शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

महापालिकेच्या ‘कुरुक्षेत्र’ आखणीच्या हालचाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 18:57 IST

आता वॉर्डांऐवजी प्रभागानुसार होणार निवडणुका 

ठळक मुद्दे२०११ च्या लोकसंख्येवरच रचना या आठवड्यात आयोगाचे पत्र येणार 

- विकास राऊत 

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकांचे निकाल लागत नाहीत तोवरच आता औरंगाबाद शहरातील राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. एप्रिल २०२० मध्ये महापालिका निवडणुका प्रस्तावित असून, यावेळी वॉर्डांऐवजी प्रभागनिहाय निवडणुका होणार आहेत.प्रभागांच्या रचनेसाठी २०११ ची लोकसंख्या गृहीत धरण्यात येणार आहे. प्रभाग आखणीसाठी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापालिका राज्य निवडणूक आयोगाकडून पत्र देण्यात येणार असल्याची माहिती आयोगाच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली. 

आयोगाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, साधारणत: निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वी आरक्षण आणि प्रभाग (बहुसदस्यीय पद्धती) रचनेला सुरुवात केली जाते. त्यानुसार औरंगाबाद महापालिकेची निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणार असल्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पालिकेला प्रभाग, लोकसंख्या, आरक्षणाच्या अनुषंगाने पत्र देण्यात येईल. तीन किंवा चार वॉर्डांचा एक प्रभाग यानुसार रचना केली जाते. सम किंवा विषम संख्या, असा कुठलाही मुद्दा रचना आणि आखणीमध्ये नसतो. वॉर्डांच्या सीमा, लोकसंख्या याबाबत येत्या आठवड्यात आयोग पालिका प्रशासनाला पत्र देऊन अवगत करील. 

प्रभागरचनेचा एक फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यानुसारच रचना केली जाते. मुंबई महापालिका वगळता राज्यात सर्व मनपांच्या निवडणुका प्रभाग पद्धतीने घेण्याबाबत विधिमंडळाचा कायदा आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय नेत्यांनी कितीही दबाव आणला तरी त्यात बदल होऊन वॉर्डनिहाय रचना आता होणे शक्य नाही अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. ३ नोव्हेंबरपर्यंत राज्य निवडणूक ंआयोगाचे पत्र येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. सदरील पत्रासोबत प्रभाग रचना कशी करायची याचा नमुना पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

२०१५ मध्ये अशी झाली होती रचना २०१५ साली झालेल्या निवडणुकांसाठी जानेवारी २०१५ पर्यंत वॉर्डरचनेचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर सामाजिक आरक्षणानुसार वॉर्डांसाठी सोडत झाली होती. त्यामुळे यावेळीदेखील याच लगबगीने मनपा निवडणुका विभागाला काम करावे लागणार आहे. सध्या महापालिकेत ११५ वॉर्ड आहेत. यानुसार ३८ प्रभागांची रचना होईल. त्यात तीन सदस्यांचा एक प्रभाग असू शकेल.४ चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग करायचा म्हटल्यास २९ प्रभाग होणे शक्य आहे. २०१५ साली झालेल्या निवडणुकीसाठी २०११ च्या जनगणनेतील लोकसंख्येचा आधार घेण्यात आला होता. ११ लाख ७५ हजार ११६ एवढी लोकसंख्या त्यावर्षी समोर ठेवून वॉर्डांची आखणी झाली होती. मनपा निवडणुकीनंतर सातारा- देवळाई हे दोन वॉर्ड पालिकेत आले होते. त्यानंतर तिथे पोटनिवडणूक झाली होती.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबाद