शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जलवाहिनी पुन्हा फुटली; जुन्या औरंगाबादमध्ये तीन दिवस जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 12:51 IST

एसएससी बोर्डाजवळ ७०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी साचले.

ठळक मुद्देतातडीने जलवाहिनीद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद जलवाहिनी सिमेंटची असल्यामुळे तिची निर्वहन क्षमता संपुष्टात

औरंगाबाद : जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी गुरुवारी सकाळी एसएससी बोर्डाजवळ फुटल्यामुळे पुढील तीन दिवस जुन्या शहराला उशिराने पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. 

जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा तातडीने बंद करण्यात आला असून दुरुस्तीसाठी तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता एसएससी बोर्डाजवळ ७०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी साचले. 

कार्यकारी अभियंता किरण धांडे, उपअभियंता के. एम. फालक यांनी तातडीने जलवाहिनीद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद केला. सदरील जलवाहिनी सिमेंटची असल्यामुळे तिची निर्वहन क्षमता संपुष्टात आली आहे. त्या आकाराची पाईप शहरात उपलब्ध नसल्यामुळे तातडीने दुरुस्ती शक्य नाही. त्याकरिता धुळे येथे कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले असून, रिंग व इतर साहित्य आणले जाणार आहे. तोपर्यंत जलवाहिनी बंद असणार आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादWaterपाणी