शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

मराठवाड्याला पाणी देण्यास नगरच्या शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 15:19 IST

समन्यायी पाणी वाटपाबाबत बैठक सुरु असून दुपारपर्यंत याबाबत काही निर्णय झाला नाही. 

औरंगाबाद : नगरच्या शेतकऱ्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळाच्या कार्यालयात येत जायकवाडी धरणात नगर जिल्ह्यातून पाणी सोडण्यास विरोध केला. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळात सध्या समन्यायी पाणी वाटपाबाबत बैठक सुरु असून दुपारपर्यंत याबाबत काही निर्णय झाला नाही. 

अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांचे पाणी जायकवाडीला सोडण्याबाबत आज गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळात बैठक सुरु आहे. या बैठकीत समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार वरच्या धरणातून सुमारे १२ टीएमसी पाणी जायकवाडीला देण्याचा निर्णय होणार आहे. आज दुपारी बैठका सुरु असताना नगर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी मंडळाच्या कार्यालयात येत हे पाणी वाटप समन्यायी नसून असमन्यायी असल्याचा आरोप करत पाणी वाटपाला विरोध केला. 

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी संचालकांना त्यांनी या संदर्भात एक निवेदन दिले आहे. निवेदनात २०१२ पासून पाणी वाटप कायद्याद्वारे नगर आणि नाशिक जिल्ह्यातून पाणी नेले जाते हे अन्यायकारक आहे, जायकवाडी धरणाची क्षमता महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश राज्यातील वादामुळे वाढविण्यात आली आहे, जायकवाडीचे लाभक्षेत्र व ऊर्ध्व धरणांचे लाभ क्षेत्र यांची पीकनिहाय गरज व पर्जन्यमान विचारात घेतले नाही. जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात ११ उच्चस्तरीय बंधारे बांधण्यात आली आहेत, ही बंधारे शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागवत आहेत आदी कारणे नमूद करत आंदोलक शेतकऱ्यांनी वरच्या धरणातून पाणी सोडण्यास विरोध केला. 

दरम्यान, मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधीने दुष्काळी परिस्थिती पाहता समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार पाणी सोडण्याची मागणी केली आहे. यामुळे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळात बैठक आयोजित करण्यात आली आहे. आज दुपारपर्यंत या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नव्हता.  

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबादAhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी