शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

मार्च एण्डिंग नऊ दिवसांवर; विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 18:00 IST

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढावे म्हणून विद्यार्थ्यांना भारत सरकारतर्फे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते.

ठळक मुद्दे२४ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित

औरंगाबाद : आर्थिक वर्ष मावळण्यास आता अवघे ८ दिवस उरले आहेत, तरीही अजून मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत २०२०-२१ या वर्षात जिल्ह्यात २४ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयातच पडून आहेत. यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढावे म्हणून विद्यार्थ्यांना भारत सरकारतर्फे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व फ्रीशिपचा लाभ दिला जातो. पूर्वी ऑफलाइन पद्धतीने कॉलेजमधून अर्ज भरून घेतले जायचे. मात्र, सन २०१०-११ या शैक्षणिक वर्षापासून ही योजना संगणकीकृत करण्यात आली. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना दरवर्षी ऑनलाइन अर्ज करावा लागत होता. परंतु, मागील शैक्षणिक वर्षापासून अर्ज अपडेट करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांऐवजी कॉलेजवर टाकण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फक्त प्रथम वर्षीच ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे, तर द्वितीय, तृतीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज कॉलेजच्या वतीने अपडेट करण्यात येतात. जिल्ह्यात १९५ महाविद्यालये व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दरवर्षी या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.

सन २०२०-२१ या वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे समाजकल्याण विभागाकडे २८ हजार २२० अर्ज प्राप्त झाले असून, महाविद्यालयांकडे अजूनही ११ हजार ३६४ विद्यार्थ्यांचे अर्ज विविध कारणांमुळे अडकलेले आहेत. याशिवाय, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे विभागाला प्राप्त ३४ हजार १२० अर्जांपैकी ७ हजार ४९६ अर्ज मान्य केले असून, ४७२६ अर्ज रद्द केले आहेत. या प्रवर्गातील १४ हजार २०६ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयाकडे प्रलंबित आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज प्राप्त झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा केलेली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल- मे मध्ये त्यांना या शिष्यवृत्तीची रक्कम मिळेल, असे समाजकल्याण अधिकारी जावेद खान यांनी सांगितले.

अर्ज सादर करण्याची २५ मार्चपर्यंत ‘डेडलाइन’शिष्यवृत्ती विभागाचे समाजकल्याण अधिकारी जावेद खान यांनी सांगितले की, मार्च एण्ड जवळ आला, तर अजून सन २०२०-२१ या वर्षातील विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झालेले नाहीत. यासंदर्भात आपण अनेकदा महाविद्यालयांना स्मरण करून दिले. या आठवड्यात आपण स्वत: विद्यापीठासह मोठ्या महाविद्यालयांना भेटी दिल्या. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना २५ मार्चपर्यंत समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करण्याची ‘डेडलाइन’ दिली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले; परंतु हार्ड कॉपी न दिल्यामुळे अर्ज अडकून पडल्याचे कारण महाविद्यालयांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद