शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

मराठवाड्यातील नवे प्रकल्प ‘वेटिंग’वरच; नांदेड- यवतमाळ- वर्धा रेल्वे मार्गासाठी ८२० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 19:28 IST

अहमदनगर-बीड-परळी मार्गासाठी ५६७ कोटी : मनमाड-मुदखेड-धोन विद्युतीकरणासाठी २२८ कोटी

औरंगाबाद : मराठवाडा आणि विदर्भ भागादरम्यान वेगवान कनेक्टिव्हिटी प्रस्थापित करून विकास मार्गाला नेण्याची क्षमता असलेल्या नांदेड-वर्धा (यवतमाळमार्गे) रेल्वे मार्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ८२० कोटी ४७ लाख रुपयांच्या निधीची तरतूद झाली आहे. तर अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गासाठी ५६७ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला. याबरोबर सध्या सुरू असलेल्या मराठवाड्यातील इतर रेल्वे प्रकल्पांसाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, नवे प्रकल्प सध्या ‘वेटिंग’वरच असल्याची स्थिती आहे.

नांदेड-वर्धा रेल्वे मार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये दळणवळणाचा संपर्क वाढण्यास मदत होणार आहे. या रेल्वे मार्गासाठी ८२० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद झाल्याने हा मार्ग गतीने पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. गेल्या २५ वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या परळी-बीड-अहमदनगर या २६१ कि.मी. रेल्वेमार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. २६१ कि.मी.पैकी सध्या ६६ कि.मी म्हणजे अहमदनगर ते आष्टी हे काम पूर्ण झाले आहे. या मार्गासाठी २०२२-२३ या वर्षासाठी ५६७ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे.

तीर्थक्षेत्र तुळजापूर रेल्वे ट्रॅकवर आणण्याचे मागणी १९६० पासून सुरू आहे. २००४-०५ या वर्षात सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी मिळाली. सर्वेक्षणानुसार हा मार्ग ८४ किमीचा आहे. त्यासाठी १५ वर्षांपूर्वी १८९ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. दरम्यान, पाठपुरावा थंडावला. त्यामुळे चर्चाच झाली नाही. मात्र, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुळजापुरात घेतलेल्या सभेत हा मार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मोदींच्या मागील टर्मच्या शेवटच्या टप्प्यात या मार्गाच्या पुनर्सर्वेक्षणास मंजुरी मिळाली. पुन्हा सर्व्हे झाला तेव्हा हा प्रकल्प खर्च ९०४ कोटींवर गेला. आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी १० कोटींच्या निधीची तरतूद झाली आहे.

विद्युतीकरण, दुहेरीकरणाला निधीमनमाड - मुदखेड-धोन रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी २२८ कोटी ७३ लाख ९८ हजार रुपये तर मुदखेड-परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी ३० कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

औरंगाबाद रेल्वेस्टेशनसाठी १ हजार रुपयेऔरंगाबाद रेल्वेस्टेशनच्या विकासासाठी अवघ्या १ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यामुळे रेल्वे स्टेशनचा दुसरा टप्पा यंदाही रखडण्याची स्थिती आहे.

टॅग्स :railwayरेल्वेMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद