शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
5
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
6
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
7
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
8
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
9
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
10
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
11
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
12
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
13
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
14
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
15
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
16
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
17
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
18
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
19
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
20
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे

औरंगाबादसाठी नवीन पाणीपुरवठा योजना; निविदा १५०४ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 18:30 IST

कंपनीने वाढीव रक्कम कमी करावी, यासाठी प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहेत. 

ठळक मुद्दे१३८० कोटीची योजना राज्य शासनाकडून मंजूर  ९.९ टक्के अधिक दराने आली निविदा

औरंगाबाद : राज्य शासनाने शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने निविदा प्रक्रिया राबविली. ज्या मोठ्या कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला त्यातील एका कंपनीने ९.९ टक्के अधिक दराने निविदा भरली आहे. इतर कंपन्यांनी यापेक्षा अधिक दर दिले आहेत. त्यामुळे सर्वाधिक कमी दराची निविदा मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. कंपनीने वाढीव रक्कम कमी करावी, यासाठी प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहेत. 

राज्य शासनाने १६८० कोटी रुपये किमतीची नवीन पाणीपुरवठा योजना औरंगाबाद शहरासाठी मंजूर केली. त्यापैकी १३०५ कोटींची निविदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काढली. पहिल्या प्रयत्नात निकषानुसार निविदा न आल्याने प्राधिकरणाने फेर निविदा काढली. त्यानंतर मात्र जीबीपीआर कंपनी लि. मुंबई, मेघा कंपनी प्रा.लि. हैदराबाद आणि नागार्जुन कन्स्ट्रक्शन प्रा. लि., हैदराबाद या कंपन्यांनी निविदा दाखल केल्या होत्या. जीबीपीआर कंपनीची सर्वात कमी दराची म्हणजे ९.९ टक्के जादा दराची निविदा ग्राह्य धरण्यात आली. 

अंदाजपत्रक १३८० कोटींचेनवीन पाणीपुरवठा योजना राबविताना पहिल्या टप्प्यातील पूर्ण काम करण्यासाठी १३८० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रसिद्ध करण्यात आली. जीबीपीआर कंपनीने इतर कंपन्यांच्या तुलनेत ९.९ टक्के  अधिक दराने निविदा भरली आहे. यानुसार पाणीपुरवठ्याचा खर्च १५०४ कोटी २० लाखांपर्यंत जात आहे. कंपनीने वाढीव दर कमी करावा यादृष्टीने प्राधिकरण जोरदार प्रयत्न करीत आहे. जीबीपीआर कंपनीच्या अधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाचारण करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजय सिंह यांनी दिली.

अहवाल शासनाला पाठविणारजीबीपीआर कंपनीच्या अधिकाऱ्यांना चर्चेसाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. सध्याचा लॉकडाऊनचा काळ लक्षात घेता चार दिवस जास्त लागू शकतील, असे गृहीत धरण्यात आले आहे. नंतर जो काही दर ठरेल त्याचा अहवाल शासनाला सादर केला जाईल. शासनाची त्याला मंजुरी मिळाल्यावर पुढील कार्यवाही सुरू केली जाईल, असे अजय सिंह यांनी सांगितले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी