शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

औरंगाबाद शहरातील नालेसफाईकडेही मनपाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:10 IST

मान्सून यंदा लवकर धडकणार आहे. मान्सूनपूर्वी महापालिकेला दरवर्षी नालेसफाई करावी लागते. मे महिना संपत आला तरी नालेसफाईचा नारळ प्रशासनाने फोडला नाही. प्रशासनाकडून १९ मेपासून बैठकांचे नियोजन करण्यात येत आहे. पावसाळा संपल्यावर महापालिका नालेसफाई करणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देतयारी शून्य : मे महिना संपतासंपता मनपा करणार नियोजन; नालेसफाई कागदावरच होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मान्सून यंदा लवकर धडकणार आहे. मान्सूनपूर्वी महापालिकेला दरवर्षी नालेसफाई करावी लागते. मे महिना संपत आला तरी नालेसफाईचा नारळ प्रशासनाने फोडला नाही. प्रशासनाकडून १९ मेपासून बैठकांचे नियोजन करण्यात येत आहे. पावसाळा संपल्यावर महापालिका नालेसफाई करणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.महापालिकेसाठी नालेसफाई अत्यंत आवडीचा विषय होता. मागील काही वर्षांमध्ये या नालेसफाईतील खाबूगिरी तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी संपविली. त्यामुळे कोट्यवधींच्या उधळपट्टीला ब्रेक लागला.प्रशासनाचाही या नालेसफाईतील ‘रस’ संपला. यंदाही शहरातील ९ झोनसाठी फक्त ६० ते ७० लाखांच्या खर्चाचा अंदाज बांधण्यात आला आहे.दरवर्षी जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होते, हे माहीत आहे. मार्च, एप्रिल महिन्यापासूनच तयारी करायला हवी.महापालिका मे किंवा जून महिन्यात कामाला लागते. आणीबाणी कायद्याचा वापर करून ही कामे उरकण्यावर अधिकाऱ्यांचा अधिक भर असतो. दरवर्षी ज्या पद्धतीने नालेसफाई करायला हवी त्या पद्धतीने होत नाही. नाल्याच्या दर्शनी भागातील केरकचरा काढण्यात येतो. नाल्यातील एक इंचही गाळ काढण्यात येत नाही. गाळ काढण्यासाठी कोट्यवधी रुपये लागतील, असा दावा प्रशासनाकडून दरवर्षी करण्यात येतो.मोठा पाऊस झाल्यासऔरंगाबाद शहरात अनेकदा मुसळधार पाऊस झाला आहे. मागील वर्षी जयभवानीनगर येथे असंख्य घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यानंतर यंदा मनपाने नाल्यातील अनेक अतिक्रमणे हटविली. जयभवानीनगरसारखी अवस्था शहरात अनेक ठिकाणी आहे.कचºयाने नाले तुडुंब४शहरात मोठा पाऊस झाल्यास उथळ नाल्यामुळे सखल भागात हाहाकार उडतो. यापूर्वी अनेकदा मोठा पाऊस झाल्यावर शहराची ‘मुंबई’प्रमाणे अवस्था झाली. शहरातील दहा मोठ्या नाल्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. नाल्यांमध्ये प्रचंड गाळ, केरकचरा आणि नाल्यांवर झालेल्या मोठमोठ्या अतिक्रमणांनी पाण्याचा नैसर्गिक प्रवाहच बंद झाला आहे.४मागील तीन महिन्यांपासून कचराकोंडी निर्माण झाली आहे. शहरातील प्रमुख नाल्यांमध्ये सर्वाधिक कचरा दिसून येत आहे.नियोजनाचा बट्ट्याबोळ४दरवर्षीप्रमाणे यंदाही वेधशाळेने पाऊस चांगला, भरपूर होणार, असा अंदाज वर्तविला आहे. वेधशाळेचे अंदाज दरवर्षी किती अचूक ठरतात हे नागरिकांना माहीत आहे. तरी महापालिकेने तयारी काहीच केलेली नाही. मान्सूनपूर्व कामांच्या आढावा घेण्यासाठी नवनियुक्त आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी बैठक आयोजित केली होती. तांत्रिक कारणांमुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली. प्रशासनाप्रमाणेच पदाधिकारीही आता ‘आपल्या’ कामांमध्ये मग्न झाले आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद