शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीत पोलिसांना नाव सांगितल्याचे कारण; शिवाजीनगरमध्ये तीन गुन्हेगारांमध्ये तुफान राडा

By सुमित डोळे | Updated: February 29, 2024 20:03 IST

तीस दिवसांत तीनदा कारागृहात, पुन्हा जामिनावर सुटताच धिंगाणा, पाय तोडण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर : तीस दिवसांत तिसऱ्यांदा गंभीर गुन्ह्यात जामिनावर सुटलेला कुख्यात गुन्हेगार इम्रान रशिद अली सय्यद उर्फ मालेगाव (२८, रा. सातारा) व लल्लन ऊर्फ शेख अय्याज शेख रहिम, सलमान जफ्फर खान (रा. गारखेडा) यांच्यामध्ये टोळीयुद्ध झाले. छावणीच्या घरफोडीत पाेलिसांना नाव सांगितल्याच्या रागातून हे वाद उफाळून आले. त्यात लल्लन व सलमानने इम्रानच्या पत्नीच्या डोक्यात दारूची बाटली फाेडून इम्रानचे दोन्ही पाय फ्रॅक्चर केले तर सलमानदेखील इम्रानच्या मारहाणीत जखमी झाला. रविवारी सायंकाळी ७ वाजता शिवाजीनगरच्या नेहरू महाविद्यालयाजवळ हा राडा झाला. या घटनेमुळे पोलिसांचे रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे नियंत्रण सुटल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

इम्रान व त्याची पत्नी जयश्री सोबत रविवारी सायंकाळी ७ वाजता गारखेड्यात असताना त्याचे अन्य गुन्हेगारांसोबत पैशांवरून वाद झाले. तेवढ्यात लल्लन व सलमानने कारमधून येत त्यांच्यावर हल्ला चढविला. लल्लनच्या पत्नीने इम्रानच्या पत्नीच्या डोक्यात दारूची बाटली फोडली तर सलमानने इम्रानला रस्त्यावर पाडून दोन्ही पायांवर गंभीररीत्या वार केले. या वादात इम्रानने देखील सलमानला पैसे न दिल्यास जिवंत मारून टाकण्याची धमकी दे चाकूने गंभीर वार केले. दोघांच्या परस्पर तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. इम्रान मालेगाव व पत्नीवर शस्त्रक्रिया पार पडली. घटनेनंतर सलमान व लल्लनला उपनिरीक्षक संदीप काळे यांनी तत्काळ अटक केली.

साताऱ्यात राहणाऱ्या इम्रान मालेगाववर आतापर्यंत १० ते ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. मालेगावहून तो काही वर्षांपूर्वी शहरात आला व गुन्हेगारांमध्ये सक्रिय झाला. शहरातील सर्व गुन्हेगारांमध्ये त्याची ऊठबस असते. विशेष म्हणजे, इम्रान मालेगाव, लल्लन, सलमान यांचे त्याच परिसरात वाळूचे ठेले देखील आहेत. त्यातूनही त्यांच्यासह स्थानिक गुन्हेगारांमध्ये वाद आहेत.

-सातारा पोलिसांकडून इम्रान ३० डिसेंबरला घरफोडीत अटकेत.- त्यात जामिनावर सुटताच ३ जानेवारीला गुन्हेगारांच्या टोळीसोबत गांधीनगरमध्ये राडा करून मोठा तणाव निर्माण केला.-क्रांती चौक पोलिसांकडून ४ जानेवारीला अटक. त्यात १५ ते २० दिवस तो कारागृहात राहिला.-त्यातून जामिनावर सुटताच १६ फेब्रुवारीला छावणीत घर फोडून २३ तोळे सोन्यासह लाखोंचा ऐवज चोरला. गुन्हे शाखेकडून २१ फेब्रुवारीला अटक.-२४ फेब्रुवारीला पुन्हा जामिनावर सुटला. त्यानंतर पुढील २४ तासांत पुन्हा टोळीयुद्ध केले.

लल्लन ऊर्फ शेख अय्याजवर यापूर्वी एक मारहाणीचा तर दोन हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, इम्रान मालेगाव गांधीनगर तणावात जमावाच्या हल्ल्यात बालंबाल वाचला. रविवारच्या घटनेत देखील स्थानिकांनी धाव घेतल्याने त्याचे प्राण वाचले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद