शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकलाच मिळाला साहित्य संमेलनाचा मान; २४ तारखेला ठरणार संमेलनाध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 06:58 IST

छगन भुजबळ, शरद पवार आणि त्यांचे सहस्रचंद्रदर्शन यांचा सध्यातरी साहित्य संमेलनाशी काहीही संबंध नाही. पुढे जर अशी काही वेळ आली तर तसा विचार करू, असे स्पष्टीकरण ठाले पाटील यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार, हे साहित्यप्रेमींना कळून चुकले होतेच. पण शुक्रवारी मराठवाडा साहित्य परिषद येथे झालेल्या बैठकीत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिकच्या लोकहितवादी मंडळाकडून आलेल्या प्रस्तावावर औपचारिक शिक्कामोर्तब केले आणि ९४ व्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान नाशिकला मिळाल्याचे  जाहीर केले. मार्च महिन्याच्या अखेरीस गोखले एज्युकेशन सोसायटीच्या परिसरात साहित्य संमेलन होणार आहे.

ठाले पाटील म्हणाले की, सरहद संस्थेने मे महिन्यात साहित्य संमेलन घेण्याचे सांगितले होते, परंतु महामंडळाचे आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असे आहे. प्रत्येक वर्षीचे अनुदान त्याच वर्षी वापरले गेले पाहिजे, असे वाटते. त्यामुळे पुन्हा अनुदानाचा प्रश्न निर्माण होऊ नये, हे देखील प्रस्ताव नाकारण्याचे एक कारण होते. याशिवाय कोरोनामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी दिल्ली सुरक्षित ठिकाण नाही. त्यामुळे दिल्लीला संमेलन घेण्यास महामंडळ उत्सुक नव्हते. 

सहस्रचंद्र दर्शनाची चर्चा तथ्यहीनछगन भुजबळ, शरद पवार आणि त्यांचे सहस्रचंद्रदर्शन यांचा सध्यातरी साहित्य संमेलनाशी काहीही संबंध नाही. पुढे जर अशी काही वेळ आली तर तसा विचार करू, असे स्पष्टीकरण ठाले पाटील यांनी दिले. राजकीय नेत्यांना भूमिकेशिवाय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर स्थान दिले जाणार नाही, हे आम्ही मागच्या साहित्य संमेलनाच्यावेळीच सांगितले होते. तीच भूमिका आमची यावेळीही कायम राहील, असेही त्यांनी ठासून सांगितले. 

२४ तारखेला ठरणार संमेलनाध्यक्ष२३ जानेवारी रोजी नाशिक येथे संमेलन मार्गदर्शन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत संमेलनाच्या आयोजनाविषयी चर्चा होईल. तसेच दि. २४ रोजी नाशिक येथेच एक बैठक होणार असून, यामध्ये साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाची रचना आणि संमेलनाध्यक्ष याचा निर्णय जाहीर केला जाईल.

तिसऱ्यांदा मान नाशिकमध्ये याआधी १९४२ व २००५ असे दोन वेळा संमेलन भरविण्यात आले. तिसऱ्यांदा संमेलन आयोजनाचा मान नाशिकला मिळणार आहे. 

स्वागताध्यक्षपदी भुजबळ? मार्चच्या १९, २० व २१ तारखेला संमेलन होण्याची चिन्हे आहेत. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि माजी आमदार हेमंत टकले यांच्या नावांची चर्चा आहे. 

 

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ