शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

औरंगाबाद शहरातील नालेसफाईकडेही मनपाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:10 IST

मान्सून यंदा लवकर धडकणार आहे. मान्सूनपूर्वी महापालिकेला दरवर्षी नालेसफाई करावी लागते. मे महिना संपत आला तरी नालेसफाईचा नारळ प्रशासनाने फोडला नाही. प्रशासनाकडून १९ मेपासून बैठकांचे नियोजन करण्यात येत आहे. पावसाळा संपल्यावर महापालिका नालेसफाई करणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देतयारी शून्य : मे महिना संपतासंपता मनपा करणार नियोजन; नालेसफाई कागदावरच होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मान्सून यंदा लवकर धडकणार आहे. मान्सूनपूर्वी महापालिकेला दरवर्षी नालेसफाई करावी लागते. मे महिना संपत आला तरी नालेसफाईचा नारळ प्रशासनाने फोडला नाही. प्रशासनाकडून १९ मेपासून बैठकांचे नियोजन करण्यात येत आहे. पावसाळा संपल्यावर महापालिका नालेसफाई करणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.महापालिकेसाठी नालेसफाई अत्यंत आवडीचा विषय होता. मागील काही वर्षांमध्ये या नालेसफाईतील खाबूगिरी तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी संपविली. त्यामुळे कोट्यवधींच्या उधळपट्टीला ब्रेक लागला.प्रशासनाचाही या नालेसफाईतील ‘रस’ संपला. यंदाही शहरातील ९ झोनसाठी फक्त ६० ते ७० लाखांच्या खर्चाचा अंदाज बांधण्यात आला आहे.दरवर्षी जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होते, हे माहीत आहे. मार्च, एप्रिल महिन्यापासूनच तयारी करायला हवी.महापालिका मे किंवा जून महिन्यात कामाला लागते. आणीबाणी कायद्याचा वापर करून ही कामे उरकण्यावर अधिकाऱ्यांचा अधिक भर असतो. दरवर्षी ज्या पद्धतीने नालेसफाई करायला हवी त्या पद्धतीने होत नाही. नाल्याच्या दर्शनी भागातील केरकचरा काढण्यात येतो. नाल्यातील एक इंचही गाळ काढण्यात येत नाही. गाळ काढण्यासाठी कोट्यवधी रुपये लागतील, असा दावा प्रशासनाकडून दरवर्षी करण्यात येतो.मोठा पाऊस झाल्यासऔरंगाबाद शहरात अनेकदा मुसळधार पाऊस झाला आहे. मागील वर्षी जयभवानीनगर येथे असंख्य घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यानंतर यंदा मनपाने नाल्यातील अनेक अतिक्रमणे हटविली. जयभवानीनगरसारखी अवस्था शहरात अनेक ठिकाणी आहे.कचºयाने नाले तुडुंब४शहरात मोठा पाऊस झाल्यास उथळ नाल्यामुळे सखल भागात हाहाकार उडतो. यापूर्वी अनेकदा मोठा पाऊस झाल्यावर शहराची ‘मुंबई’प्रमाणे अवस्था झाली. शहरातील दहा मोठ्या नाल्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. नाल्यांमध्ये प्रचंड गाळ, केरकचरा आणि नाल्यांवर झालेल्या मोठमोठ्या अतिक्रमणांनी पाण्याचा नैसर्गिक प्रवाहच बंद झाला आहे.४मागील तीन महिन्यांपासून कचराकोंडी निर्माण झाली आहे. शहरातील प्रमुख नाल्यांमध्ये सर्वाधिक कचरा दिसून येत आहे.नियोजनाचा बट्ट्याबोळ४दरवर्षीप्रमाणे यंदाही वेधशाळेने पाऊस चांगला, भरपूर होणार, असा अंदाज वर्तविला आहे. वेधशाळेचे अंदाज दरवर्षी किती अचूक ठरतात हे नागरिकांना माहीत आहे. तरी महापालिकेने तयारी काहीच केलेली नाही. मान्सूनपूर्व कामांच्या आढावा घेण्यासाठी नवनियुक्त आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी बैठक आयोजित केली होती. तांत्रिक कारणांमुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली. प्रशासनाप्रमाणेच पदाधिकारीही आता ‘आपल्या’ कामांमध्ये मग्न झाले आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद