शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

नाशिक,नगरमधून पाणी सोडा; राष्ट्रवादी काँग्रेसचे जायकवाडी धरणात जल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 13:57 IST

समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात त्वरित पाणी सोडण्याची मागणी करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज जायकवाडी धरणात आंदोलन केले.

औरंगाबाद : समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात त्वरित पाणी सोडण्याची मागणी करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज जायकवाडी धरणात जल आंदोलन केले. माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पुढील १० दिवसात पाणी सोडण्यात आले नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. 

जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्र व धरणाच्यावरील बाजूस यावर्षी अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. यामुळे धरणात जेमतेमच पाणीसाठा शिल्लक आहे. या दुष्काळी परिस्थितीत आमागी काळात मराठवाड्यावर भीषण पाणी टंचाईचे संकट येऊ शकते. यावर गोदावरी पाटबंधारे विभागाने बैठक घेऊन नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून समन्यायी पाणी वाटपानुसार जायकवाडी धरणात ७ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. मात्र अद्याप पाणी सोडण्यात आले नाही. यामुळे विभागाने जायकवाडी धरणात त्वरित पाणी सोडावे, तसेच येत्या दहा दिवसात धरणात १२ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने धरणात जल आंदोलन केले. 

माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाण्यात उतरून जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात तालुका अध्यक्ष विजय गोरे, शहराध्यक्ष भाऊ निवारे, नगरसेवक जितु परदेशी, इरफान बागवान, ज्ञानेश घोडके, अरुण पाटील काळे, रघुनाथ ठोबरे, डॉ. गुलदाद पठाण, अनिल हजारे, गोविंदतात्या शिंदे, विशाल  वाघचौरे, भाऊसाहेब तरमळे आदींचा सहभाग होता. अनुचित प्रकार घडू नये यासाठी जलतरण पथक, अग्निशमक पथक व पोलीस निरीक्षक चंदन इमले, सपोनि ज्ञानेश्वर पायघन यांच्यासह पोलीस कर्मचारी, अभियंता बुद्धभूषण दाभाडे, अभियंता अशोक चव्हाण यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणNCPराष्ट्रवादी काँग्रेसWaterपाणीagitationआंदोलन