शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पैठणच्या नाथनगरीचे रूपडे पालटणार; कीर्तन मंडपातून दिसेल गोदावरी, नाथसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 20:02 IST

औरंगाबादच्या पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टीने पैठण आगामी काळात आकर्षणाचा भाग ठरेल. 

ठळक मुद्देनूतनीकरणाची २० कोटींची कामे होणार प्रसादालय, कीर्तन मंडप, पडसाळ या ठिकाणाचे नूतनीकरण

- विकास राऊत 

औरंगाबाद : मराठवाड्यातील वारकऱ्यांसह सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या पैठण तीर्थक्षेत्राचे रूपडे हळूहळू पालटत असून, आगामी काळात जिल्ह्यातील महत्त्वाचे धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून संत एकनाथ महाराज समाधी मंदिर परिसर उदयास येणार आहे. 

२०११ साली शासनाने केलेल्या २१२ कोटींच्या एकूण तरतुदीपैकी आजवर १२५ कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. आता जिल्हा प्रशासनाने २० कोटी रुपयांच्या प्रसादालय, कीर्तन मंडप, पडसाळ नूतनीकरणाच्या कामांना मंजुरी दिली आहे. ही नवीन कामे नसून शासनाने प्राधिकरण आणि डीपीसीत मंजूर केलेली कामे आहेत. यासाठीचा निधी प्राधिकरणाच्या खात्यावर कोरोनाच्या संकटापूर्वीच आलेला आहे. मंदिर परिसरातील पडसाळ लाकूड आणि दगडांनी बांधले जाणार असून, त्यासाठी साडेचार कोटींचा खर्च होणार आहे. कामांचे तीन भाग होते, पैठण प्राधिकरणासाठी शासनाने २०११ साली २१२ कोटींचा आराखडा मंजूर केला होता. तो आराखडा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी तरतूद असलेल्या कामांसह बदलून टाकला. 

आराखड्यातील कामे सोडून प्राधिकरण आणि डीपीसीत निधी असलेल्या कामांना मंजुरी दिली आहे. कोरोनामुळे नवीन कामे सुरू करायची नाहीत, असे शासनाचे आदेश असल्याने संकल्पित सर्व कामे मंजूर करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा नियोजन समितीने पैठण प्राधिकरणाला निधी दिलेला आहे. त्या कामांचा निधी पैठण प्राधिकरणाच्या खात्यात जमा आहे. नाथमंडपाचे मोठे स्ट्रक्चर होणार आहे, ते दोन मजली असून, त्यावर ९ कोटींचा खर्च होईल. त्यानंतर नवीन प्रसादालयाचे बांधकाम करण्यात येणार आहे. नाथमंडपात कीर्तनाची सोय असेल. तेथे १५०० भक्तांची बसण्याची सोय असेल, असे त्याचे डिझाईन तयार केले आहे. 

धार्मिक पर्यटनाचे आकर्षण ठरेलप्राधिकरणाला किती जागा आहे हेदेखील माहिती नव्हते. संरक्षक भिंत बांधण्यापासून जागा ताब्यात घेण्यापर्यंतचे काम जिल्हा प्रशासनाने केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नसता, तर मुख्यमंत्री यंदाच्या नाथषष्ठीला आजवर झालेल्या कामांचे उद्घाटन करण्यासाठी येणार होते. आगामी काळात ते येतील. दोन वर्षांत काम पूर्ण होईल या दिशेने तयारी केली आहे. दोन वर्षांत १२५ कोटींची कामे मंजुऱ्या देऊन पूर्णत्वाकडे नेली आहेत. औरंगाबादच्या पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टीने पैठण आगामी काळात आकर्षणाचा भाग ठरेल. 

कीर्तन मंडपातून दिसेल गोदावरी, नाथसागरजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, कीर्तन मंडपातून नाथसागर आणि गोदावरी पात्र दिसेल, अशी बांधकामाची रचना आहे. तेथील दृश्ये पाहण्यासाठी भविष्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील याचा विचार करण्यात आला आहे. नाथमंदिर परिसरातील सर्व इन्फ्रास्ट्रक्चरला ४७ किलोवॅट वीजपुरवठा सोलारवरून होणार आहे. समाधी मंदिर परिसरातील पडसाळ पूर्ण तोडून नवीन बांधण्यात येणार आहे. पूर्ण दगडी बांधकाम करण्यात येणार आहे. वूड आणि स्टोनमध्ये मंदिर परिसराचे बांधकाम होईल. त्यासाठी साडेचार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. भक्त निवास, कॉरिडॉरचे काम पूर्ण करण्यात आले आहे.  

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनfundsनिधी