शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

निखालस ‘आरोग्य’ संगीतासाठी शरीररूपी दर्जेदार वाद्य गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:14 IST

शरीराची उंची वाढविणे हा जीवनाचा अंतिम हेतू नसून जगण्याचा दर्जा वाढविणे म्हणजे आयुष्य असते. अशा दर्जेदार आयुष्यासाठी आपले आरोग्य सदृढ असणे महत्त्वाचे. आपले शरीर हे जर वाद्य असेल तर आरोग्य त्याचे संगीत आहे. त्यामुळे निखालस आरोग्य संगीतासाठी शरीररुपी वाद्य दर्जेदार असावे, असा मंत्र सिनेअभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी दिला. देवगिरी महाविद्यालयातर्फे आयोजित ‘फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमाले’मध्ये ते बोलत होते.

ठळक मुद्देमोहन आगाशे : फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेत केले प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शरीराची उंची वाढविणे हा जीवनाचा अंतिम हेतू नसून जगण्याचा दर्जा वाढविणे म्हणजे आयुष्य असते. अशा दर्जेदार आयुष्यासाठी आपले आरोग्य सदृढ असणे महत्त्वाचे. आपले शरीर हे जर वाद्य असेल तर आरोग्य त्याचे संगीत आहे. त्यामुळे निखालस आरोग्य संगीतासाठी शरीररुपी वाद्य दर्जेदार असावे, असा मंत्र सिनेअभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी दिला. देवगिरी महाविद्यालयातर्फे आयोजित ‘फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमाले’मध्ये ते बोलत होते.महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागारे सभागृहात सोमवारी (दि.१२) पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य पंडितराव हर्षे होते. यावेळी प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे आणि उपप्राचार्य डॉ. अशोक तेजनकर उपस्थित होते.‘दैनंदिन जीवनातील ताणतणाव : आरोग्य आणि कलाक्षेत्राचे योगदान’ या विषयावर बोलताना डॉ. आगाशे यांनी विद्यार्थ्यांना तणाव न घेता ज्ञानार्जनासाठी अभ्यास करण्याचा सल्ला दिला. ‘ज्याला शिकायचे तो चांगल्या शिक्षकाची वाट पाहत नाही. जीवनातील प्रत्येक अनुभव तो ज्ञान प्राप्त करतो. पदवी प्राप्त केली म्हणजे तुम्ही तज्ज्ञ होत नाहीत. खरी परीक्षा तर महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर खºया आयुष्यात उतरल्यावरच सुरू होते, असे ते म्हणाले.कलेला शिक्षणात अनन्यसाधारण महत्त्व असून, त्यामुळे तणाव कमी होतो. कला व बुद्धी एकत्र नांदले तर आरोग्य उत्तम राहते, असे सूत्र डॉ. आगाशे यांनी मांडले. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात हरवत चाललेल्या निरागसतेबद्दल चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ आणि ‘इंटेलेक्च्युअल मॅनिप्युलेशन’च्या काळात विद्यार्थ्यांचा भावनिक विकास होणे गरजेचे आहे. कलेतून भावनिक विकास शक्य होतो. तरुणांमध्ये वाढत असलेल्या नैराश्याच्या प्रमाणाविषयीदेखील त्यांनी भाष्य केले.कुतूहल जागृत करणारी कलावैद्यकीय महाविद्यालयातील गंमतीशीर स्वानुभव कथनातून त्यांनी विद्यार्थी जीवनात खेळ, कला, संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. ‘पाठ्यपुस्तकांऐवजी विद्यार्थी कथा-कादंबरी एका बैठकीत वाचून काढतो. कारण कला-साहित्यामध्ये वाचकांचे कुतूहल जागृत करण्याची क्षमता असते. विचारांना चालना देण्याची, कुतूहल निर्माण करण्याची क्षमता निरस-शुष्क पाठ्यपुस्तकांमध्येही हवी,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.