शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

नवीन बीड बायपासला डिसेंबरअखेरपर्यंतचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 18:35 IST

१९० किलोमीटर लांबीच्या चौपदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

ठळक मुद्देयुद्धपातळीवर कामे सुरू  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा मानस

औरंगाबाद : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील येडशी ते औरंगाबाद (टप्पा क्रमांक दोन) या जवळपास १९० किलोमीटर लांबीच्या चौपदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, हे काम मार्च २०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने व्यक्त केला आहे. तथापि, झाल्टा फाट्यापासून निघालेल्या नवीन बीड बायपास ते कन्नड घाटापर्यंतचे काम साधारणपणे मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे प्राधिकरणाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये नवीन बीड बायपासच्या कामासाठी येणारे अडथळे आता जवळपास सर्वच निकाली निघाले असल्यामुळे हा बायपास डिसेंबर २०२० पर्यंत वाहतुकीसाठी सज्ज होईल, या दिशेने कामाला गती देण्यात आली आहे. मध्यंतरी राज्य राखीव पोलीस बलाकडून जमीन हस्तांतराचे काम रखडले होते. आता या कार्यालयाकडून जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले आहे. त्यामुळे या कामाने गती घेतली आहे. 

बहुप्रतीक्षित धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर ते येडशी या १०० किलोमीटरच्या टप्प्याचे संपूर्ण काम पूर्ण होऊन रस्त्याचे लोकार्पणही झाले आहे. टप्पा क्रमांक दोनच्या येडशी ते औरंगाबाद या महामार्गाच्या चौपदीरकरणाचे १९० किलोमीटरच्या कामासाठी जवळपास भूसंपादनाचे सर्व अडथळे दूर झाले असून आता अवघ्या दोन महिन्यांतच हे काम पूर्ण करण्यात येईल. सध्या या रस्त्यावरून वाहतूकही सुरू आहे. या रस्त्यावर तीन ठिकाणी ‘आयआरबी’ या कंत्राटदार कंपनीने टोलवसुलीही सुरू केली आहे. या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांचा वेग ताशी १०० ते १२० किलोमीटर एवढा असेल, असे या रस्त्याचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर औरंगाबाद ते बीडपर्यंत अवघ्या एका तासाच्या, तर सोलापूरपर्यंत तीन तासांत पोहोचणे शक्य होईल. हा महामार्ग  एक महत्त्वाचा टप्पा गाठणार असून, उत्तर भारताकडील उद्योग क्षेत्र आणि दक्षिणेकडील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला जोडणारा हा प्रमुख मार्ग असेल. 

औरंगाबाद-धुळे टप्पा प्रगतिपथावरया राष्ट्रीय महामार्गावरील औरंगाबादपासून धुळे येथपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे प्राधिकरणाचे प्रयत्न आहेत. या रस्त्यावरील काही ठिकाणी भूसंपादनाच्या अडचणी आहेत, त्याही लवकरात लवकर निकाली काढण्यात येतील. बीड बायपासच्या कामाचे सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. नवीन बीड बायपास ते कन्नड घाटापर्यंतचे काम पूर्ण करण्याची मार्च २०२१ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असली, तरी बीड बायपासचे काम साधारणपणे डिसेंबर २०२० अखेरपर्यंत पूर्ण होऊ शकते. - अजय गाडेकर, प्रकल्प संचालक 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गtourismपर्यटन