शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Pawar पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका...
2
राज्य भाजपात मोठे बदल होणार?; दिल्लीत पार पडणार महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची बैठक
3
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
4
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
5
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
6
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
7
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
8
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
9
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
10
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
12
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
13
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
14
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
15
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
16
राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक
17
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
18
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
19
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
20
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा

कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा नवा फतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:45 AM

कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज दाखल करताना इंटरनेट आणि वेबसाईटच्या व्यत्ययामुळे मोठा गोंधळ निर्माण होत आहे. आता पुन्हा कर्जमाफीच्या अर्जासह अन्य कागदपत्रे बँकेत दाखल करण्याचा नवा फतवा काढला असून त्यालाही अवघ्या तीनच दिवसांची मुदत दिल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज दाखल करताना इंटरनेट आणि वेबसाईटच्या व्यत्ययामुळे मोठा गोंधळ निर्माण होत आहे. आता पुन्हा कर्जमाफीच्या अर्जासह अन्य कागदपत्रे बँकेत दाखल करण्याचा नवा फतवा काढला असून त्यालाही अवघ्या तीनच दिवसांची मुदत दिल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.राज्य शासनाने शेतकºयांसाठी विविध निकष घालून कर्जमाफीची घोषणा केली. त्याला अडीच महिने उलटूनही अद्याप लाभ मिळालाच नसून सदर योजनेत रोजच नवनव्या नियम व अटींची भर पडू लागली असून शासनाने घालून दिलेल्या विविध बाबींची पूर्तता करण्यातच शेतकरी हैराण झाला आहे. सेतू केंद्रावर कर्ज घोषणापत्र आॅनलाईन दाखल करण्याची अट शासनाकडून टाकल्यामुळे सेतू केंद्रावर मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यातच वारंवार इंटरनेट कनेक्टीव्हिटी खंडित होत असून वेबसाईड हँग होत असल्याने व्यत्यय निर्माण होत आहे. दिवसभर रांगेत उभे टाकुनही अर्ज दाखल होत नसल्याने शेतकºयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अर्ज घोषणापत्र दाखल करण्यासाठी आधारकार्ड, बँक खाते पुस्तक असणे गरजेचे केले असल्याने शेतकºयांना यासाठी पायपीट सहन करावी लागत आहे. आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत असून निर्माण होणाºया विविध अडचणीमुळे शेतकºयांची भलतीच तारांबळ उडत आहे. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी एकीकडे मोठा गोंधळ सुरू असताना आता बँकेमध्येसुद्धा कर्जमाफीच्या फॉर्मसह आॅनलाईन अर्ज दाखल केल्याची पावती, कर्ज खात्याची व बचत खात्याचे पासबूक पत्र, आधार कार्ड, सातबारा, होल्डींग, मयत असल्यास मृत्यू प्रमाणपत्र दाखल करण्याचा नवा फतवा शासनाने काढला आहे. गोरेगाव येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत १३ सप्टेंबर रोजी दुपारी बँकेत अर्ज आणि कागदपत्रे दाखल करण्याचा फलक लावला असून त्यावर १६ सप्टेंबरपर्यंत मुदत असल्याचे नमूद आहे. केवळ तीनच दिवसांची मुदत दिल्याने शेतकरी चक्रावून गेला आहे. शासनाकडून लादण्यात येणाºया नवनव्या निर्णय व अटीमुळे पुन्हा अडचण निर्माण झाल्याने शासनाकडून घोषणा करण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान की अवमान योजना ? असा सवाल व्यक्त करीत शेतकºयांमधून संताप व्यक्त होत आहे.याबाबत बँक शाखाधिकारी मनीष कुमार झा यांना विचारले असता ते म्हणाले, वरिष्ठांकडून बँकेमध्ये कर्ज माफीचे अर्ज आणि कागदपत्रे दाखल करून घेण्यास सांगण्यात आले आहे. यावरून कर्जमाफीसाठी यादी शासनाकडे सादर करावयाची असून याद्वारे पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. मुदतीत अर्ज कागदपत्रे दाखल करण्याचे अवाहन त्यांनी केले.