की अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात... जिल्ह्यात ८ ते १० हजार तृतीयपंथी आहेत; पण केवळ १३२ जणांकडेच मतदार कार्ड आहे. कोणताही राजकीय पक्षाचा उमेदवार असो आमच्याकडे कोणी मत मागायला येत नाही. आम्ही मतदानाला जातो व ‘नोटा’चे बटण दाबून संविधानाने दिलेल्या अधिकाराचा हक्क बजावतो, असे मत तृतीयपंथी सँडी गुरू यांनी व्यक्त केले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजातील एक वर्ग तृतीयपंथीयांचे काय मत आहे, याविषयी सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या संचालिका, सॅण्डी गुरूशी संवाद साधला असता त्यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले. देशाला स्वातंत्र्य मिळवून ७६ वर्षे झाली; पण अजूनही तृतीयपंथी समाज पारतंत्र्यातच जगत आहे, असा खेद व्यक्त करीत सॅण्डी गुरूंनी सांगितले की, आतापर्यंत निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात तृतीयपंथीयांचा विचार केला गेला नाही.

तृतीयपंथीयांमध्ये जनजागृती नसल्याने मतदार कार्ड काढून घेण्यात मोठी उदासीनता आहे. मतदानात टक्केवारी वाढत नसल्याने राजकीय पक्षही तृतीयपंथीयांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

खरे धर्मनिरपेक्ष आम्हीचधर्मनिरपेक्ष तर तृतीयपंथीयच आहेत, असे सॅण्डी गुरूंनी अभिमानाने सांगितले, देशात कोणी धर्मनिरपेक्ष, जातीभेद न मानणारा असेल तर फक्त तृतीयपंथीयच आहे. आम्ही कोणाला धर्म विचारत नाही, जात विचारत नाही की पंथ... तरी आम्ही सर्व तृतीयपंथीय गुण्यागोविंदाने नांदतो... जो आम्हाला भीक देईल, तोच आमच्यासाठी परमेश्वर असतो.

२००५ पासून मतदानसॅण्डी गुरूंनी सांगितले की, २००५ मध्ये महापालिकेची निवडणूक झाली तेव्हापासून मतदान करीत आहे. पूर्वी आजोबा ज्या राजकीय पक्षाला मतदान करीत, त्याच पक्षाला मी मतदान करीत असे; पण नंतर योग्य उमेदवार वाटत नसल्याने मी ‘नोटा’लाच मतदान करीत असते.

कोणाला मतदान करावे ?सॅंडी गुरूंनी सांगितले की, खासदार जनतेचा सेवक असतो, तो राजा नसतो. स्वत:ला राजा समजणाऱ्याला मतदान करू नका. तळागाळातील लोकांपर्यंत ज्यांचा संपर्क आहे, जो सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होऊ शकतो, जो जातिभेद, वर्णभेद, लिंगभेद मानत नाही, अशा उमेदवाराला मतदान करावे. मतदान करताना डोळे उघडे ठेवून बटण दाबावे, असे आवाहन सॅण्डी गुरूंनी केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान