शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
3
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
4
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
5
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
6
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
7
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
8
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
9
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

ऐनवेळी नाफेडचा तूर खरेदीस नकार; शेतकऱ्यांना बसणार दीड कोटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 18:08 IST

शेतकऱ्यांना दिड कोटीचा फटका, व्यापारी मालामाल

ठळक मुद्देनाफेडच्या तुघलकी निर्णयाचा ८०० शेतकऱ्यांना फटकाशासनाने तूर खरेदीसाठी ५८०० प्रति क्विंटल भाव घोषित केला आहे.

- संजय जाधव

पैठण : शासनाच्या आधारभूत किंमतीनुसार तुर घालण्यासाठी कागदपत्रासह नोंदणी पूर्ण केलेल्या पैठण तालुक्यातील ८०० शेतकऱ्यांची तूर खरेदीस नाफेडने अचानक नकार दिल्याने शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. नाफेडच्या या तुघलकी निर्णयामुळे १० हजार क्विंटल तूर शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या घशात घालावी लागणार आहे शासनाची आधारभूत किंमत व बाजारातील भाव लक्षात घेता शेतकऱ्यांना १ कोटी ४० लाख रूपयाचा फटका बसणार आहे. नोंदणी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शासनाने तूर खरेदीसाठी ५८०० प्रति क्विंटल भाव घोषित केला आहे. १ जानेवारी पासून नोंदणी सुरू असून १४ फेब्रुवारी, २०२० पर्यत नाव नोंदणीची मुदत आहे. शेतकऱ्यांनी तूर घालण्यासाठी सातबारा उतारा, चालू बॅंक खाते पासबुक प्रत, आधारकार्ड  आदी कागदपत्रासह नोंदणी केली. नोंदणी यशस्वी झाल्याचा शेतकऱ्यांना मोबाइलवर एसएमएस आला. मात्र ऐनवेळी शेतकऱ्यांना नाफेडच्या अधिकाऱ्यांनी तुमची नोंदणी रद्द करण्यात आली असून तूर आणू नका अशा सूचना दिल्या. दरम्यान, शेतकऱ्यांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांना नोंदणी का रद्द करण्यात आली या बाबत विचारणा केली वेगवेगळी कारणे सांगण्यात येत आहेत. यामुळे तूर खरेदी न करण्याबाबत संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांना दिड कोटीचा फटका, व्यापारी मालामाल८०० शेतकऱ्यांची तूर नाफेडने खरेदी केली नाही तर शेतकऱ्यांना ही तूर खाजगी व्यापाऱ्यांना विकावी लागणार आहे. शासनाची तूर खरेदीची आधारभूत किंमत ५८०० तर व्यापाऱ्यांचा खरेदीचा भाव ४४०० प्रती क्विंटल असा आहे. म्हणजेच प्रती क्विंटल शेतकऱ्यांना १४०० रूपयाचा फटका सहन करावा लागणार आहे. ८०० शेतकऱ्यांना अंदाजे  १० हजार क्विंटल तूर खाजगी व्यापाऱ्यांना द्यावी लागणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे १ कोटी ४० लक्ष रूपयाचे नुकसान होणार आहे. 

व्यापारी व नाफेड अधिकाऱ्यांचे साटेलोटे...?ऐनवेळी तूर खरेदीस नकार देण्यात नाफेडचे अधिकारी व व्यापारी यांचे साटेलोटे असल्याचा आरोप अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजी सुर्यवंशी यांनी केला आहे. याविरोधात ३१ जानेवारी रोजी आंदोलनाच इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMarketबाजारfundsनिधी