शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमधील ‘मेडिकल टुरिझम’ला हवे ‘टेकआॅफ’चे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 15:28 IST

मेडिकल टुरिझम वाढीसाठी विमानसेवेचा विस्तार होणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देविमानसेवा वाढीकडे लक्ष देण्याची गरज  परदेशांतून उपचाराकरिता शहरात येण्यासाठी मिळावे प्रोत्साहन

औरंगाबाद : शहरात पुणे, मुंबईसारख्या महानगरांप्रमाणे वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. उपचाराचा खर्चही तुलनेत औरंगाबादेत कमी आहे. त्यामुळे औरंगाबादला मेडिकल टुरिझम खुणावत आहे; परंतु मर्यादित विमानसेवेमुळे त्यास खोडा बसतो. त्यामुळे मेडिकल टुरिझम वाढीसाठी आणि रुग्णांच्या उपचारासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा विस्तार होणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

चिकलठाणा विमानतळावर सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रू जेट कंपनीची विमानसेवा सुरूआहे. या तीन कंपन्यांच्या सेवेमुळे औरंगाबाद, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडलेले आहे. एकेकाळी शहरातील बहुतांश हृदयरोगी उपचारासाठी पुणे-मुंबई येथे जात होते. मात्र, आता हृदयरोगावरील उपचार, अवयव प्रत्यारोपासह बहुतांश आजारांवरील उपचार शहरातच शक्य झाले आहेत. शहरात अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त रुग्णालये आणि तज्ज्ञ डॉक्टर आहेत. विविध रुग्णालयांमध्ये परदेशातून आजघडीला ४०० ते ५०० परदेशी रुग्ण दरवर्षी उपचारासाठी दाखल होतात. विशेषत: आखाती देशांतून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी पाहण्यास जगभरातून पर्यटक येतात. पर्यटनासोबतच वैद्यकीय उपचारासाठी शहरात अधिक संख्येने परदेशी रुग्ण येण्यासाठी मेडिकल टुरिझमसाठी प्रयत्न हवे. त्यासाठी विमानसेवेत वाढ होणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  शासनाच्या अनास्थेमुळे औरंगाबादेत मेडिकल टुरिझम वाढीसाठी फारसे प्रयत्न होत नाही. सध्या परदेशी रुग्णांना शहरात आकर्षित करण्यासाठी केवळ रुग्णालयांकडून प्रयत्न होत आहेत; परंतु विमानसेवेसह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यास वैद्यकीय क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल,असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

विमानसेवा वाढावीवैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने विमानसेवा वाढली पाहिजे. सोबतच शहरातील रस्त्यांचा आणि शहराचा विकास करण्याची गरज आहे. हा विकास झाला तरच मेडिकल टुरिझम वाढीला हातभार लागेल.-डॉ. कुलदीपसिंग राऊळ,अध्यक्ष, आयएमए

ठराविक वेळेचे गणितरुग्ण, डॉक्टर आणि अवयव यांच्या वाहतुकीच्या दृष्टीने विमानसेवेत वाढ झाली पाहिजे. हृदय, यकृतासारखे अवयव प्रत्यारोपण हे ठराविक वेळेच्या आत होणे गरजेचे असते. नोंदणी झालेल्या रुग्णाचे उपलब्ध अवयव गतीने हलविता आले पाहिजे.-डॉ. अजय रोटे, सीईओ, युनायटेड सिग्मा हॉस्पिटल

कनेक्टिव्हिटी महत्त्वाचीशहरात वैद्यकीय उपचाराचे दर मुंबई, पुण्याच्या तुलनेत कमी आहे. सध्या आखाती देशांतून उपचारासाठी येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मेडिकल टुरिझम वाढीसाठी हवाई कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असून त्यात वाढ झाली पाहिजे.-डॉ. विकास देशमुख, अध्यक्ष, सर्जिकल सोसायटी 

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळMedicalवैद्यकीयairplaneविमानAurangabadऔरंगाबादCentral Governmentकेंद्र सरकार