शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

भाषा विकासासाठी सर्वसमावेशक संमेलनांची गरज, लोकमत परिचर्चेत लेखक, प्रकाशक व वाचकांनी व्यक्त केले मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 20:07 IST

लोकमत भवन येथे पार पडलेल्या या परिचर्चेत समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रकाशक श्याम देशपांडे, प्रा. कैलास अंभुरे, प्रा. प्रतिभा अहिरे, कवयित्री प्रिया धारूरकर आणि पुस्तक चावडीचे सारंग टाकळकर यांनी सहभाग घेतला होता.

मयूर देवकरऔरंगाबाद : ‘समाजातील सर्व घटकांना समान प्रतिनिधित्व मिळवून देणाºया सर्वसमावेशक संमेलनाची आजच्या काळात गरज आहे. तरच भाषेचा विकास होईल. अन्यथा केवळ तीन दिवसांचा उत्सव याखेरीज संमेलनांना काहीच महत्त्व उरणार नाही, असे मत औरंगाबाद शहरातील साहित्यिक, प्रकाशक आणि लेखकांनी ‘लोकमत’तर्फे  आयोजित परिचर्चेत व्यक्त केले. 

शनिवारी लोकमत भवन येथे पार पडलेल्या या परिचर्चेत समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रकाशक श्याम देशपांडे, प्रा. कैलास अंभुरे, प्रा. प्रतिभा अहिरे, कवयित्री प्रिया धारूरकर आणि पुस्तक चावडीचे सारंग टाकळकर यांनी सहभाग घेतला होता.

९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर संमेलनाच्या स्वरुपाच्या ठरलेल्या चौकटींच्या मर्यादा व नवे पर्याय याविषयी साहित्य वर्तुळातील मान्यवरांकडून जाणून घेण्यासाठी या परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. कांबळे यांनी संमेलनाध्यक्षांनी केवळ भाषणे करीत राहण्यापेक्षा नवसाहित्यिकांचा विकास करण्यासाठी कार्यशाळा व उपक्रम होती घेण्याचा सल्ला दिला. एकदा सहभागी झालेल्या लेखकांना किमान दोन वर्षे तरी बोलवू नये. त्यामुळे नवीन लोकांना संधी मिळेल, अशी डॉ. अंभुरे यांनी सूचना केली.

‘प्रकाशकांची त्यांच्या लेखी काही किंमत नाही. त्यामुळे आता प्रकाशकांनाही अशा संमेलनांविषयी फारसे स्वारस्य वाटत नाही’ असे देशपांडे म्हणाले. डॉ. अहिरे म्हणाल्या की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये समाजातील विविध घटकांना जे प्रतिनिधित्व मिळायला हवे ते मिळत नाही. त्यामुळेच विविध छोटी-छोटी संमेलने होऊ लागली. 

टाकळकर यांनी सांगितले की, संमेलनाला उत्सवी स्वरूप देऊन ती ‘इव्हेंट’ म्हणूनच गाजविली जातात. ‘केवळ आपल्या मर्जीतील किंवा ‘अभय’ असणाºयांनाच येथे संधी मिळते. विरोध करणाºया अनेक लेखक-कवींना जाणूनबुजून बाजूला केले जाते, असे धारूरकर म्हणाल्या.

- घटक संस्थांच्या सर्व आजीवन सभासदांना मतदानाचा अधिकार द्यावा, मतदारांची संख्या वाढवावी.- गट, वर्तुळ, धर्म, प्रदेश, विचारधारा, लिंग यापलीकडे जाऊन लेखकांना सामावून घेणे.- परिसंवादातील कालबाह्य झालेले विषय बदलून समकालीन विषयांवर चर्चा घडवून आणावी.- समाजातील सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळणे.- संमेलनाला उत्सवी रूप नाही तर सामाजिक-सांस्कृतिक चळवळीचे स्वरूप देणे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद