शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

संपूर्ण नागरिकत्वाचा विडा उचलण्याची गरज : गणेश देवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 20:12 IST

येत्या काही काळात ‘सिटीझनशिप अमेंडमेंट बिल’ मांडले जाणार आहे.

ठळक मुद्दे‘सिटीझनशिप अमेंडमेंट बिल’ मधून ज्यू आणि मुस्लिम यांचा उल्लेख कटाक्षाने टाळला

औरंगाबाद : येत्या काही काळात ‘सिटीझनशिप अमेंडमेंट बिल’ मांडले जाणार आहे. यामध्ये पाकिस्तान, अफगणिस्तान आणि बांगलादेश या देशांतून भारतात येणाऱ्या ख्रिश्चन, हिंदू, बुद्धिस्ट, पारशी किंवा जैन नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा उल्लेख आहे; परंतु यामध्ये ज्यू आणि मुस्लिम यांचा उल्लेख कटाक्षाने टाळला गेला आहे. हे खूप गंभीर असून, ज्याप्रमाणे गांधीजी आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा आग्रह केला होता, त्याचप्रमाणे आता आपण याविरुद्ध उठाव करून संपूर्ण नागरिकत्वाचा विडा उचलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी केले.

श्यामराव बोधनकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे डॉ. गणेश देवी यांना श्यामराव बोधनकर स्मृती पुरस्कार, तर कला संस्कृती वारसा अभ्यासक डॉ. दुलारी कुरेशी यांना इंद्रायणी बोधनकर पुरस्कार रविवारी सायंकाळी वसंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित सोहळ्यात स्वातंत्र्यसैनिक ताराबाई लढ्ढा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रा. राजाराम राठोड, स्वातंत्र्यसैनिक ना.वि. देशपांडे, राघवेंद्र चाकूरकर, डॉ. ऊर्मिला चाकूरकर व्यासपीठावर उपस्थित होते.सुरुवातीला अ‍ॅड. अभय राठोड, प्रवीण बोबडे यांनी स्फूर्तिगीत सादर केले. श्रीकांत उमरीकर यांनी संचालन केले. सुजाता जोशी-पाटोदेकर यांनी मानपत्राचे वाचन केले.

वडील आणि पतीच्या पाठिंब्याने घडलेलहानपणी वडील आम्हा बहिणींना घेऊन आवर्जून भारतभर विविध लेण्या पाहायला न्यायचे आणि त्याबाबतची सखोल माहिती द्यायचे. त्यांच्यामुळेच या लेण्या माझ्या डोक्यात भिनल्या आणि वडिलांनी याबाबतीत दाखविलेल्या सातत्यामुळेच मी घडत गेले. यानंतर पती रफत कुरेशी यांनीही माझ्या कामाला पाठिंबा दिला आणि माझे काम टिकून राहिले, असे डॉ. दुलारी कुरेशी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. डॉ. दुलारी यांनी औरंगाबादच्या इतिहासाविषयी सखोल माहिती देणारे एक पुस्तक लिहावे, असे ताराबाई यांनी सुचविले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGovernmentसरकारsocial workerसमाजसेवक