शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतीदिनी चेतविला राष्ट्राभिमान! १५ हजार विद्यार्थ्यांचे औरंगाबादेत सामुहिक राष्ट्रगीत गायन

By विजय सरवदे | Updated: August 9, 2022 13:58 IST

विभागीय क्रीडासंकुलात सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात 

औरंगाबाद : आझादीच्या अमृत महोत्सवानिमित्त मंगळवारी सकाळी विभागीय क्रीडा संकुलात सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांच्या समुह राष्ट्रगीत गायनाने उपस्थितांच्या मनात राष्ट्राभिमान पेटवीला. स्वराज्य महोत्सवांतर्गत क्रांती दिनी जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमास शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर विविध गीतांवर नृत्य व गायन सादर केले. यामध्ये शारदामंदीर विद्यालय, एलोरा विद्यालय, वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय यांच्या चमूने राष्ट्रभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. कार्यक्रमात खासदार इम्तीयाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, ब्रिगेडियर सुनील नारायण, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, पोलीस अधीक्षक मनीष कलावानीया, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम व देशाप्रति आदर व्यक्त करण्याच्या भावनेने उत्सफूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतूक केले.

केंद्र सरकारच्या अग्नीवीर या सैन्यभरतीच्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन राष्ट्रकार्यासाठी सिद्ध व्हावे. त्याचप्रमाणे देशाला मजबूत आणि विकासाकडे घेऊन जाणारी भावी पिढी राष्ट्रप्रेमाने कार्यरत राहावी. यासाठी शिक्षण, प्रशिक्षण विद्यार्थ्यांनी घ्यावे, असे आवाहन आमदार हरिभाऊ बागडे यांनी केले. तीन रंगाच्या कॅप घालून ज्याप्रमाणे तिरंगा स्वरुपात विद्यार्थी या राष्ट्रगीत कार्यक्रमात सहभागी झाले आहेत, त्याप्रमाणे आपला देश विविधतेतून एकतेचे प्रतिक आहे. पारतंत्र्यातून आपण जसे स्वतंत्र झालो तसे आता बेरोजगारी, गरिबी यांच्यामधून मुक्त होण्यासाठी भावी पिढीने एकत्र मिळून प्रयत्न करावेत, असे खासदार इम्तीयाज जलील म्हणाले.

७७ शाळा, महाविद्यालयांचा सहभागजिल्ह्यातील ७७ शाळा आणि महाविद्यालयांतील सुमारे १५ हजार विद्यार्थी, पालक सर्व शासकीय कार्यालयांचे विभागप्रमूख, कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIndependence Dayस्वातंत्र्य दिन