शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

निखालस ‘आरोग्य’ संगीतासाठी शरीररूपी दर्जेदार वाद्य गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:14 IST

शरीराची उंची वाढविणे हा जीवनाचा अंतिम हेतू नसून जगण्याचा दर्जा वाढविणे म्हणजे आयुष्य असते. अशा दर्जेदार आयुष्यासाठी आपले आरोग्य सदृढ असणे महत्त्वाचे. आपले शरीर हे जर वाद्य असेल तर आरोग्य त्याचे संगीत आहे. त्यामुळे निखालस आरोग्य संगीतासाठी शरीररुपी वाद्य दर्जेदार असावे, असा मंत्र सिनेअभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी दिला. देवगिरी महाविद्यालयातर्फे आयोजित ‘फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमाले’मध्ये ते बोलत होते.

ठळक मुद्देमोहन आगाशे : फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेत केले प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शरीराची उंची वाढविणे हा जीवनाचा अंतिम हेतू नसून जगण्याचा दर्जा वाढविणे म्हणजे आयुष्य असते. अशा दर्जेदार आयुष्यासाठी आपले आरोग्य सदृढ असणे महत्त्वाचे. आपले शरीर हे जर वाद्य असेल तर आरोग्य त्याचे संगीत आहे. त्यामुळे निखालस आरोग्य संगीतासाठी शरीररुपी वाद्य दर्जेदार असावे, असा मंत्र सिनेअभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी दिला. देवगिरी महाविद्यालयातर्फे आयोजित ‘फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमाले’मध्ये ते बोलत होते.महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागारे सभागृहात सोमवारी (दि.१२) पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य पंडितराव हर्षे होते. यावेळी प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे आणि उपप्राचार्य डॉ. अशोक तेजनकर उपस्थित होते.‘दैनंदिन जीवनातील ताणतणाव : आरोग्य आणि कलाक्षेत्राचे योगदान’ या विषयावर बोलताना डॉ. आगाशे यांनी विद्यार्थ्यांना तणाव न घेता ज्ञानार्जनासाठी अभ्यास करण्याचा सल्ला दिला. ‘ज्याला शिकायचे तो चांगल्या शिक्षकाची वाट पाहत नाही. जीवनातील प्रत्येक अनुभव तो ज्ञान प्राप्त करतो. पदवी प्राप्त केली म्हणजे तुम्ही तज्ज्ञ होत नाहीत. खरी परीक्षा तर महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर खºया आयुष्यात उतरल्यावरच सुरू होते, असे ते म्हणाले.कलेला शिक्षणात अनन्यसाधारण महत्त्व असून, त्यामुळे तणाव कमी होतो. कला व बुद्धी एकत्र नांदले तर आरोग्य उत्तम राहते, असे सूत्र डॉ. आगाशे यांनी मांडले. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात हरवत चाललेल्या निरागसतेबद्दल चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ आणि ‘इंटेलेक्च्युअल मॅनिप्युलेशन’च्या काळात विद्यार्थ्यांचा भावनिक विकास होणे गरजेचे आहे. कलेतून भावनिक विकास शक्य होतो. तरुणांमध्ये वाढत असलेल्या नैराश्याच्या प्रमाणाविषयीदेखील त्यांनी भाष्य केले.कुतूहल जागृत करणारी कलावैद्यकीय महाविद्यालयातील गंमतीशीर स्वानुभव कथनातून त्यांनी विद्यार्थी जीवनात खेळ, कला, संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. ‘पाठ्यपुस्तकांऐवजी विद्यार्थी कथा-कादंबरी एका बैठकीत वाचून काढतो. कारण कला-साहित्यामध्ये वाचकांचे कुतूहल जागृत करण्याची क्षमता असते. विचारांना चालना देण्याची, कुतूहल निर्माण करण्याची क्षमता निरस-शुष्क पाठ्यपुस्तकांमध्येही हवी,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.