शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
4
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
5
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
6
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
7
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
8
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
9
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
10
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
11
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
12
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
13
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
14
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
15
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
16
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
17
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
18
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
19
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...

पडेगाव, मिटमिटात ४३ वर्षांनंतर हातोडा; लाखावर लोकसंख्या गेल्यानंतर मनपाचे उघडले डोळे

By विकास राऊत | Updated: July 4, 2025 20:25 IST

तीन विकास आराखडे आजवर झाले असतील. त्यानुसार मागेच कारवाई झाली असती तर एवढ्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या नसत्या.

छत्रपती संभाजीनगर : पडेगाव, मिटमिटा परिसर महापालिका हद्दीत १९८२ साली आला. दि. ८ डिसेंबर १९८२ रोजी महापालिकेची स्थापना झाल्यानंतर लगतचे १८ खेडी पालिका हद्दीत आले. त्यात पडेगाव आणि मिटमिटा या गावांचादेखील समावेश आहे. सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेली ही गावे ग्रामपंचायतीमध्ये होती. मनपा हद्दीत ही दोन्ही गावे आल्यानंतर ४३ वर्षांत त्या गावांची लोकसंख्या एक लाखाहून पुढे गेल्यानंतर आता कुठे विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरणासाठी पालिकेचे डोळे उघडले.

समृद्धी महामार्ग आणि सोलापूर-धुळे हायवे होण्यापूर्वी शहरातून मुंबईकडे जाण्यासाठी पडेगाव-मिटमिटामधून हाच प्रमुख मार्ग होता. वेरूळ, खुलताबाद, दौलताबाद, कन्नड ते चाळीसगावमार्गे धुळ्याकडे जाण्यासाठी पडेगाव ओलांडून जावे लागत असे. मनपावर १९८२ ते १९८८ पर्यंत प्रशासक हाेते. प्रशासकराज १९८८ साली संपल्या पहिल्या निवडणुकीत पडेगाव हा एकमेव वॉर्ड होता. २०१५ साली झालेल्या निवडणुकीत पडेगाव आणि मिटमिटा हे स्वतंत्र वॉर्ड होते. ४३ वर्षांत गावांचे शहरात रूपांतर झालेला हा परिसर सध्या समृद्धी महामार्ग, सोलापूर धुळे हायवे, वाळूज औद्योगिक वसाहतीलगतचा मध्यवर्ती भाग आहे.

अपघातांचा मार्ग म्हणून चर्चेतअलीकडच्या काळात जडवाहतुकीला पर्यायी मार्ग सुरू झाल्यामुळे पडेगाव ते मिटमिटा या रस्त्यावर होणारे अपघात कमी झाले आहेत. मागील वर्षभरात तीन मोठे अपघात झाले. यात दोघांचा मृत्यू झाला. किरकोळ अपघातांची संख्या तर मोठी आहे.

पडेगाव वॉर्डामध्ये किती वसाहतीरामगोपालनगर, माजी सैनिक कॉलनी, देवगिरी व्हॅली, चिनार गार्डन, फिरदौस गार्डन, गुलमोहर कॉलनी, कादरी हॉस्पिटल परिसर, प्रिया कॉलनी, पावर हाऊस, चेतननगर, सुंदरनगर, मीरानगर या वसाहती आहेत, तर मिटामिटा वॉर्डात बकतुलनगर, तारांगण, आर्चअंगण, मिस्बाह कॉलनी, मच्छिंद्रनाथ मंदिर परिसर, अप्पावाडी, शरणापूर फाटा परिसर येतो. या भागातील नागरी वसाहतींना शहरात येण्यासाठी विद्यमान रस्ता एकमेव आणि सोयीचा आहे. २० ते २२ वसाहतींमधील वाहनांचे दळणवळण वाहतुकीच्या कोंडीतून येथे नित्याचे आहे.

एक्सपर्ट काय म्हणतातशहरात प्रवेश करणारा तो महत्त्वाचा रस्ता आहे. ४३ वर्षांनंतर मनपाने कारवाई केली आहे. ही कारवाई मागेच करणे अपेक्षित होते. तीन विकास आराखडे आजवर झाले असतील. त्यानुसार मागेच कारवाई झाली असती तर एवढ्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या नसत्या. आता लोकसंख्या लाखाच्या पुढे गेली असेल. अतिक्रमणांवर कारवाई व्हावी, तर मालकी असलेल्यांना मनपााने टीडीआर, एफएसआय द्यावा.-जयंत खरवडकर, सेवानिवृत्त मनपा अधिकारी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीEnchroachmentअतिक्रमणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका