शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

हॉकर्स झोनवर निर्णय नाही; व्यापारी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:31 IST

रस्त्यावर उभ्या राहणाºया हॉकर्सचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्रस्त व्यापारी महापालिका, पोलिसांना करीत आहेत.

औरंगाबाद : रमजान महिन्यातील पहिल्या दहा दिवसांचा ‘अशरा’ संपला. दुसऱ्या अशºयाला सुरुवात झाली असून, जुन्या शहरातील प्रमुख रस्त्यांवर हातगाडी, फेरीवाले, फळ विक्रेत्यांची संख्या दहापटीने वाढली आहे. लाखो रुपये देऊन दुकाने भाड्याने घेतलेल्या व्यापाऱ्यांच्या दुकानात जाण्यासाठीही रस्ता शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे रस्त्यावर उभ्या राहणाºया हॉकर्सचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्रस्त व्यापारी महापालिका, पोलिसांना करीत आहेत. दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवीत आहेत. मागील आठवड्यात महापालिकेत एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत ठोस असा कोणताच निर्णय घेण्यात आला नाही.

रमजान महिन्याला सुरुवात होताच शहरातील प्रमुख रस्त्यांवर हातगाडीचालक, फेरीवाले, फळ विक्रेत्यांनी जागा व्यापल्या आहेत. दरवर्षीच्या या त्रासामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. शहागंज, सिटीचौक, रंगारगल्ली, गुलमंडी, टिळकपथ, औरंगपुरा आदी भागात रस्त्यावर जिथे जागा मिळेल तेथे हॉकर्स मंडळींनी बस्तान मांडले आहे.

लाखो रुपये भाडे भरून आणि कोट्यवधींचा माल ठेवून ग्राहकांची प्रतीक्षा करणाºया व्यापाºयांच्या दुकानांत जाण्यासाठीही जागा नसल्याचे चित्र आहे. रमजानमध्ये मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. सिझन डोळ्यासमोर ठेवून व्यापाºयांनी बरीच तयारी केली आहे. हॉकर्स मंडळींमुळे व्यापारी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

मागीलवर्षीही व्यापाºयांनी पोलीस आयुक्तांना याविषयी साकडे घातले होते. शहागंजमध्ये हातगाड्या लावण्याच्या मुद्यावरून मागीलवर्षी राजाबाजारमध्ये ऐन रमजानपूर्वी दंगल उसळली होती. या दंगलीत दोन निष्पाप व्यक्तींना जीव गमवावा लागला होता. महापालिकेने हॉकर्स झोन तयार करून द्यावा, तात्पुरत्या स्वरूपात हातगाडीचालकांना जागा उपलब्ध करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने महापौरांना देण्यात आले होते.

महापौर दालनात बैठक घेण्यात आली. मुख्य बाजारपेठेत हातगाडी, फेरीवाले यांच्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यांना हॉकर्स झोन तयार करून द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रमजान महिन्यात शहागंज चमन ते हिंदी विद्यालयपर्यंतचा रस्ता सायंकाळी वाहतुकीला बंद करून आम्हाला द्यावा, अशी बाजू हॉकर्स प्रतिनिधींनी मांडली. काहींनी रस्त्यावर मार्किंग करावी, पट्टे मारावे, त्यापुढे हातगाड्या येणार नाही, असा पर्याय सुचविला. तासभर चर्चा होऊनही कुठलाच निर्णय होऊ शकला नाही. रमजान ईद जसजशी जवळ येत आहे, तसे व्यापाºयाच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. हॉकर्सप्रश्नी निर्णय घ्यावा, अशी रास्त मागणी व्यापाºयांची आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद