शहरं
Join us  
Trending Stories
1
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
4
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
6
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
7
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
8
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
9
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
10
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
11
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
12
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
13
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
14
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
15
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
16
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
17
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
18
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
19
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
20
Khushbu Saroj : अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान

सुखना, खाम नदीला मिळणार नवसंजीवनी; नमामि गंगा योजने अंतर्गत होणार विकासकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 16:28 IST

Sukhana, Kham river : केंद्र सरकारच्या हाऊसिंग ॲन्ड अर्बन अफेअर्स, नॅशनल इस्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स, नमामि गंगा मिशन या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या संस्थांच्या माध्यमातून नमामी गंगा या मिशनमध्ये औरंगाबाद शहराचा समावेश

ठळक मुद्देनदीपात्रातील अतिक्रमणे हटविणार स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार

औरंगाबाद : पावसाळ्यात यंदा सुखना आणि खाम नदीपात्रांनी रौद्र रूप धारण केले. दोन्ही नदीपात्रांचा प्रकोप औरंगाबादकरांनी अत्यंत जवळून बघितला. या गंभीर समस्येतून मार्ग तरी कसा काढावा, असा प्रश्न मनपा प्रशासनाला ( Aurangabad Municipal Corporation) भेडसावत असतानाच सोमवारी एक अत्यंत आनंदाची बातमी पुढे आली. केंद्र शासनाच्या नमामि गंगा ( Namami Ganga ) योजनेत ऐतिहासिक औरंगाबाद शहराचाही समावेश करण्यात आला. या योजनेअंतर्गत भविष्यात सुखना, खाम नदीपात्रांवर फोकस ठेवून अनेक विकासकामे करण्यात येणार आहेत, असे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले. ( In Namami Ganga project, work will be done on Sukhana, Kham river basin ) 

केंद्र सरकारच्या हाऊसिंग ॲन्ड अर्बन अफेअर्स, नॅशनल इस्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स, नमामि गंगा मिशन या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या संस्थांच्या माध्यमातून नमामी गंगा या मिशनमध्ये औरंगाबाद शहराचा समावेश करण्यात आल्याचे पत्र महापालिका प्रशासकांच्या नावे प्राप्त झाले. दुपारी १२ वाजेच्या सुमारास ऑनलाईन बैठकदेखील झाली. केंद्र शासनाचे अधिकारी, प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह देशभरातील सनदी अधिकारी सहभागी झाले होते.

सुखद ! विशेष बाब म्हणून औरंगाबादचा नमामि गंगा योजनेत समावेश

बैठकीनंतर पाण्डेय यांनी पत्रकारांना ऑनलाईन माहिती दिली. सुखना, खाम नदी या गोदावरीच्या उपनद्या आहेत. या नद्यांमधून वाहत जाणारे पाणी दूषित असेल, तर गोदावरीही दूषित होणारच आहे. गोदावरी स्वच्छ असावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्र शासनाने औरंगाबादची निवड केली. पुण्याने मुठा नदीपात्रावर चांगले काम केले. आपणही खाम पात्रावर भरपूर काम केले. या कामाला प्रोत्साहन केंद्राकडून दिल्या जात आहे.

नदीपात्रातील अतिक्रमणे हटविणारखाम व सुखना नदीचे पुनरुज्जीवन करण्यासोबतच या परिसरात झाडे लावणे, नागरिकांना नदी परिसरात फेरफटका मारता यावा यासाठी बाग विकसित करणे, अशी कामे केली जातील. या दोन्ही नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. सर्व्हेक्षण करून अतिक्रमणांची यादी तयार केली जाईल. पूर नियंत्रण रेषेची मार्किंग केल्यानंतर किती अतिक्रमणे आहेत, हे समोर येईल. अतिक्रमण हटविल्यानंतर बेघर होणाऱ्यांचे पुनर्वसन करण्याचा आराखड्यात समावेश असेल, असेही पाण्डेय यांनी सांगितले.

शेतीत तोटा झाल्याने देशी जुगाड केला, शुद्ध हळद डोळ्यांसमोर दळून देत पैसा कमावला

विकास आराखड्यात समावेशजुन्या व विस्तारित शहराचा एकत्रित विकास आराखडा तयार केला जात आहे. त्याचा फायदा नद्यांचे पुनरुज्जीवन करताना होणार आहे. विकास आराखड्यात नदी परिसर विकसित करता येतील, अशा जागा निश्चित केल्या जातील. भविष्यात काम करताना नागरिक, खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था-संघटना आणि शासन याची सांगड घालण्यात येईल. या कामासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादriverनदीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका