शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

उतरला धरेवरी स्वर्ग हा नवा नवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:08 IST

पर्यटकांना भुरळ : गौताळा अभयारण्यात घडतेय निसर्गसौंदर्याचे दर्शन

सुरेश चव्हाणकन्नड : धुंद धुंद ही हवा, मंद मंद गारवाउतरला धरेवरी स्वर्ग हा नवा नवा!!या गीतातील अपेक्षित निसर्गसौंदर्य गौताळा अभयारण्यात फुलू लागल्याने हे सौंदर्य डोळ्यात साठविण्यासाठी पर्यटकांची पावले आता अभयारण्याकडे वळू लागली आहेत. सध्याच्या वातावरणात अभयारण्यात अधूनमधून पडणारा पाऊस, थंडगार हवा, पक्षांची किलबिल आणि सर्वत्र पसरलेली हिरवीगार चादर असे मनमोहक सौंदर्य काल्पनिक स्वर्गापेक्षा नक्कीच कमी नाही, असे उद्गार सहजच पर्यटकांच्या मुखातून बाहेर पडत आहेत.कन्नडपासून अवघ्या पाच कि.मी. अंतरावर नागद रस्त्यावर गौताळा अभयारण्य असून प्रवेशद्वारावर तपासणी नाका आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे अभयारण्यास बाधा पोहोचेल अशा वस्तू अथवा प्रतिबंधात्मक वस्तू नेण्यास प्रतिबंध करण्यास मदत होते. तपासणी नाक्यावर नोंद करून नियमाप्रमाणे शुल्क भरुन अभयारण्यात प्रवेश घेता येतो. अभयारण्य औरंगाबाद व जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर २६० चौ.कि.मी.क्षेत्रावर नैसर्गिक वनराईने व्यापलेले आहे. पानगळीचे जंगल असल्याने उन्हाळ्यात पानगळ होत असल्याने डोंगर उघडे, बोडखे दिसू लागतात. त्यामुळे उन्हाळ्यात अभयारण्यातील निसर्गसौंदर्य लोप पावते. मात्र पावसाळा सुरु झाला की डोंगरावर हिरव्यागार गवताची चादर पसरते तर वृक्षही हिरवा शालू पांघरतात. उन्हाळयात मुके झालेले झरे बोलू लागतात आणि हे सगळे सौंदर्य पाहून पक्षांचाही किलबिलाट वाढतो. मधूनच मोरांचा कर्णमधूर आवाज ऐकू येतो. अशा या सौंदर्यांची अनुभुती पर्यटकांना खुणावल्याशिवाय राहत नाही.बांधातील पाण्याने मिटली तहानअभयारण्यात ठिकठिकाणी बांधण्यात आलेले सिमेंट, मातीनाला बांधामध्ये पाणीसाठा होत आहे. त्यामुळे प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्यातरी मिटला आहे.ठिकठिकाणी व्ह्यू पॉइंट, धबधबेअभयारण्यात ठिकठिकाणी व्ह्यू पॉइंट, धबधबे, निरीक्षण टॉवर, पॅगोडा आहेत. अभयारण्यातील निसर्गाच्या मुक्त सौंदर्याची उधळण नजरेत साठविण्यासाठी परदेशी पर्यटकही अभयारण्याकडे वळू लागले आहेत. शुक्रवारी (६ जुलै) जपानच्या कॅटसुकी ओटा आणि हिरोशी अ‍ॅसेनो यांनी भेट देऊन निसर्गसौंदर्याचा आनंद लुटला. दरम्यान, पर्यटकांनी आनंद लुटताना, सेल्फी घेताना काळजी घ्यावी, असे आवाहन अभयारण्य सूत्रांनी केले आहे.

टॅग्स :forestजंगलRainपाऊस