शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

नाशिक,नगरमधून पाणी सोडा; राष्ट्रवादी काँग्रेसचे जायकवाडी धरणात जल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 13:57 IST

समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात त्वरित पाणी सोडण्याची मागणी करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज जायकवाडी धरणात आंदोलन केले.

औरंगाबाद : समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात त्वरित पाणी सोडण्याची मागणी करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज जायकवाडी धरणात जल आंदोलन केले. माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पुढील १० दिवसात पाणी सोडण्यात आले नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. 

जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्र व धरणाच्यावरील बाजूस यावर्षी अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. यामुळे धरणात जेमतेमच पाणीसाठा शिल्लक आहे. या दुष्काळी परिस्थितीत आमागी काळात मराठवाड्यावर भीषण पाणी टंचाईचे संकट येऊ शकते. यावर गोदावरी पाटबंधारे विभागाने बैठक घेऊन नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून समन्यायी पाणी वाटपानुसार जायकवाडी धरणात ७ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. मात्र अद्याप पाणी सोडण्यात आले नाही. यामुळे विभागाने जायकवाडी धरणात त्वरित पाणी सोडावे, तसेच येत्या दहा दिवसात धरणात १२ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने धरणात जल आंदोलन केले. 

माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाण्यात उतरून जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात तालुका अध्यक्ष विजय गोरे, शहराध्यक्ष भाऊ निवारे, नगरसेवक जितु परदेशी, इरफान बागवान, ज्ञानेश घोडके, अरुण पाटील काळे, रघुनाथ ठोबरे, डॉ. गुलदाद पठाण, अनिल हजारे, गोविंदतात्या शिंदे, विशाल  वाघचौरे, भाऊसाहेब तरमळे आदींचा सहभाग होता. अनुचित प्रकार घडू नये यासाठी जलतरण पथक, अग्निशमक पथक व पोलीस निरीक्षक चंदन इमले, सपोनि ज्ञानेश्वर पायघन यांच्यासह पोलीस कर्मचारी, अभियंता बुद्धभूषण दाभाडे, अभियंता अशोक चव्हाण यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणNCPराष्ट्रवादी काँग्रेसWaterपाणीagitationआंदोलन