शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

संपूर्ण नागरिकत्वाचा विडा उचलण्याची गरज : गणेश देवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 20:12 IST

येत्या काही काळात ‘सिटीझनशिप अमेंडमेंट बिल’ मांडले जाणार आहे.

ठळक मुद्दे‘सिटीझनशिप अमेंडमेंट बिल’ मधून ज्यू आणि मुस्लिम यांचा उल्लेख कटाक्षाने टाळला

औरंगाबाद : येत्या काही काळात ‘सिटीझनशिप अमेंडमेंट बिल’ मांडले जाणार आहे. यामध्ये पाकिस्तान, अफगणिस्तान आणि बांगलादेश या देशांतून भारतात येणाऱ्या ख्रिश्चन, हिंदू, बुद्धिस्ट, पारशी किंवा जैन नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा उल्लेख आहे; परंतु यामध्ये ज्यू आणि मुस्लिम यांचा उल्लेख कटाक्षाने टाळला गेला आहे. हे खूप गंभीर असून, ज्याप्रमाणे गांधीजी आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा आग्रह केला होता, त्याचप्रमाणे आता आपण याविरुद्ध उठाव करून संपूर्ण नागरिकत्वाचा विडा उचलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी केले.

श्यामराव बोधनकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे डॉ. गणेश देवी यांना श्यामराव बोधनकर स्मृती पुरस्कार, तर कला संस्कृती वारसा अभ्यासक डॉ. दुलारी कुरेशी यांना इंद्रायणी बोधनकर पुरस्कार रविवारी सायंकाळी वसंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित सोहळ्यात स्वातंत्र्यसैनिक ताराबाई लढ्ढा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रा. राजाराम राठोड, स्वातंत्र्यसैनिक ना.वि. देशपांडे, राघवेंद्र चाकूरकर, डॉ. ऊर्मिला चाकूरकर व्यासपीठावर उपस्थित होते.सुरुवातीला अ‍ॅड. अभय राठोड, प्रवीण बोबडे यांनी स्फूर्तिगीत सादर केले. श्रीकांत उमरीकर यांनी संचालन केले. सुजाता जोशी-पाटोदेकर यांनी मानपत्राचे वाचन केले.

वडील आणि पतीच्या पाठिंब्याने घडलेलहानपणी वडील आम्हा बहिणींना घेऊन आवर्जून भारतभर विविध लेण्या पाहायला न्यायचे आणि त्याबाबतची सखोल माहिती द्यायचे. त्यांच्यामुळेच या लेण्या माझ्या डोक्यात भिनल्या आणि वडिलांनी याबाबतीत दाखविलेल्या सातत्यामुळेच मी घडत गेले. यानंतर पती रफत कुरेशी यांनीही माझ्या कामाला पाठिंबा दिला आणि माझे काम टिकून राहिले, असे डॉ. दुलारी कुरेशी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. डॉ. दुलारी यांनी औरंगाबादच्या इतिहासाविषयी सखोल माहिती देणारे एक पुस्तक लिहावे, असे ताराबाई यांनी सुचविले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGovernmentसरकारsocial workerसमाजसेवक