शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मराठवाड्याला पाणी देण्यास नगरच्या शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 15:19 IST

समन्यायी पाणी वाटपाबाबत बैठक सुरु असून दुपारपर्यंत याबाबत काही निर्णय झाला नाही. 

औरंगाबाद : नगरच्या शेतकऱ्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळाच्या कार्यालयात येत जायकवाडी धरणात नगर जिल्ह्यातून पाणी सोडण्यास विरोध केला. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळात सध्या समन्यायी पाणी वाटपाबाबत बैठक सुरु असून दुपारपर्यंत याबाबत काही निर्णय झाला नाही. 

अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांचे पाणी जायकवाडीला सोडण्याबाबत आज गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळात बैठक सुरु आहे. या बैठकीत समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार वरच्या धरणातून सुमारे १२ टीएमसी पाणी जायकवाडीला देण्याचा निर्णय होणार आहे. आज दुपारी बैठका सुरु असताना नगर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी मंडळाच्या कार्यालयात येत हे पाणी वाटप समन्यायी नसून असमन्यायी असल्याचा आरोप करत पाणी वाटपाला विरोध केला. 

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी संचालकांना त्यांनी या संदर्भात एक निवेदन दिले आहे. निवेदनात २०१२ पासून पाणी वाटप कायद्याद्वारे नगर आणि नाशिक जिल्ह्यातून पाणी नेले जाते हे अन्यायकारक आहे, जायकवाडी धरणाची क्षमता महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश राज्यातील वादामुळे वाढविण्यात आली आहे, जायकवाडीचे लाभक्षेत्र व ऊर्ध्व धरणांचे लाभ क्षेत्र यांची पीकनिहाय गरज व पर्जन्यमान विचारात घेतले नाही. जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात ११ उच्चस्तरीय बंधारे बांधण्यात आली आहेत, ही बंधारे शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागवत आहेत आदी कारणे नमूद करत आंदोलक शेतकऱ्यांनी वरच्या धरणातून पाणी सोडण्यास विरोध केला. 

दरम्यान, मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधीने दुष्काळी परिस्थिती पाहता समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार पाणी सोडण्याची मागणी केली आहे. यामुळे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळात बैठक आयोजित करण्यात आली आहे. आज दुपारपर्यंत या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नव्हता.  

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबादAhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी