शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
8
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
9
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
10
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
11
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
12
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
13
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
14
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
15
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
16
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
18
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
19
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
20
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

नवीन बायपासच्या कामाला ‘कोविड’मुळे ब्रेक; डिसेंबरअखेरचा मुहूर्त हुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 19:32 IST

जर मजूर टिकले असते, तर कन्नड घाटापर्यंतचे काम साधारणपणे मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे प्राधिकरणाचे उद्दिष्ट होते. 

ठळक मुद्देपरप्रांतीय मजूर गेल्यामुळे गती मंदावलीजून २०२१ पर्यंत काम पूर्ण करणार

- विजय सरवदे  

औरंगाबाद : ‘कोरोना’च्या भीतीपोटी बहुसंख्य परप्रांतीय मजूर गावी निघून गेल्यामुळे नवीन बीड बायपासच्या कामाची गती मंदावली आहे. सध्या हे काम बंद नसले तरी स्थानिक मजुरांच्या माध्यमातून हळूहळू सुरू आहे. येत्या काही दिवसांत परप्रांतीय मजूर कामावर परतले तर जून २०२१ पर्यंत नवीन बायपास वाहतुकीसाठी सज्ज होऊ शकतो. 

झाल्टा फाट्यापासून गेलेला सध्याचा बीड बायपास आता शहरात आलेला आहे. या रस्त्यावर प्रचंड वाहतूक वाढली असून, अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. दुसरीकडे, २० वर्षांत शहराचा झपाट्याने होणारा विकास व विस्तार आणि दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये उद्योग आल्यानंतर आताचे बायपास शहरामध्येच येतील. या उद्देशाने नवीन बायपासचे काम हाती घेण्यात आले. हा बायपास डिसेंबर २०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न होता; परंतु २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे कंत्राटदाराला काम अर्ध्यावरच थांबवावे लागले. त्यानंतर कामावर असलेल्या परप्रांतीय मजुरांनी कोरोनाच्या भीतीपोटी गावाचा रस्ता धरला. शासनाच्या सूचनेनुसार कामे सुरू करण्यात आली; पण त्यासाठी मजुरांची अडचण आली आहे. आता निपाणी ते करोडी आणि करोडी ते कन्नड घाटापर्यंतचे काम जून २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामार्ग प्राधिकरणाने निश्चित केले आहे. जर मजूर टिकले असते, तर कन्नड घाटापर्यंतचे काम साधारणपणे मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे प्राधिकरणाचे उद्दिष्ट होते. 

सोलापूर-कन्नड महामार्ग जून अखेरपर्यंतसोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील येडशी ते औरंगाबाद (टप्पा क्रमांक दोन) या जवळपास १९० किलोमीटर लांबीच्या चौपदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम मे २०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. या कामालाही लॉकडाऊनचा फटका बसला. जून २०२१ पर्यंत सोलापूर-कन्नड महामार्गाचे काम पूर्ण होईल, असा अंदाज प्राधिकरणाने व्यक्त केला आहे. 

भूसंपादनाचे अडथळे संपलेऔरंगाबादपासून कन्नड या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न होता; परंतु कोविड-१९ मुळे या महामार्गाचे काम शासन आदेशानुसार बंद ठेवण्यात आले होते. हा महामार्ग आता तो जून २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, पुन्हा लॉकडाऊनची अडचण येऊ नये. रस्त्यावरील भूसंपादनाचे सर्व अडथळे निकाली निघाले आहेत. काही आक्षेप येत आहेत. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत आक्षेप येतच राहतील. त्याचा कामावर परिणाम होणार नाही. - अजय गाडेकर, प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक