शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

नाना संतापले, ‘आम्ही भीक मागून बंधाऱ्यांची कामे करू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : कोल्हापुरी बंधा-यांना दरवाजे बसविण्याची कामे पूर्ण करण्यात जि.प. सत्ताधारी आणि प्रशासन कुचकामी असल्याचा अप्रत्यक्ष ...

ठळक मुद्देहोत नसेल तर सांगा : हरिभाऊ बागडे यांनी जिल्हा परिषद सत्ताधा-यांवर साधला निशाणा; चार वर्षांपासून विषय मांडत असल्याची ‘डीपीसी’ बैठकीत तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोल्हापुरी बंधा-यांना दरवाजे बसविण्याची कामे पूर्ण करण्यात जि.प. सत्ताधारी आणि प्रशासन कुचकामी असल्याचा अप्रत्यक्ष शाब्दिक हल्ला चढवित, होत नसेल तर आम्हाला मंजुरी देऊन टाका, आम्ही भीक मागून बंधा-यांची कामे करू, आता लोकांचे बोलणे खाणे सहन होत नाही, असा संताप विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी डीपीसीच्या बैठकीत सोमवारी व्यक्त केला.बागडे म्हणाले, जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंधा-यांना दरवाजे नसल्यामुळे पाणी वाहून जात आहे. शेतक-यांना ते देखवत नाही. दरवाजे बसविण्याचा निर्णय का होत नाही, चार वर्षांपासून विषय मांडतो आहे, संताप होणार नाही तर काय होणार, गिरिजा नदीला पाणी आले, दरवाजे नसल्याने ते वाहून गेले. ९ हजार दरवाजे बसवायचे असून किंमत वाढत असल्यामुळे प्रशासन मंजुरी देत नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. ही कामे होत नसेल तर सांगा, आम्ही भीक मागून ती कामे करू.जि.प. प्रशासनातर्फे सांगण्यात आले की, दरवाजे बसविणे, डागडुजीसाठी ३ कोटींची तरतूद केली आहे. २ ते ३ महिन्यांत कार्यवाही पूर्ण होईल. ५८५ पैकी ३५७ ठिकाणी दरवाजे आहेत. २५८ बंधा-यांना दरवाजे नाहीत. ३८ बंधारे जलयुक्त शिवार योजनेत आहेत. १८०० दरवाजे उपकरनिधीतून बसविण्याचा प्रयत्न आहे. ६७८ पैकी २९४ बंधा-यांत पाणी साचल्याचा दावा प्रशासनाने केला.जि.प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर म्हणाल्या, हा विषय घेतला आहे, ९ हजार गेट बसविण्याबाबत प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले, दरवर्षी शासन दरवाजांसाठी पैसे देऊ शकत नाही. उपकरातून या कामांसाठी तरतूद केली जावी. दरम्यान आमदार निधीतून बंधाºयांच्या दरवाजांच्या कामांना मंजुरी मिळण्याचा विषय बैठकीत चर्चेला आला.पदे उपभोगायला नसतात...जिल्हा परिषद एवढी सुस्त का झाली, हे कळण्यास मार्ग नाही. जि.प.मधील पदे उपभोगायला नसतात. सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी असतात, असा शालजोडा लगावून बागडे म्हणाले, फुलंब्री मतदारसंघातील केटीवेअरच्या कामांना मुहूर्त लागत नाही. दर बैठकीत तरतूद झाली आहे, असेच उत्तर प्रशासन देत आहे. असे असेल तर पाणी वाचणारच नाही. पाणी साचत नाही, याचे काही दु:ख यांना वाटत नाही. जि.प.तील पदे कामांसाठी असतात, पदे उपभोगायला नसतात. पैठण, गंगापूर, वैजापूर तालुक्यांत बंधारे बांधूनही पाणी साचले नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHaribhau Bagadeहरिभाऊ बागडेzpजिल्हा परिषद