शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याला पाणी देण्यास नगरच्या शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 15:19 IST

समन्यायी पाणी वाटपाबाबत बैठक सुरु असून दुपारपर्यंत याबाबत काही निर्णय झाला नाही. 

औरंगाबाद : नगरच्या शेतकऱ्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळाच्या कार्यालयात येत जायकवाडी धरणात नगर जिल्ह्यातून पाणी सोडण्यास विरोध केला. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळात सध्या समन्यायी पाणी वाटपाबाबत बैठक सुरु असून दुपारपर्यंत याबाबत काही निर्णय झाला नाही. 

अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांचे पाणी जायकवाडीला सोडण्याबाबत आज गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळात बैठक सुरु आहे. या बैठकीत समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार वरच्या धरणातून सुमारे १२ टीएमसी पाणी जायकवाडीला देण्याचा निर्णय होणार आहे. आज दुपारी बैठका सुरु असताना नगर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी मंडळाच्या कार्यालयात येत हे पाणी वाटप समन्यायी नसून असमन्यायी असल्याचा आरोप करत पाणी वाटपाला विरोध केला. 

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी संचालकांना त्यांनी या संदर्भात एक निवेदन दिले आहे. निवेदनात २०१२ पासून पाणी वाटप कायद्याद्वारे नगर आणि नाशिक जिल्ह्यातून पाणी नेले जाते हे अन्यायकारक आहे, जायकवाडी धरणाची क्षमता महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश राज्यातील वादामुळे वाढविण्यात आली आहे, जायकवाडीचे लाभक्षेत्र व ऊर्ध्व धरणांचे लाभ क्षेत्र यांची पीकनिहाय गरज व पर्जन्यमान विचारात घेतले नाही. जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात ११ उच्चस्तरीय बंधारे बांधण्यात आली आहेत, ही बंधारे शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागवत आहेत आदी कारणे नमूद करत आंदोलक शेतकऱ्यांनी वरच्या धरणातून पाणी सोडण्यास विरोध केला. 

दरम्यान, मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधीने दुष्काळी परिस्थिती पाहता समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार पाणी सोडण्याची मागणी केली आहे. यामुळे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळात बैठक आयोजित करण्यात आली आहे. आज दुपारपर्यंत या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नव्हता.  

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबादAhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी