शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

तीन दिवसांत औरंगाबाद शहराला देणार नवीन पोलीस आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:23 IST

११ आणि १२ मे रोजी शहरात झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तीन दिवसांत शहराला नवीन पोलीस आयुक्त देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी सर्वपक्षीय आमदारांच्या शिष्टमंडळाला मंगळवारी रात्री मुंबईत दिली.

ठळक मुद्देदंगलीची उच्चस्तरीय चौकशी : आमदारांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती; कायदा व सुव्यवस्था विभागाचे महासंचालक बिपीन बिहारींवर जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ११ आणि १२ मे रोजी शहरात झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तीन दिवसांत शहराला नवीन पोलीस आयुक्त देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी सर्वपक्षीय आमदारांच्या शिष्टमंडळाला मंगळवारी रात्री मुंबईत दिली.औरंगाबादेत झालेल्या दंगलीत दोन जणांचा बळी गेला आणि पोलिसांचा गोळीबार आणि दंगलखोरांनी केलेल्या दगडफेकीत दोनशेहून अधिक नागरिक जखमी झाले. या दंगलीत अनेकांची वाहने आणि दुकाने जाळण्यात आली. शेकडो वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने सुमारे १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात नमूद केला आहे. दंगल करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांसह ६५ जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. अन्य दंगलखोरांची ओळख पटवून त्यांचे अटकसत्र पोलिसांकडून सुरूच आहे. शिवाय या दंगलीत काही पोलीस पक्षपाती वागल्याचा आरोप होत आहे.या पार्श्वभूमीवर आमदार इम्तियाज जलील यांच्यासह सर्वपक्षीय आमदारांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. त्यांनी दंगलीच्या विविध व्हिडिओ क्लीप मुख्यमंत्र्यांना दिल्या. शिवाय दंगलीची चौकशी करण्याची मागणी केली.नुकसानभरपाई देण्याचीही तयारीशिष्टमंडळासोबत चर्चा करताना दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. ही चौकशी राज्याचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांच्यामार्फत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नुकसान झालेल्या लोकांना नुकसानभरपाई देण्याची तयारीही त्यांनी दर्शविल्याचे शिष्टमंडळातील सदस्य आ.जलील यांनी सांगितले.दोन महिन्यांपासून आयुक्तपद रिक्त४शहराचे पोलीस आयुक्तपद दोन महिन्यांपासून रिक्त आहे. याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता, तीन दिवसांत नवीन पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.मिटमिटा दंगलीची अद्याप चौकशी नाहीमार्च महिन्यात मिटमिटा येथे झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली होती. गृह विभागाचे अप्पर सचिव आणि पोलीस महासंचालक ही चौकशी करण्यासाठी औरंगाबादेत येणार होते. या घोषणेची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. असे असताना शहरात नुकत्याच झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन पाळले जाईल का याविषयी उत्सुकता आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिसMLAआमदार