शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

सुखना, खाम नदीला मिळणार नवसंजीवनी; नमामि गंगा योजने अंतर्गत होणार विकासकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 16:28 IST

Sukhana, Kham river : केंद्र सरकारच्या हाऊसिंग ॲन्ड अर्बन अफेअर्स, नॅशनल इस्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स, नमामि गंगा मिशन या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या संस्थांच्या माध्यमातून नमामी गंगा या मिशनमध्ये औरंगाबाद शहराचा समावेश

ठळक मुद्देनदीपात्रातील अतिक्रमणे हटविणार स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार

औरंगाबाद : पावसाळ्यात यंदा सुखना आणि खाम नदीपात्रांनी रौद्र रूप धारण केले. दोन्ही नदीपात्रांचा प्रकोप औरंगाबादकरांनी अत्यंत जवळून बघितला. या गंभीर समस्येतून मार्ग तरी कसा काढावा, असा प्रश्न मनपा प्रशासनाला ( Aurangabad Municipal Corporation) भेडसावत असतानाच सोमवारी एक अत्यंत आनंदाची बातमी पुढे आली. केंद्र शासनाच्या नमामि गंगा ( Namami Ganga ) योजनेत ऐतिहासिक औरंगाबाद शहराचाही समावेश करण्यात आला. या योजनेअंतर्गत भविष्यात सुखना, खाम नदीपात्रांवर फोकस ठेवून अनेक विकासकामे करण्यात येणार आहेत, असे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले. ( In Namami Ganga project, work will be done on Sukhana, Kham river basin ) 

केंद्र सरकारच्या हाऊसिंग ॲन्ड अर्बन अफेअर्स, नॅशनल इस्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स, नमामि गंगा मिशन या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या संस्थांच्या माध्यमातून नमामी गंगा या मिशनमध्ये औरंगाबाद शहराचा समावेश करण्यात आल्याचे पत्र महापालिका प्रशासकांच्या नावे प्राप्त झाले. दुपारी १२ वाजेच्या सुमारास ऑनलाईन बैठकदेखील झाली. केंद्र शासनाचे अधिकारी, प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह देशभरातील सनदी अधिकारी सहभागी झाले होते.

सुखद ! विशेष बाब म्हणून औरंगाबादचा नमामि गंगा योजनेत समावेश

बैठकीनंतर पाण्डेय यांनी पत्रकारांना ऑनलाईन माहिती दिली. सुखना, खाम नदी या गोदावरीच्या उपनद्या आहेत. या नद्यांमधून वाहत जाणारे पाणी दूषित असेल, तर गोदावरीही दूषित होणारच आहे. गोदावरी स्वच्छ असावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्र शासनाने औरंगाबादची निवड केली. पुण्याने मुठा नदीपात्रावर चांगले काम केले. आपणही खाम पात्रावर भरपूर काम केले. या कामाला प्रोत्साहन केंद्राकडून दिल्या जात आहे.

नदीपात्रातील अतिक्रमणे हटविणारखाम व सुखना नदीचे पुनरुज्जीवन करण्यासोबतच या परिसरात झाडे लावणे, नागरिकांना नदी परिसरात फेरफटका मारता यावा यासाठी बाग विकसित करणे, अशी कामे केली जातील. या दोन्ही नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. सर्व्हेक्षण करून अतिक्रमणांची यादी तयार केली जाईल. पूर नियंत्रण रेषेची मार्किंग केल्यानंतर किती अतिक्रमणे आहेत, हे समोर येईल. अतिक्रमण हटविल्यानंतर बेघर होणाऱ्यांचे पुनर्वसन करण्याचा आराखड्यात समावेश असेल, असेही पाण्डेय यांनी सांगितले.

शेतीत तोटा झाल्याने देशी जुगाड केला, शुद्ध हळद डोळ्यांसमोर दळून देत पैसा कमावला

विकास आराखड्यात समावेशजुन्या व विस्तारित शहराचा एकत्रित विकास आराखडा तयार केला जात आहे. त्याचा फायदा नद्यांचे पुनरुज्जीवन करताना होणार आहे. विकास आराखड्यात नदी परिसर विकसित करता येतील, अशा जागा निश्चित केल्या जातील. भविष्यात काम करताना नागरिक, खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था-संघटना आणि शासन याची सांगड घालण्यात येईल. या कामासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादriverनदीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका