शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
3
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
4
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
5
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
6
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
7
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
8
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
9
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
10
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
11
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
12
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
13
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
14
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
15
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
16
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
17
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
18
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
19
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
20
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!

निखालस ‘आरोग्य’ संगीतासाठी शरीररूपी दर्जेदार वाद्य गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:14 IST

शरीराची उंची वाढविणे हा जीवनाचा अंतिम हेतू नसून जगण्याचा दर्जा वाढविणे म्हणजे आयुष्य असते. अशा दर्जेदार आयुष्यासाठी आपले आरोग्य सदृढ असणे महत्त्वाचे. आपले शरीर हे जर वाद्य असेल तर आरोग्य त्याचे संगीत आहे. त्यामुळे निखालस आरोग्य संगीतासाठी शरीररुपी वाद्य दर्जेदार असावे, असा मंत्र सिनेअभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी दिला. देवगिरी महाविद्यालयातर्फे आयोजित ‘फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमाले’मध्ये ते बोलत होते.

ठळक मुद्देमोहन आगाशे : फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेत केले प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शरीराची उंची वाढविणे हा जीवनाचा अंतिम हेतू नसून जगण्याचा दर्जा वाढविणे म्हणजे आयुष्य असते. अशा दर्जेदार आयुष्यासाठी आपले आरोग्य सदृढ असणे महत्त्वाचे. आपले शरीर हे जर वाद्य असेल तर आरोग्य त्याचे संगीत आहे. त्यामुळे निखालस आरोग्य संगीतासाठी शरीररुपी वाद्य दर्जेदार असावे, असा मंत्र सिनेअभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी दिला. देवगिरी महाविद्यालयातर्फे आयोजित ‘फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमाले’मध्ये ते बोलत होते.महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागारे सभागृहात सोमवारी (दि.१२) पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य पंडितराव हर्षे होते. यावेळी प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे आणि उपप्राचार्य डॉ. अशोक तेजनकर उपस्थित होते.‘दैनंदिन जीवनातील ताणतणाव : आरोग्य आणि कलाक्षेत्राचे योगदान’ या विषयावर बोलताना डॉ. आगाशे यांनी विद्यार्थ्यांना तणाव न घेता ज्ञानार्जनासाठी अभ्यास करण्याचा सल्ला दिला. ‘ज्याला शिकायचे तो चांगल्या शिक्षकाची वाट पाहत नाही. जीवनातील प्रत्येक अनुभव तो ज्ञान प्राप्त करतो. पदवी प्राप्त केली म्हणजे तुम्ही तज्ज्ञ होत नाहीत. खरी परीक्षा तर महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर खºया आयुष्यात उतरल्यावरच सुरू होते, असे ते म्हणाले.कलेला शिक्षणात अनन्यसाधारण महत्त्व असून, त्यामुळे तणाव कमी होतो. कला व बुद्धी एकत्र नांदले तर आरोग्य उत्तम राहते, असे सूत्र डॉ. आगाशे यांनी मांडले. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात हरवत चाललेल्या निरागसतेबद्दल चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ आणि ‘इंटेलेक्च्युअल मॅनिप्युलेशन’च्या काळात विद्यार्थ्यांचा भावनिक विकास होणे गरजेचे आहे. कलेतून भावनिक विकास शक्य होतो. तरुणांमध्ये वाढत असलेल्या नैराश्याच्या प्रमाणाविषयीदेखील त्यांनी भाष्य केले.कुतूहल जागृत करणारी कलावैद्यकीय महाविद्यालयातील गंमतीशीर स्वानुभव कथनातून त्यांनी विद्यार्थी जीवनात खेळ, कला, संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. ‘पाठ्यपुस्तकांऐवजी विद्यार्थी कथा-कादंबरी एका बैठकीत वाचून काढतो. कारण कला-साहित्यामध्ये वाचकांचे कुतूहल जागृत करण्याची क्षमता असते. विचारांना चालना देण्याची, कुतूहल निर्माण करण्याची क्षमता निरस-शुष्क पाठ्यपुस्तकांमध्येही हवी,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.