शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

असे बँक अधिकारी हवेत! मजुराच्या मृत्यूनंतर खात्यात अल्प रक्कम,तरीही पत्नीस मिळवून दिले ४ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 17:39 IST

मजुराचे अपघाती निधन झाले, हतबल पत्नी बँक खात्यातील रक्कम काढण्यास गेली

- दत्ताञय पवार करंजखेड (औरंगाबाद ): बँकेत कृषीविमा, दैनदिन व्यवहार पूर्तता करताना अनेकांना बकेतील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कटू अनुभव आले असतील. मात्र, एका मजुराच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीस खात्यात अल्प रक्कम असतानाही ४ लाख रुपयांचे अर्थसहाय्य जागरूक बँक व्यवस्थापकामुळे मिळाले आहे. या सुखद घटनेसोबतच या बँक शाखेने विक्रमी ७ कोटी रुपयांचा पिक विमा वाटप केल्याने शेतकऱ्यातून आनंद व्यक्त होत आहे.

कन्नड तालुक्यात करंजखेड येथे इंडियन बँकेची शाखा आहे. नागापुर ( ता.कन्नड ) येथील मजूर विष्णू लालचंद जाधव यांचा काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. विष्णू जाधव यांचे येथील इंडियन बँकेच्या शाखेत खाते होते. विष्णू जाधव यांच्या पत्नी संगीताबाई पतीचे पासबुक घेऊन खात्यात काही रक्कम असेल तर काढण्यासाठी शाखेत आल्या. येथे शाखा व्यवस्थापक सौरभ येगावकर यांची भेट घेऊन पतीच्या खात्यावर काही रक्कम असेल तर सर्व बाबींची पूर्तता करून देण्याची विंनती केली. 

दरम्यान, व्यवस्थापक सौरभ यांनी विष्णू जाधव यांच्या खात्याची तपासणी केली. यावेळी खात्यात अल्प रक्कम होती. मात्र, विष्णू जाधव यांनी पंतप्रधान सुरक्षा विमा व जिवन ज्योती विमा घेतलेला होता. त्यानंतर अधिकारी नागनाथ साखरे यांनी संगीता जाधव यांच्याकडून आवश्यक ती कागदपत्रे जमा केली. पाठपुरावा करत दोन्ही विम्यातून त्यांना प्रत्येकी दोन असे चार लाख रुपये मिळवून दिले. घरातील एकमेव कमावता पुरुष पतीच्या मृत्यूनंतर समोर अंधकार असताना संगीता जाधव यांना मोठे आर्थिक पाठबळ मिळवून देण्याऱ्या जागरूक बँक अधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पिकविम्याचे उद्दिष्ट ३ कोटींचे वाटप सात कोटी..किसान विकास योजना अंतर्गत येथील शाखेस ३ कोटी रुपयांचे पिक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट होते. परंतु, शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पिक कर्जाची मागणी होत होती. यामुळे यावर्षी शाखेने ५०० शेतकऱ्यांना तब्बल सात कोटी रुपयांच्या पिक कर्जाचे वाटप केले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येथील शेतकरी दरवर्षी पिककर्ज वेळेवर भरतात,  थकबाकी ठेवत नाहीत, अशी माहिती शाखा व्यवस्थापक सौरभ गोविंदराव येगावकर यांनी दिली. बँकेच्या शेतकरी हिताच्या कामांमुळे गावातील कौतिकराव जाधव, बाळासाहेब पवार, विनायकराव काळे, राजेंद्र बोरसे आदी शेतकऱ्यांनी व्यवस्थापक सौरभ येंगावकर, अधिकारी नागनाथ साखरे यांच्यासह कर्मचाऱ्यांचे स्वागत केले आहे.

टॅग्स :bankबँकAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू