शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

नाना संतापले, ‘आम्ही भीक मागून बंधाऱ्यांची कामे करू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : कोल्हापुरी बंधा-यांना दरवाजे बसविण्याची कामे पूर्ण करण्यात जि.प. सत्ताधारी आणि प्रशासन कुचकामी असल्याचा अप्रत्यक्ष ...

ठळक मुद्देहोत नसेल तर सांगा : हरिभाऊ बागडे यांनी जिल्हा परिषद सत्ताधा-यांवर साधला निशाणा; चार वर्षांपासून विषय मांडत असल्याची ‘डीपीसी’ बैठकीत तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोल्हापुरी बंधा-यांना दरवाजे बसविण्याची कामे पूर्ण करण्यात जि.प. सत्ताधारी आणि प्रशासन कुचकामी असल्याचा अप्रत्यक्ष शाब्दिक हल्ला चढवित, होत नसेल तर आम्हाला मंजुरी देऊन टाका, आम्ही भीक मागून बंधा-यांची कामे करू, आता लोकांचे बोलणे खाणे सहन होत नाही, असा संताप विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी डीपीसीच्या बैठकीत सोमवारी व्यक्त केला.बागडे म्हणाले, जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंधा-यांना दरवाजे नसल्यामुळे पाणी वाहून जात आहे. शेतक-यांना ते देखवत नाही. दरवाजे बसविण्याचा निर्णय का होत नाही, चार वर्षांपासून विषय मांडतो आहे, संताप होणार नाही तर काय होणार, गिरिजा नदीला पाणी आले, दरवाजे नसल्याने ते वाहून गेले. ९ हजार दरवाजे बसवायचे असून किंमत वाढत असल्यामुळे प्रशासन मंजुरी देत नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. ही कामे होत नसेल तर सांगा, आम्ही भीक मागून ती कामे करू.जि.प. प्रशासनातर्फे सांगण्यात आले की, दरवाजे बसविणे, डागडुजीसाठी ३ कोटींची तरतूद केली आहे. २ ते ३ महिन्यांत कार्यवाही पूर्ण होईल. ५८५ पैकी ३५७ ठिकाणी दरवाजे आहेत. २५८ बंधा-यांना दरवाजे नाहीत. ३८ बंधारे जलयुक्त शिवार योजनेत आहेत. १८०० दरवाजे उपकरनिधीतून बसविण्याचा प्रयत्न आहे. ६७८ पैकी २९४ बंधा-यांत पाणी साचल्याचा दावा प्रशासनाने केला.जि.प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर म्हणाल्या, हा विषय घेतला आहे, ९ हजार गेट बसविण्याबाबत प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले, दरवर्षी शासन दरवाजांसाठी पैसे देऊ शकत नाही. उपकरातून या कामांसाठी तरतूद केली जावी. दरम्यान आमदार निधीतून बंधाºयांच्या दरवाजांच्या कामांना मंजुरी मिळण्याचा विषय बैठकीत चर्चेला आला.पदे उपभोगायला नसतात...जिल्हा परिषद एवढी सुस्त का झाली, हे कळण्यास मार्ग नाही. जि.प.मधील पदे उपभोगायला नसतात. सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी असतात, असा शालजोडा लगावून बागडे म्हणाले, फुलंब्री मतदारसंघातील केटीवेअरच्या कामांना मुहूर्त लागत नाही. दर बैठकीत तरतूद झाली आहे, असेच उत्तर प्रशासन देत आहे. असे असेल तर पाणी वाचणारच नाही. पाणी साचत नाही, याचे काही दु:ख यांना वाटत नाही. जि.प.तील पदे कामांसाठी असतात, पदे उपभोगायला नसतात. पैठण, गंगापूर, वैजापूर तालुक्यांत बंधारे बांधूनही पाणी साचले नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHaribhau Bagadeहरिभाऊ बागडेzpजिल्हा परिषद