शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

नाशिकलाच मिळाला साहित्य संमेलनाचा मान; २४ तारखेला ठरणार संमेलनाध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 06:58 IST

छगन भुजबळ, शरद पवार आणि त्यांचे सहस्रचंद्रदर्शन यांचा सध्यातरी साहित्य संमेलनाशी काहीही संबंध नाही. पुढे जर अशी काही वेळ आली तर तसा विचार करू, असे स्पष्टीकरण ठाले पाटील यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार, हे साहित्यप्रेमींना कळून चुकले होतेच. पण शुक्रवारी मराठवाडा साहित्य परिषद येथे झालेल्या बैठकीत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिकच्या लोकहितवादी मंडळाकडून आलेल्या प्रस्तावावर औपचारिक शिक्कामोर्तब केले आणि ९४ व्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान नाशिकला मिळाल्याचे  जाहीर केले. मार्च महिन्याच्या अखेरीस गोखले एज्युकेशन सोसायटीच्या परिसरात साहित्य संमेलन होणार आहे.

ठाले पाटील म्हणाले की, सरहद संस्थेने मे महिन्यात साहित्य संमेलन घेण्याचे सांगितले होते, परंतु महामंडळाचे आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असे आहे. प्रत्येक वर्षीचे अनुदान त्याच वर्षी वापरले गेले पाहिजे, असे वाटते. त्यामुळे पुन्हा अनुदानाचा प्रश्न निर्माण होऊ नये, हे देखील प्रस्ताव नाकारण्याचे एक कारण होते. याशिवाय कोरोनामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी दिल्ली सुरक्षित ठिकाण नाही. त्यामुळे दिल्लीला संमेलन घेण्यास महामंडळ उत्सुक नव्हते. 

सहस्रचंद्र दर्शनाची चर्चा तथ्यहीनछगन भुजबळ, शरद पवार आणि त्यांचे सहस्रचंद्रदर्शन यांचा सध्यातरी साहित्य संमेलनाशी काहीही संबंध नाही. पुढे जर अशी काही वेळ आली तर तसा विचार करू, असे स्पष्टीकरण ठाले पाटील यांनी दिले. राजकीय नेत्यांना भूमिकेशिवाय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर स्थान दिले जाणार नाही, हे आम्ही मागच्या साहित्य संमेलनाच्यावेळीच सांगितले होते. तीच भूमिका आमची यावेळीही कायम राहील, असेही त्यांनी ठासून सांगितले. 

२४ तारखेला ठरणार संमेलनाध्यक्ष२३ जानेवारी रोजी नाशिक येथे संमेलन मार्गदर्शन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत संमेलनाच्या आयोजनाविषयी चर्चा होईल. तसेच दि. २४ रोजी नाशिक येथेच एक बैठक होणार असून, यामध्ये साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाची रचना आणि संमेलनाध्यक्ष याचा निर्णय जाहीर केला जाईल.

तिसऱ्यांदा मान नाशिकमध्ये याआधी १९४२ व २००५ असे दोन वेळा संमेलन भरविण्यात आले. तिसऱ्यांदा संमेलन आयोजनाचा मान नाशिकला मिळणार आहे. 

स्वागताध्यक्षपदी भुजबळ? मार्चच्या १९, २० व २१ तारखेला संमेलन होण्याची चिन्हे आहेत. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि माजी आमदार हेमंत टकले यांच्या नावांची चर्चा आहे. 

 

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ