शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

टँकर गॅस गळती प्रकरणानंतर महापालिका ॲक्शन मोडवर: प्रमुख रस्त्यांंच्या ऑडिटसाठी समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 20:22 IST

सा. बां. विभागाने रिफ्लेक्टर, डायव्हर्शन ॲरो बोर्ड वगैरे काहीच केले नाही. त्यामुळे जालना रोडसह प्रमुख रस्त्यांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर : रस्त्यांवरील तांत्रिक दोषामुळे गुरुवारी सकाळी सिडको उड्डाणपुलाजवळ गॅस गळती झाली. भविष्यात अशा पद्धतीची घटना पुन्हा घडू नये, यासाठी प्रमुख रस्त्यांचे ऑडिट करण्याचा निर्णय शुक्रवारी मनपा प्रशासनाने घेतला. यासाठी अधिकारी, तज्ज्ञांची समिती नेमली जाईल. ७ दिवसांत समितीने अहवाल देणे अपेक्षित आहे. त्यानंतर युद्धपातळीवर विविध उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

शुक्रवारी माध्यमांशी बोलताना जी. श्रीकांत यांनी नमूद केले की, ही घटना टाळता आली असती. रस्त्यातील तांत्रिक दोष हे मुख्य कारण आहे. उड्डाणपूल रस्त्याच्या बाजूला बांधला. आता उड्डाणपूल पाडणे तर शक्य नाही. किमान उपाययोजना करणे तरी सहज शक्य होते. सा. बां. विभागाने रिफ्लेक्टर, डायव्हर्शन ॲरो बोर्ड वगैरे काहीच केले नाही. त्यामुळे जालना रोडसह प्रमुख रस्त्यांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एक समिती नेमली जाईल. समितीमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक, वाहतूक पोलिस विभागातील अधिकारी, सा. बां. आणि महावितरण कंपनीचे अधिकारी असतील. समिती सात दिवसांत अहवाल सादर करेल. सर्व प्रकारच्या जड वाहनांना जालना रोडवर बंदी केली जाणार आहे. बीड बायपास रस्त्यावरूनच जड वाहने यापुढे जातील. याबद्दलचे आदेश लगेचच काढण्यात येत आहेत.पर्यायी रस्ते त्वरित शोधा

जालना रोड बंद झाल्यानंतर कामगार चौक व अन्य भागात वाहतुकीचा खेळखंडोबा झाला. शुल्लक कारणांसाठी अर्धवट राहिलेले रस्ते शोधावेत, असे आदेश अधिकाऱ्यांंना दिले. झेंडा चौक येथे काही अतिक्रमणे, मालमत्तांचे भूसंपादन बाकी आहे. मोबदला देणे नंतर बघू, तूर्त शहराला वेठीस धरता येणार नाही. अगोदर रस्ता हे आमचे उद्दिष्ट आहे. जिन्सी ते दूध डेअरी, पीईएस कॉलेजमधील डीपी रोड करणे हे शहरासाठी आणि आणीबाणीच्या परिस्थितीसाठी आवश्यक आहे. कैलासनगर ते एमजीएम हा रस्ताही युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रशासन म्हणाले.

बायपासवर अशी घटना घडली तर?बीड बायपासवर अशी घटना घडली तर काय करणार? असा प्रश्न जी. श्रीकांत यांनी केला. सोलापूर-धुळेकडे वाहतूक कशी वळविणार, याचाही विचार आताच झाला पाहिजे. भविष्याचा विचार करून आताच ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

अग्निशमनला साधनांची गरजशहरात किमान १० ठिकाणी अग्निशमन केंद्र हवे. मनपाच्या अग्निशमन विभागाकडे आता मनुष्यबळाची चिंता नाही. त्यांना गॅस गळती, पूर परिस्थिती, भूकंप आदी आपत्तीच्या वेळी कसे काम करावे, याचे प्रशिक्षण दिले जाईल. डिझास्टर मॅनेजमेंट हा विभाग सक्षमपणे सांभाळतोय. त्यांना विविध साधनांची गरज आहे. ती साधने कोणती, यावर आम्ही काम करतोय.

जागोजागी टँकर भरता यावेतगुरुवारी घटनास्थळापासून एन-६ पाण्याची टाकी जवळ होती. तसेच नक्षत्रवाडी एसटीपीचे पाणी वापरण्यात आले. आणीबाणीचा विचार करून शहरात टँकर भरण्यासाठी ठिकठिकाणी सोय असायला हवी. टँकर भरून आणण्यात कमीत कमी वेळ गेला पाहिजे, असेही प्रशासक म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका