शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी रस्त्यावर !

By admin | Updated: January 9, 2017 23:42 IST

उस्मानाबाद : केंद्र शासनाने केलेल्या नोटबंदीमुळे शेतकऱ्यांसह शेतमजूर, व्यापारी आणि लहान-मोठे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

उस्मानाबाद : केंद्र शासनाने केलेल्या नोटबंदीमुळे शेतकऱ्यांसह शेतमजूर, व्यापारी आणि लहान-मोठे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अक्षरश: खिळखिळी झाली आहे. चलन तुटवडा असल्याने बाजारपेठेतही शुकशुकाट आहे. शेतीमालाला उठाव नसल्याने शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. असे असतानाही शासनाकडून कुठल्याही स्वरूपाच्या ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाभरात आंदोलने करण्यात आली. नळदुर्गसह उमरग्यात रास्तारोको, तर कळंब, भूम, परंडा, लोहारा आणि वाशी येथे धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाने ८ नोव्हेंबरच्या रात्री अचानक नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयान्वये पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. तेव्हापासून ते आजतागायत जिल्हाभरात चलनकल्लोळ सुरूच आहे. या नोटबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांसह शेतमजुरांना बसला आहे. शेतीमालाचे दर प्रचंड घसरले आहेत. असे असतानाही शासनाकडून ग्रामीण भागात आवश्यकतेनुसार चलन उपलब्ध करून दिले जात नाही. शासनाच्या या धोरणाविरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवारी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आंदोलने करून उपरोक्त प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. तहसील कार्यालयावर मोर्चापरंडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये तालुकाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, नवनाथ जगताप, शहराध्यक्ष वाजीद दखणी, युवक तालुकाध्यक्ष धनंजय हांडे, अ‍ॅड. सुभाष वेताळ, बापू मिस्किन, भाऊसाहेब खरसडे, अ‍ॅड. जफर जिनेरी, अ‍ॅड. सुहास पाटील, राहुल बनसोडे, जावेद पठाण, राजकुमार देशमुख, रवी मोरे, अमोल जगताप, सचिन पाटील, सुधाकर कोकाटे, घनशाम शिंदे, पोपट चव्हाण, महावीर भोई, नंदू शिंदे, श्रीहरी नाईकवाडी, विक्रम ढोरे, नाना मांडवेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चानंतर कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन सरकारविरोधी घोषणाबाजी केली. पदाधिकाऱ्यांच्या हस्ते तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना निवेदन देण्यात आले.लोहाऱ्यात धरणे आंदोलनलोहारा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने लोहारा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अच्युत साठे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, युवक तालुकाध्यक्ष अजित जाधव, उपनगराध्यक्षा नाजमीन शेख, बाजार समितीचे माजी सभापती दयानंद गिरी, बाजार समितीचे संचालक अनंत गोरे, गटनेते गगन माळवदकर, नगरसेवक आयुब शेख, नगरसेविका जयश्रीताई वाघमारे, शहराध्यक्ष आयुब हबीब शेख, नरदेव कदम, विजयकुमार लोमटे, कानेगावचे माजी सरपंच उज्वल कदम, प्रकाश भगत, दिलीप शिंदे, गोविंद साळुंके, बळीराम लव्हळे, निहाल मुजावर, सुरेश दंडगुले, जाकीर कुरेशी आदी उपस्थित होते.कळंबमध्ये ‘जनआक्रोश’केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ कळंबमध्ये ‘जनआक्रोश’ आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आाले. यावेळी कळंब पालिकेच्या नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे, तालुकाध्यक्ष रामहारी शिंदे, भास्कर खोसे, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती धनंजय वाघमारे, श्रीधर भवर, विकास बारकूल, प्रा. तुषार वाघमारे, शहराध्यक्ष सागर मुंडे, संदीप मडके, प्रा.संजय कांबळे, इंद्रजीत गायकवाड, अमर गायकवाड, औदुंबर धोंगडे, बालाजी भातलवंडे, संदीप मडके, प्रणव चव्हाण, तारीक मिर्झा आदी उपस्थित होते.भूममध्येही धरणे आंदोलननोटबंदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेठीस धरल्याचा आरोप करीत भूममध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार राहुल मोटे, तालुकाध्यक्ष हनुमंत पाटुळे, प्रतीकसिंह पाटील, ज्ञानेश्वर गीते, अरूण सोन्ने, सतीश सोन्ने, सभापती शिवाजी जालन, प्रवीण खटाळ, सभापती संजय पाटील, राहुल पाटील, संजय बोराडे, श्रीहरी बारस्कर, उध्दवराजे सस्ते, सुग्रीव दराडे, आदिनाथ पालके, राजकुमार घरत, राजाभाऊ हुंबे, दिग्विजय लोंढे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनउस्मानाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश देशमुख, माजी नगराध्यक्ष संपत डोके, रामचंद्र पाटील, सभापती सुनिल खळदकर, सतीश दंडनाईक, भारत डोलारे, नगरसेवक अभय इंगळे, प्रदीप मुंडे, खलिफा कुरेशी, अभिजित काकडे, रोहित निंबाळकर, अमित शिंदे, दत्ता पेठे, ओम मगर, राजसिंह राजेनिंबाळकर, कैैलास पाटील, डॉ. इंद्रजित जाधव, अमित पडवळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी शासन धोरणविरोधी घोषणाबाजी केली.(प्रतिनिधी)