शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

महिन्याचे खर्च भागविताना महापालिकेची तारेवरची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 4:46 PM

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचा फटका औरंगाबाद महापालिकेलाही बसला असून मागील पाच महिन्यांमध्ये अपेक्षित उत्पन्न न आल्यामुळे तब्बल २५० कोटींची तूट निर्माण झाली आहे.

मुजीब देवणीकर

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचा फटका औरंगाबाद महापालिकेलाही बसला असून मागील पाच महिन्यांमध्ये अपेक्षित उत्पन्न न आल्यामुळे तब्बल २५० कोटींची तूट निर्माण झाली आहे. महापालिकेच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या  मालमत्ता कर आणि पाणीपट्टीतून  अत्यंत कमी उत्पन्न  मिळाल्याने मनपाचे आर्थिक नियोजन कोलमडले असून महिन्याचे खर्च भागविताना महापालिकेची  तारेवरची कसरत होत आहे.

मागील काही वर्षांपासूनच औरंगाबाद महापालिकेची अर्थस्थिती अत्यंत डळमळीत आहे. उत्पन्नापेक्षा  चारपट अधिक विकास कामे करण्यात आल्याने २४० कोटी रूपयांच्या विकास कामांची देयके प्रलंबित आहेत. दोन वर्षांपासून कंत्राटदारांना बिल न दिल्यामुळे नविन विकास कामे घेण्यास कुणीही तयार नाही. त्यामुळे  सध्या महापालिकेच्या निधीतून होणारी विकासकामेही ठप्प आहेत.

महापालिकेला मार्च महिन्यात मालमत्ता करातून कोट्यावधी रूपये मिळतात. विविध कार्यालयांकडून कर उपलब्ध होतो. कोरोनामुळे मात्र हा निधी अजूनपर्यंतही मिळालेला नाही. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात मालमत्ता करातून फक्त ३२ कोटी रूपये मिळाले असून १०० कोटी रूपये येणे मनपाला अपेक्षित होते. महापालिकेचा आर्थिक कणा असलेल्या नगर रचना विभागाकडूनही पाच महिन्यात फक्त १३ कोटी रूपये प्राप्त झाले. मालमत्ता विभागाने १ कोटी रूपयांची कमाई करून दिली असून मालमत्ता करातून उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात आल्याचे मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांनी सांगितले. यातच भर म्हणून मागील ७ महिन्यांपासून पालिकेची ८० टक्के यंत्रणा कोरोनाच्या कामात व्यस्त आहे. कोरोनासाठी जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत फक्त १४ कोटी रूपये महापालिकेला मिळाले. आणखी ३८ कोटी द्यावेत, अशी  मागणी महापालिकेने केली आहे.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्था