शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

औरंगाबादमधील ‘मेडिकल टुरिझम’ला हवे ‘टेकआॅफ’चे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 15:28 IST

मेडिकल टुरिझम वाढीसाठी विमानसेवेचा विस्तार होणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देविमानसेवा वाढीकडे लक्ष देण्याची गरज  परदेशांतून उपचाराकरिता शहरात येण्यासाठी मिळावे प्रोत्साहन

औरंगाबाद : शहरात पुणे, मुंबईसारख्या महानगरांप्रमाणे वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. उपचाराचा खर्चही तुलनेत औरंगाबादेत कमी आहे. त्यामुळे औरंगाबादला मेडिकल टुरिझम खुणावत आहे; परंतु मर्यादित विमानसेवेमुळे त्यास खोडा बसतो. त्यामुळे मेडिकल टुरिझम वाढीसाठी आणि रुग्णांच्या उपचारासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा विस्तार होणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

चिकलठाणा विमानतळावर सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रू जेट कंपनीची विमानसेवा सुरूआहे. या तीन कंपन्यांच्या सेवेमुळे औरंगाबाद, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडलेले आहे. एकेकाळी शहरातील बहुतांश हृदयरोगी उपचारासाठी पुणे-मुंबई येथे जात होते. मात्र, आता हृदयरोगावरील उपचार, अवयव प्रत्यारोपासह बहुतांश आजारांवरील उपचार शहरातच शक्य झाले आहेत. शहरात अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त रुग्णालये आणि तज्ज्ञ डॉक्टर आहेत. विविध रुग्णालयांमध्ये परदेशातून आजघडीला ४०० ते ५०० परदेशी रुग्ण दरवर्षी उपचारासाठी दाखल होतात. विशेषत: आखाती देशांतून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी पाहण्यास जगभरातून पर्यटक येतात. पर्यटनासोबतच वैद्यकीय उपचारासाठी शहरात अधिक संख्येने परदेशी रुग्ण येण्यासाठी मेडिकल टुरिझमसाठी प्रयत्न हवे. त्यासाठी विमानसेवेत वाढ होणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  शासनाच्या अनास्थेमुळे औरंगाबादेत मेडिकल टुरिझम वाढीसाठी फारसे प्रयत्न होत नाही. सध्या परदेशी रुग्णांना शहरात आकर्षित करण्यासाठी केवळ रुग्णालयांकडून प्रयत्न होत आहेत; परंतु विमानसेवेसह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यास वैद्यकीय क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल,असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

विमानसेवा वाढावीवैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने विमानसेवा वाढली पाहिजे. सोबतच शहरातील रस्त्यांचा आणि शहराचा विकास करण्याची गरज आहे. हा विकास झाला तरच मेडिकल टुरिझम वाढीला हातभार लागेल.-डॉ. कुलदीपसिंग राऊळ,अध्यक्ष, आयएमए

ठराविक वेळेचे गणितरुग्ण, डॉक्टर आणि अवयव यांच्या वाहतुकीच्या दृष्टीने विमानसेवेत वाढ झाली पाहिजे. हृदय, यकृतासारखे अवयव प्रत्यारोपण हे ठराविक वेळेच्या आत होणे गरजेचे असते. नोंदणी झालेल्या रुग्णाचे उपलब्ध अवयव गतीने हलविता आले पाहिजे.-डॉ. अजय रोटे, सीईओ, युनायटेड सिग्मा हॉस्पिटल

कनेक्टिव्हिटी महत्त्वाचीशहरात वैद्यकीय उपचाराचे दर मुंबई, पुण्याच्या तुलनेत कमी आहे. सध्या आखाती देशांतून उपचारासाठी येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मेडिकल टुरिझम वाढीसाठी हवाई कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असून त्यात वाढ झाली पाहिजे.-डॉ. विकास देशमुख, अध्यक्ष, सर्जिकल सोसायटी 

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळMedicalवैद्यकीयairplaneविमानAurangabadऔरंगाबादCentral Governmentकेंद्र सरकार