शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

नवीन बायपासच्या कामाला ‘कोविड’मुळे ब्रेक; डिसेंबरअखेरचा मुहूर्त हुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 19:32 IST

जर मजूर टिकले असते, तर कन्नड घाटापर्यंतचे काम साधारणपणे मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे प्राधिकरणाचे उद्दिष्ट होते. 

ठळक मुद्देपरप्रांतीय मजूर गेल्यामुळे गती मंदावलीजून २०२१ पर्यंत काम पूर्ण करणार

- विजय सरवदे  

औरंगाबाद : ‘कोरोना’च्या भीतीपोटी बहुसंख्य परप्रांतीय मजूर गावी निघून गेल्यामुळे नवीन बीड बायपासच्या कामाची गती मंदावली आहे. सध्या हे काम बंद नसले तरी स्थानिक मजुरांच्या माध्यमातून हळूहळू सुरू आहे. येत्या काही दिवसांत परप्रांतीय मजूर कामावर परतले तर जून २०२१ पर्यंत नवीन बायपास वाहतुकीसाठी सज्ज होऊ शकतो. 

झाल्टा फाट्यापासून गेलेला सध्याचा बीड बायपास आता शहरात आलेला आहे. या रस्त्यावर प्रचंड वाहतूक वाढली असून, अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. दुसरीकडे, २० वर्षांत शहराचा झपाट्याने होणारा विकास व विस्तार आणि दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये उद्योग आल्यानंतर आताचे बायपास शहरामध्येच येतील. या उद्देशाने नवीन बायपासचे काम हाती घेण्यात आले. हा बायपास डिसेंबर २०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न होता; परंतु २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे कंत्राटदाराला काम अर्ध्यावरच थांबवावे लागले. त्यानंतर कामावर असलेल्या परप्रांतीय मजुरांनी कोरोनाच्या भीतीपोटी गावाचा रस्ता धरला. शासनाच्या सूचनेनुसार कामे सुरू करण्यात आली; पण त्यासाठी मजुरांची अडचण आली आहे. आता निपाणी ते करोडी आणि करोडी ते कन्नड घाटापर्यंतचे काम जून २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामार्ग प्राधिकरणाने निश्चित केले आहे. जर मजूर टिकले असते, तर कन्नड घाटापर्यंतचे काम साधारणपणे मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे प्राधिकरणाचे उद्दिष्ट होते. 

सोलापूर-कन्नड महामार्ग जून अखेरपर्यंतसोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील येडशी ते औरंगाबाद (टप्पा क्रमांक दोन) या जवळपास १९० किलोमीटर लांबीच्या चौपदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम मे २०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. या कामालाही लॉकडाऊनचा फटका बसला. जून २०२१ पर्यंत सोलापूर-कन्नड महामार्गाचे काम पूर्ण होईल, असा अंदाज प्राधिकरणाने व्यक्त केला आहे. 

भूसंपादनाचे अडथळे संपलेऔरंगाबादपासून कन्नड या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न होता; परंतु कोविड-१९ मुळे या महामार्गाचे काम शासन आदेशानुसार बंद ठेवण्यात आले होते. हा महामार्ग आता तो जून २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, पुन्हा लॉकडाऊनची अडचण येऊ नये. रस्त्यावरील भूसंपादनाचे सर्व अडथळे निकाली निघाले आहेत. काही आक्षेप येत आहेत. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत आक्षेप येतच राहतील. त्याचा कामावर परिणाम होणार नाही. - अजय गाडेकर, प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक