शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

राजकारणात नवीन आयडिया सोशल मीडिया

By admin | Updated: August 3, 2014 01:11 IST

औरंगाबाद : वेगवेगळ्या क्षेत्रांत विज्ञानाने क्रांती घडवून आणली. राजकीय क्षेत्रही यापासून अलिप्त राहू शकत नाही.

औरंगाबाद : वेगवेगळ्या क्षेत्रांत विज्ञानाने क्रांती घडवून आणली. राजकीय क्षेत्रही यापासून अलिप्त राहू शकत नाही. वेबसाईटपेक्षा पुढे जाऊन राजकीय मंडळींनी फेसबुक आणि व्हॉटस्अपचा जोरदार वापर सुरू केला आहे. सोशल साईटचा वापर ही एक आत्मसमाधानाची बाब असून, याचा वापर करणारे १४.८ टक्के नागरिक आहेत.देशात मोबाईल ग्राहक झपाट्याने इंटरनेटकडे वळत आहेत. एका सर्वेक्षणानुसार देशात पन्नास टक्क्यांहून अधिक मोबाईल ग्राहक इंटरनेटचा वापर करतात. आपल्या मोबाईलच्या बिलातील सुमारे ४५ टक्के रक्कम ते इंटरनेटच्या वापरावर खर्च करतात. याचा थेट लाभ सामाजिक आणि व्यावसायिकांनंतर राजकीय मंडळीही करीत आहे. शहरात शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनीही आपली वेबसाईट फार पूर्वीच सुरू केली. राजेंद्र दर्डा फेसबुक आणि व्हॉटस्अपवरही वैयक्तिकरीत्या वेळ देतात. त्याचप्रमाणे कॅबिनेटमंत्री अब्दुल सत्तार, खा. चंद्रकांत खैरे हेसुद्धा फेसबुकवर सक्रिय आहेत. आमदारांमध्ये सतीश चव्हाण, संजय शिरसाट, जालन्याचे कैलास गोरंट्याल फेसबुकवर सक्रिय आहेत.राजकीय मंडळीही आता सोशल साईटस्ला एक आवश्यक तंत्र समजत आहेत. त्यासाठी लागणाऱ्या आवश्यकताही ते पूर्ण करीत आहेत. या कार्यामुळेच राजकीय मंडळी आपल्या टीमसोबत वाटचाल करीत आहे. तांत्रिकरीत्या सक्षम असलेले काही नेते आपले काम स्वत: करीत आहेत. काही जण असेही आहेत की, छंद आणि एकमेकांचे पाहून एकदा कार्याला सुरुवात करतात आणि नंतर नवीन परिवर्तन विसरून जातात. त्यामुळे सोशल नेटवर्किंगमध्ये त्यांची लोकप्रियता राहत नाही. सर्वसामान्यपणे सोशल नेटवर्किंगवर राजकीय नेत्यांच्या दैनंदिन उपक्रमाला प्राधान्यता देण्यात येत आहे. काही ठिकाणी तर संवादही ठेवण्यात येत आहे. व्हॉटस्अप सूचना पोहोचवण्यासाठी मोठे साधन ठरत आहे. कोणतीही सूचना कमी वेळेत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवता येते.शहरी भागात सोशल नेटवर्किंगची मोठी क्रेझ असली तरी ग्रामीण भागात बऱ्याच मर्यादा आहेत. अनेक दुर्गम भागांमध्ये इंटरनेटची चांगली सेवा मिळत नसल्याने मोबाईल ग्राहक या सेवेपासून वंचित आहेत. इंटरनेटमुळे मोबाईल कंपन्यांना चांगले दिवस प्राप्त झाले आहेत. त्यांना आपले जाळे असून पाहिजे तेवढे पसरविता आले नाही. देशात मोबाईलवर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या १४.८ एवढीच आहे. नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद आदी मोठ्या शहरांमध्ये मोबाईलचा वापर करणारे ३९.५ टक्के नागरिक आहेत. ग्रामीण भागात फक्त ३.७ टक्के नागरिक आहेत. ही परिस्थिती सर्व प्रयत्नांना खीळ घालणारी आहे. देशात मोबाईलवर इंटरनेट वापरणारे एकूण मोबाईल इंटरनेट यूजर्स- १४.८ टक्केशहरी मोबाईल इंटरनेट यूजर्स- ३९.५ टक्के(नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद आदी शहरे)ग्रामीण मोबाईल इंटरनेट युजर्स- ३.७ टक्केसर्वाधिक उपयोग- फेसबुक, व्हॉटस् अप आणि यू ट्यूब