शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

टँकर गॅस गळती प्रकरणानंतर महापालिका ॲक्शन मोडवर: प्रमुख रस्त्यांंच्या ऑडिटसाठी समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 20:22 IST

सा. बां. विभागाने रिफ्लेक्टर, डायव्हर्शन ॲरो बोर्ड वगैरे काहीच केले नाही. त्यामुळे जालना रोडसह प्रमुख रस्त्यांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर : रस्त्यांवरील तांत्रिक दोषामुळे गुरुवारी सकाळी सिडको उड्डाणपुलाजवळ गॅस गळती झाली. भविष्यात अशा पद्धतीची घटना पुन्हा घडू नये, यासाठी प्रमुख रस्त्यांचे ऑडिट करण्याचा निर्णय शुक्रवारी मनपा प्रशासनाने घेतला. यासाठी अधिकारी, तज्ज्ञांची समिती नेमली जाईल. ७ दिवसांत समितीने अहवाल देणे अपेक्षित आहे. त्यानंतर युद्धपातळीवर विविध उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

शुक्रवारी माध्यमांशी बोलताना जी. श्रीकांत यांनी नमूद केले की, ही घटना टाळता आली असती. रस्त्यातील तांत्रिक दोष हे मुख्य कारण आहे. उड्डाणपूल रस्त्याच्या बाजूला बांधला. आता उड्डाणपूल पाडणे तर शक्य नाही. किमान उपाययोजना करणे तरी सहज शक्य होते. सा. बां. विभागाने रिफ्लेक्टर, डायव्हर्शन ॲरो बोर्ड वगैरे काहीच केले नाही. त्यामुळे जालना रोडसह प्रमुख रस्त्यांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एक समिती नेमली जाईल. समितीमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक, वाहतूक पोलिस विभागातील अधिकारी, सा. बां. आणि महावितरण कंपनीचे अधिकारी असतील. समिती सात दिवसांत अहवाल सादर करेल. सर्व प्रकारच्या जड वाहनांना जालना रोडवर बंदी केली जाणार आहे. बीड बायपास रस्त्यावरूनच जड वाहने यापुढे जातील. याबद्दलचे आदेश लगेचच काढण्यात येत आहेत.पर्यायी रस्ते त्वरित शोधा

जालना रोड बंद झाल्यानंतर कामगार चौक व अन्य भागात वाहतुकीचा खेळखंडोबा झाला. शुल्लक कारणांसाठी अर्धवट राहिलेले रस्ते शोधावेत, असे आदेश अधिकाऱ्यांंना दिले. झेंडा चौक येथे काही अतिक्रमणे, मालमत्तांचे भूसंपादन बाकी आहे. मोबदला देणे नंतर बघू, तूर्त शहराला वेठीस धरता येणार नाही. अगोदर रस्ता हे आमचे उद्दिष्ट आहे. जिन्सी ते दूध डेअरी, पीईएस कॉलेजमधील डीपी रोड करणे हे शहरासाठी आणि आणीबाणीच्या परिस्थितीसाठी आवश्यक आहे. कैलासनगर ते एमजीएम हा रस्ताही युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रशासन म्हणाले.

बायपासवर अशी घटना घडली तर?बीड बायपासवर अशी घटना घडली तर काय करणार? असा प्रश्न जी. श्रीकांत यांनी केला. सोलापूर-धुळेकडे वाहतूक कशी वळविणार, याचाही विचार आताच झाला पाहिजे. भविष्याचा विचार करून आताच ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

अग्निशमनला साधनांची गरजशहरात किमान १० ठिकाणी अग्निशमन केंद्र हवे. मनपाच्या अग्निशमन विभागाकडे आता मनुष्यबळाची चिंता नाही. त्यांना गॅस गळती, पूर परिस्थिती, भूकंप आदी आपत्तीच्या वेळी कसे काम करावे, याचे प्रशिक्षण दिले जाईल. डिझास्टर मॅनेजमेंट हा विभाग सक्षमपणे सांभाळतोय. त्यांना विविध साधनांची गरज आहे. ती साधने कोणती, यावर आम्ही काम करतोय.

जागोजागी टँकर भरता यावेतगुरुवारी घटनास्थळापासून एन-६ पाण्याची टाकी जवळ होती. तसेच नक्षत्रवाडी एसटीपीचे पाणी वापरण्यात आले. आणीबाणीचा विचार करून शहरात टँकर भरण्यासाठी ठिकठिकाणी सोय असायला हवी. टँकर भरून आणण्यात कमीत कमी वेळ गेला पाहिजे, असेही प्रशासक म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका