शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

औरंगाबाद शहरातील नालेसफाईकडेही मनपाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:10 IST

मान्सून यंदा लवकर धडकणार आहे. मान्सूनपूर्वी महापालिकेला दरवर्षी नालेसफाई करावी लागते. मे महिना संपत आला तरी नालेसफाईचा नारळ प्रशासनाने फोडला नाही. प्रशासनाकडून १९ मेपासून बैठकांचे नियोजन करण्यात येत आहे. पावसाळा संपल्यावर महापालिका नालेसफाई करणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देतयारी शून्य : मे महिना संपतासंपता मनपा करणार नियोजन; नालेसफाई कागदावरच होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मान्सून यंदा लवकर धडकणार आहे. मान्सूनपूर्वी महापालिकेला दरवर्षी नालेसफाई करावी लागते. मे महिना संपत आला तरी नालेसफाईचा नारळ प्रशासनाने फोडला नाही. प्रशासनाकडून १९ मेपासून बैठकांचे नियोजन करण्यात येत आहे. पावसाळा संपल्यावर महापालिका नालेसफाई करणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.महापालिकेसाठी नालेसफाई अत्यंत आवडीचा विषय होता. मागील काही वर्षांमध्ये या नालेसफाईतील खाबूगिरी तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी संपविली. त्यामुळे कोट्यवधींच्या उधळपट्टीला ब्रेक लागला.प्रशासनाचाही या नालेसफाईतील ‘रस’ संपला. यंदाही शहरातील ९ झोनसाठी फक्त ६० ते ७० लाखांच्या खर्चाचा अंदाज बांधण्यात आला आहे.दरवर्षी जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होते, हे माहीत आहे. मार्च, एप्रिल महिन्यापासूनच तयारी करायला हवी.महापालिका मे किंवा जून महिन्यात कामाला लागते. आणीबाणी कायद्याचा वापर करून ही कामे उरकण्यावर अधिकाऱ्यांचा अधिक भर असतो. दरवर्षी ज्या पद्धतीने नालेसफाई करायला हवी त्या पद्धतीने होत नाही. नाल्याच्या दर्शनी भागातील केरकचरा काढण्यात येतो. नाल्यातील एक इंचही गाळ काढण्यात येत नाही. गाळ काढण्यासाठी कोट्यवधी रुपये लागतील, असा दावा प्रशासनाकडून दरवर्षी करण्यात येतो.मोठा पाऊस झाल्यासऔरंगाबाद शहरात अनेकदा मुसळधार पाऊस झाला आहे. मागील वर्षी जयभवानीनगर येथे असंख्य घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यानंतर यंदा मनपाने नाल्यातील अनेक अतिक्रमणे हटविली. जयभवानीनगरसारखी अवस्था शहरात अनेक ठिकाणी आहे.कचºयाने नाले तुडुंब४शहरात मोठा पाऊस झाल्यास उथळ नाल्यामुळे सखल भागात हाहाकार उडतो. यापूर्वी अनेकदा मोठा पाऊस झाल्यावर शहराची ‘मुंबई’प्रमाणे अवस्था झाली. शहरातील दहा मोठ्या नाल्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. नाल्यांमध्ये प्रचंड गाळ, केरकचरा आणि नाल्यांवर झालेल्या मोठमोठ्या अतिक्रमणांनी पाण्याचा नैसर्गिक प्रवाहच बंद झाला आहे.४मागील तीन महिन्यांपासून कचराकोंडी निर्माण झाली आहे. शहरातील प्रमुख नाल्यांमध्ये सर्वाधिक कचरा दिसून येत आहे.नियोजनाचा बट्ट्याबोळ४दरवर्षीप्रमाणे यंदाही वेधशाळेने पाऊस चांगला, भरपूर होणार, असा अंदाज वर्तविला आहे. वेधशाळेचे अंदाज दरवर्षी किती अचूक ठरतात हे नागरिकांना माहीत आहे. तरी महापालिकेने तयारी काहीच केलेली नाही. मान्सूनपूर्व कामांच्या आढावा घेण्यासाठी नवनियुक्त आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी बैठक आयोजित केली होती. तांत्रिक कारणांमुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली. प्रशासनाप्रमाणेच पदाधिकारीही आता ‘आपल्या’ कामांमध्ये मग्न झाले आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद