शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

४० हजार घरांचा आकडा नेमका आला कोठून? लोकप्रतिनिधींनी ठेवले प्रशासनाच्या मर्मावर बोट

By मुजीब देवणीकर | Updated: August 22, 2023 14:29 IST

४० हजार घरांचे काय झाले? प्रशासनाच्या मर्मावरच बोट ठेवल्याने प्रश्नांची उत्तरे देताना अधिकाऱ्यांची पंचाईत झाली

छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ४० हजार घरे बांधण्यात येणार होती. त्याचे नेमके काय झाले? ७ वर्षे उलटल्यानंतर योजनेतील एकही घर का तयार झाले नाही? ४० हजार घरांचा आकडा नेमका आला कोठून? असे अनेक प्रश्न सोमवारी दिशा समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी उपस्थित केले. प्रशासनाच्या मर्मावरच बोट ठेवल्याने प्रश्नांची उत्तरे देताना अधिकाऱ्यांची पंचाईत झाली. १ सप्टेंबर रोजी खास या विषयावर बैठक होईल.

स्मार्ट सिटी कार्यालयात सोमवारी दिशा समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महापालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास आणि नवीन पाणीपुरवठा या दोन योजनांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. देशभरात आवास योजना यशस्वीपणे राबविण्यात आली. छत्रपती संभाजीनगरात नेमके काय झाले, असा प्रश्न करण्यात आला. योजनेसाठी मनपाला १२६ हेक्टर जागा देण्यात आली, ९० हेक्टर जागा निरुपयोगी असून, ३६ हेक्टर जागेवरच घरे विकसित केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

ईडी चौकशीची चर्चाविरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आवास योजनेत ईडीमार्फत चौकशी केली जात आहे. या चौकशीचे नेमके काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला. कंत्राटदाराने एकाच आयपी ॲड्रेसवरून निविदा भरल्याप्रकरणी सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अधिकाऱ्यांवर कारवाई नाही, असे मनपा प्रशासकांनी सांगितले.

४० हजार घरेच का?आवास योजनेत ४० हजार घरे बांधण्याचे निश्चित झाले. हा आकडा कोठून आला? योजनेतील घराच्या किमती कशा ठरविणार? ही घरे गोरगरिबांना परवडतील का? अशा प्रश्नांची सरबत्ती लोकप्रतिनिधींनी केली. एकही प्रश्नाचे उत्तर अधिकाऱ्यांना देता आले नाही.

बोगस लाभार्थ्यांचे पुरावेआवास योजनेत एका एजन्सीची नियुक्तीसाठी जाहिरात काढली. लाभार्थी शोधण्यासाठीही जाहिरात दिली. अन्य एका एजन्सीने पैसे घेतले. बोगस लाभार्थींच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले, असा आरोप लोकप्रतिनिधींनी केला. याचे पुरावे असल्याचे सांगितले, पण अधिकाऱ्यांनी मौन बाळगले.

महामेट्रोचा डीपीआरस्मार्ट सिटीने महामेट्रोला डीपीआर तयार करण्यासाठी साडेसात कोटी रुपये मंजूर केले. हे बिल अद्याप दिले नाही. महामेट्रोने राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे ना हरकत प्रमाणपत्र न घेताच डीपीआर तयार केला. त्यामुळे या डीपीआरला राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाने परवानगी नाकारली. महामेट्रोला साडेसात कोटी रुपये देण्याची परवानगी न घेताच बिल कसे काढणार, असा सवाल करण्यात आला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका