शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मार्च एण्डिंग नऊ दिवसांवर; विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 18:00 IST

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढावे म्हणून विद्यार्थ्यांना भारत सरकारतर्फे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते.

ठळक मुद्दे२४ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित

औरंगाबाद : आर्थिक वर्ष मावळण्यास आता अवघे ८ दिवस उरले आहेत, तरीही अजून मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत २०२०-२१ या वर्षात जिल्ह्यात २४ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयातच पडून आहेत. यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढावे म्हणून विद्यार्थ्यांना भारत सरकारतर्फे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व फ्रीशिपचा लाभ दिला जातो. पूर्वी ऑफलाइन पद्धतीने कॉलेजमधून अर्ज भरून घेतले जायचे. मात्र, सन २०१०-११ या शैक्षणिक वर्षापासून ही योजना संगणकीकृत करण्यात आली. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना दरवर्षी ऑनलाइन अर्ज करावा लागत होता. परंतु, मागील शैक्षणिक वर्षापासून अर्ज अपडेट करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांऐवजी कॉलेजवर टाकण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फक्त प्रथम वर्षीच ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे, तर द्वितीय, तृतीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज कॉलेजच्या वतीने अपडेट करण्यात येतात. जिल्ह्यात १९५ महाविद्यालये व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दरवर्षी या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.

सन २०२०-२१ या वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे समाजकल्याण विभागाकडे २८ हजार २२० अर्ज प्राप्त झाले असून, महाविद्यालयांकडे अजूनही ११ हजार ३६४ विद्यार्थ्यांचे अर्ज विविध कारणांमुळे अडकलेले आहेत. याशिवाय, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे विभागाला प्राप्त ३४ हजार १२० अर्जांपैकी ७ हजार ४९६ अर्ज मान्य केले असून, ४७२६ अर्ज रद्द केले आहेत. या प्रवर्गातील १४ हजार २०६ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयाकडे प्रलंबित आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज प्राप्त झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा केलेली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल- मे मध्ये त्यांना या शिष्यवृत्तीची रक्कम मिळेल, असे समाजकल्याण अधिकारी जावेद खान यांनी सांगितले.

अर्ज सादर करण्याची २५ मार्चपर्यंत ‘डेडलाइन’शिष्यवृत्ती विभागाचे समाजकल्याण अधिकारी जावेद खान यांनी सांगितले की, मार्च एण्ड जवळ आला, तर अजून सन २०२०-२१ या वर्षातील विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झालेले नाहीत. यासंदर्भात आपण अनेकदा महाविद्यालयांना स्मरण करून दिले. या आठवड्यात आपण स्वत: विद्यापीठासह मोठ्या महाविद्यालयांना भेटी दिल्या. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना २५ मार्चपर्यंत समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करण्याची ‘डेडलाइन’ दिली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले; परंतु हार्ड कॉपी न दिल्यामुळे अर्ज अडकून पडल्याचे कारण महाविद्यालयांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद