शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

पैठणच्या नाथनगरीचे रूपडे पालटणार; कीर्तन मंडपातून दिसेल गोदावरी, नाथसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 20:02 IST

औरंगाबादच्या पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टीने पैठण आगामी काळात आकर्षणाचा भाग ठरेल. 

ठळक मुद्देनूतनीकरणाची २० कोटींची कामे होणार प्रसादालय, कीर्तन मंडप, पडसाळ या ठिकाणाचे नूतनीकरण

- विकास राऊत 

औरंगाबाद : मराठवाड्यातील वारकऱ्यांसह सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या पैठण तीर्थक्षेत्राचे रूपडे हळूहळू पालटत असून, आगामी काळात जिल्ह्यातील महत्त्वाचे धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून संत एकनाथ महाराज समाधी मंदिर परिसर उदयास येणार आहे. 

२०११ साली शासनाने केलेल्या २१२ कोटींच्या एकूण तरतुदीपैकी आजवर १२५ कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. आता जिल्हा प्रशासनाने २० कोटी रुपयांच्या प्रसादालय, कीर्तन मंडप, पडसाळ नूतनीकरणाच्या कामांना मंजुरी दिली आहे. ही नवीन कामे नसून शासनाने प्राधिकरण आणि डीपीसीत मंजूर केलेली कामे आहेत. यासाठीचा निधी प्राधिकरणाच्या खात्यावर कोरोनाच्या संकटापूर्वीच आलेला आहे. मंदिर परिसरातील पडसाळ लाकूड आणि दगडांनी बांधले जाणार असून, त्यासाठी साडेचार कोटींचा खर्च होणार आहे. कामांचे तीन भाग होते, पैठण प्राधिकरणासाठी शासनाने २०११ साली २१२ कोटींचा आराखडा मंजूर केला होता. तो आराखडा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी तरतूद असलेल्या कामांसह बदलून टाकला. 

आराखड्यातील कामे सोडून प्राधिकरण आणि डीपीसीत निधी असलेल्या कामांना मंजुरी दिली आहे. कोरोनामुळे नवीन कामे सुरू करायची नाहीत, असे शासनाचे आदेश असल्याने संकल्पित सर्व कामे मंजूर करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा नियोजन समितीने पैठण प्राधिकरणाला निधी दिलेला आहे. त्या कामांचा निधी पैठण प्राधिकरणाच्या खात्यात जमा आहे. नाथमंडपाचे मोठे स्ट्रक्चर होणार आहे, ते दोन मजली असून, त्यावर ९ कोटींचा खर्च होईल. त्यानंतर नवीन प्रसादालयाचे बांधकाम करण्यात येणार आहे. नाथमंडपात कीर्तनाची सोय असेल. तेथे १५०० भक्तांची बसण्याची सोय असेल, असे त्याचे डिझाईन तयार केले आहे. 

धार्मिक पर्यटनाचे आकर्षण ठरेलप्राधिकरणाला किती जागा आहे हेदेखील माहिती नव्हते. संरक्षक भिंत बांधण्यापासून जागा ताब्यात घेण्यापर्यंतचे काम जिल्हा प्रशासनाने केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नसता, तर मुख्यमंत्री यंदाच्या नाथषष्ठीला आजवर झालेल्या कामांचे उद्घाटन करण्यासाठी येणार होते. आगामी काळात ते येतील. दोन वर्षांत काम पूर्ण होईल या दिशेने तयारी केली आहे. दोन वर्षांत १२५ कोटींची कामे मंजुऱ्या देऊन पूर्णत्वाकडे नेली आहेत. औरंगाबादच्या पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टीने पैठण आगामी काळात आकर्षणाचा भाग ठरेल. 

कीर्तन मंडपातून दिसेल गोदावरी, नाथसागरजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, कीर्तन मंडपातून नाथसागर आणि गोदावरी पात्र दिसेल, अशी बांधकामाची रचना आहे. तेथील दृश्ये पाहण्यासाठी भविष्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील याचा विचार करण्यात आला आहे. नाथमंदिर परिसरातील सर्व इन्फ्रास्ट्रक्चरला ४७ किलोवॅट वीजपुरवठा सोलारवरून होणार आहे. समाधी मंदिर परिसरातील पडसाळ पूर्ण तोडून नवीन बांधण्यात येणार आहे. पूर्ण दगडी बांधकाम करण्यात येणार आहे. वूड आणि स्टोनमध्ये मंदिर परिसराचे बांधकाम होईल. त्यासाठी साडेचार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. भक्त निवास, कॉरिडॉरचे काम पूर्ण करण्यात आले आहे.  

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनfundsनिधी