शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पुनर्बांधणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 16:41 IST

ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. त्यामुळे पक्षाची पुनर्बांधणी करावी लागणार आहे.

औरंगाबाद : मुंबई ते नागपूर असा समृद्धी महामार्ग बनविण्यात येत आहे. या महामार्गाला कोणतीही बँक कर्ज देण्यास तयार होत नाही. या प्रकल्पामागे आर्थिक व्यवहार्यता नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे तत्कालीन राज्य शासनाने म्हाडा, सिडकोसारख्या समृद्ध महामंडळाकडून कर्ज घेतले आहे. यातून राज्याची आर्थिक शिस्त बिघडली असल्याचा आरोप मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी गुरुवारी केला.

मराठवाड्याचा युवावक्ता वक्तृत्व स्पर्धेच्या आयोजनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. याकडे लक्ष वेधले असता, चव्हाण म्हणाले, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. त्यामुळे पक्षाची पुनर्बांधणी करावी लागणार आहे. याविषयीचा निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी वरिष्ठ मंत्री, नेत्यांना दिली जाणार आहे. 

बीड, जालना, परभणी जिल्ह्यांत संघटनात्मक बाजू मजबूत आहे. त्यामुळे प्रदेश पातळीवरूनच उर्वरित जिल्ह्यांत पुनर्बांधणीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठवाड्यातील राष्ट्रवादीची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ईडीची नोटीस, पावसातील सभा आणि एकटे पाडण्याचा परिणाम राष्ट्रवादीपासून दूर गेलेला युवक परत आला आहे. त्याचा फायदाही पक्षबांधणीला होणार असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले.

संघातील अनेकांचे अर्ज दाखल केलेमराठवाडा पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणीची तयारी पूर्णत्वाकडे पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आपल्याकडून अनेकांचे फॉर्म दाखल केले असल्याचे विचारले असता, त्यांनी हा आरोप फेटाळून लावला. भाजप समर्थकच नव्हे तर संघाच्या अनेकांचे फॉर्म माझ्या कार्यालयामार्फत भरण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठीचा पुरावाही त्यांनी दिला. 

वॉटर ग्रीड प्रकल्प ही निव्वळ धूळफेकभाजपच्या काळात मराठवाड्यात पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर ग्रीड योजना राबविणार असल्याचे सांगितले होते. ही निव्वळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याच्या योजनेला विरोध नाही. मात्र वैनगंगा, पैनगंगा आदी नद्यांचे पाणी जायकवाडीत आणण्याचे स्वप्न रंगविले जाते. मात्र प्रत्यक्षात ते शक्य नाही. या योजनेची उपयोगिता तपासण्यासाठी इस्रायल कंपनीला काम दिले आहे. हासुद्धा पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप आ. चव्हाण यांनी केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSatish Chavanसतीश चव्हाणMarathwadaमराठवाडाMSP Mandalमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ