शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नाना संतापले, ‘आम्ही भीक मागून बंधाऱ्यांची कामे करू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : कोल्हापुरी बंधा-यांना दरवाजे बसविण्याची कामे पूर्ण करण्यात जि.प. सत्ताधारी आणि प्रशासन कुचकामी असल्याचा अप्रत्यक्ष ...

ठळक मुद्देहोत नसेल तर सांगा : हरिभाऊ बागडे यांनी जिल्हा परिषद सत्ताधा-यांवर साधला निशाणा; चार वर्षांपासून विषय मांडत असल्याची ‘डीपीसी’ बैठकीत तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोल्हापुरी बंधा-यांना दरवाजे बसविण्याची कामे पूर्ण करण्यात जि.प. सत्ताधारी आणि प्रशासन कुचकामी असल्याचा अप्रत्यक्ष शाब्दिक हल्ला चढवित, होत नसेल तर आम्हाला मंजुरी देऊन टाका, आम्ही भीक मागून बंधा-यांची कामे करू, आता लोकांचे बोलणे खाणे सहन होत नाही, असा संताप विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी डीपीसीच्या बैठकीत सोमवारी व्यक्त केला.बागडे म्हणाले, जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंधा-यांना दरवाजे नसल्यामुळे पाणी वाहून जात आहे. शेतक-यांना ते देखवत नाही. दरवाजे बसविण्याचा निर्णय का होत नाही, चार वर्षांपासून विषय मांडतो आहे, संताप होणार नाही तर काय होणार, गिरिजा नदीला पाणी आले, दरवाजे नसल्याने ते वाहून गेले. ९ हजार दरवाजे बसवायचे असून किंमत वाढत असल्यामुळे प्रशासन मंजुरी देत नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. ही कामे होत नसेल तर सांगा, आम्ही भीक मागून ती कामे करू.जि.प. प्रशासनातर्फे सांगण्यात आले की, दरवाजे बसविणे, डागडुजीसाठी ३ कोटींची तरतूद केली आहे. २ ते ३ महिन्यांत कार्यवाही पूर्ण होईल. ५८५ पैकी ३५७ ठिकाणी दरवाजे आहेत. २५८ बंधा-यांना दरवाजे नाहीत. ३८ बंधारे जलयुक्त शिवार योजनेत आहेत. १८०० दरवाजे उपकरनिधीतून बसविण्याचा प्रयत्न आहे. ६७८ पैकी २९४ बंधा-यांत पाणी साचल्याचा दावा प्रशासनाने केला.जि.प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर म्हणाल्या, हा विषय घेतला आहे, ९ हजार गेट बसविण्याबाबत प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले, दरवर्षी शासन दरवाजांसाठी पैसे देऊ शकत नाही. उपकरातून या कामांसाठी तरतूद केली जावी. दरम्यान आमदार निधीतून बंधाºयांच्या दरवाजांच्या कामांना मंजुरी मिळण्याचा विषय बैठकीत चर्चेला आला.पदे उपभोगायला नसतात...जिल्हा परिषद एवढी सुस्त का झाली, हे कळण्यास मार्ग नाही. जि.प.मधील पदे उपभोगायला नसतात. सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी असतात, असा शालजोडा लगावून बागडे म्हणाले, फुलंब्री मतदारसंघातील केटीवेअरच्या कामांना मुहूर्त लागत नाही. दर बैठकीत तरतूद झाली आहे, असेच उत्तर प्रशासन देत आहे. असे असेल तर पाणी वाचणारच नाही. पाणी साचत नाही, याचे काही दु:ख यांना वाटत नाही. जि.प.तील पदे कामांसाठी असतात, पदे उपभोगायला नसतात. पैठण, गंगापूर, वैजापूर तालुक्यांत बंधारे बांधूनही पाणी साचले नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHaribhau Bagadeहरिभाऊ बागडेzpजिल्हा परिषद