शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

दुसऱ्या दिवशी मनपाने कापले १२७ अनधिकृत नळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 17:48 IST

पथकांनी पहाटे ६ वाजेपासून शहरातील विविध भागांत कारवाई सुरू केली.

ठळक मुद्दे मनपाच्या ७ पथकांनी कारवाई करून १२७ अनधिकृत नळ कापले.कारवाई करताना नागरिक आणि पालिकेच्या पथकात वाद होऊन तणाव

औरंगाबाद : महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून घेण्यात आलेल्या अनधिकृत व्यावसायिक नळांवर गुरुवारी दुसऱ्या दिवशीही कारवाई करण्यात आली. शहरातील मुख्य व्यावसायिक भागात मनपाच्या ७ पथकांनी कारवाई करून १२७ अनधिकृत नळ कापले.

पथकांनी पहाटे ६ वाजेपासून शहरातील विविध भागांत कारवाई सुरू केली. कारवाई करताना नागरिक आणि पालिकेच्या पथकात वाद होऊन तणाव निर्माण झाला. चिकलठाणा परिसरात मातोश्री लॉन्स, कांचन लॉन्स, शिवनेरी रेस्टॉरंट, शिवनेरी लॉन्स, आॅक्सिफ्लो आर ओ प्लांट, इंडियन आॅईल पेट्रोलपंप, निसर्ग हॉटेल, हनुमाननगर येथील आॅटो वॉशिंग सेंटर, आशादीप रेस्टॉरंट व बार या व्यावसायिकांचे अनधिकृत नळ कनेक्शन पथकाने कापले. तसेच एमजीएमसमोर हॉटेल शालिमार, रॉयल गॅरेज, गुलाम मोटर गॅरेज, हॉटेल प्रशांत, लक्की गोल्ड फर्निचर, हॉटेल रसोई जकात नाका आणि एमजीएम गेट समोरील आदर्श महिला बँकेचे नळ कनेक्शन तोडण्यात आले. महापालिकेच्या पथकाने नंतर कांचनवाडी येथील धील्लन, मिथियाल आणि नाथपुरम येथील घेण्यात आलेले अनधिकृत नळ कनेक्शनही तोडण्यात आले. मोंढानाका भागात हॉटेल साई प्रसाद, बिरला सिमेंट आणि एन-२ भागात जयभवानी पेट्रोलपंप, सलीम खुर्चीवाला, चंद्रलेखा परमिट रूम अ‍ॅण्ड बार तसेच शहागंज येथील सिटी प्लाझा व्यापारी संकुल, पेट्रोलपंप आणि भाजी मंडई येथील पाणपोईचे नळ पथकांनी  तोडले. 

नळ कनेक्शन रात्रीतून पुन्हा जोडलेमोतीकारंजा परिसरात एका धार्मिकस्थळात मुख्य जलवाहिनीवरून बेकायदा घेतलेले दीड इंचाचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई  पालिकेने बुधवारी केली होती. मात्र मनपाने तोडलेले नळ कनेक्शन त्या धार्मिकस्थळावरील मंडळींनी रात्रीतून जोडून पुन्हा पाणीपुरवठा सुरू केला. नळ कनेक्शन पुन्हा जोडल्याची माहिती मिळताच गुरुवारी सकाळी पथक कारवाईसाठी धार्मिकस्थळावर धडकले. नळाच्या पाण्याने टँकर भरणा होत असल्याचे पालिका पथकाने रंगेहाथ पकडले. नळ कनेक्शनवर कारवाईस विरोध करण्यासाठी जमाव पथकावर चालून आला. परंतु उपायुक्त मंजूषा मुथा यांनी थेट धार्मिकस्थळात जाऊन बेकायदा जोडलेले नळ कनेक्शन पुन्हा तोडले. पोलीस बंदोबस्त असल्यामुळे तणाव निवळला. 

रॅकेट सर्वानुमतेच चालत असावेपालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर नळ कनेक्शन कुणी जोडून दिले. पाणीपुरवठा विभागातील महाभागच याला जबाबदार आहेत का? आजवर या कनेक्शनला अभय कुणी दिले. मनपाचे प्लंबर, उपअभियंता, शाखा अभियंता ही मंडळी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने मुख्य जलवाहिनीवर नळ कनेक्शन दिल्याचे बोलले जाते. पाणीपुरवठा विभागातील यंत्रणेला वरकमाई आणि लोकप्रतिनिधींना निवडणुकीसह वॉर्डातील पक्षांच्या कार्यक्रमांसाठी अनधिकृत व्यावसायिक नळधारकांकडून गंगाजळी मिळते. त्यामुळे मनपासह राजकारणीदेखील अनधिकृत व्यावसायिक नळांची पाठराखण करतात, अशी चर्चा ऐकायला मिळाली.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीAurangabadऔरंगाबाद