शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या ‘कुरुक्षेत्र’ आखणीच्या हालचाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 18:57 IST

आता वॉर्डांऐवजी प्रभागानुसार होणार निवडणुका 

ठळक मुद्दे२०११ च्या लोकसंख्येवरच रचना या आठवड्यात आयोगाचे पत्र येणार 

- विकास राऊत 

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकांचे निकाल लागत नाहीत तोवरच आता औरंगाबाद शहरातील राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. एप्रिल २०२० मध्ये महापालिका निवडणुका प्रस्तावित असून, यावेळी वॉर्डांऐवजी प्रभागनिहाय निवडणुका होणार आहेत.प्रभागांच्या रचनेसाठी २०११ ची लोकसंख्या गृहीत धरण्यात येणार आहे. प्रभाग आखणीसाठी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापालिका राज्य निवडणूक आयोगाकडून पत्र देण्यात येणार असल्याची माहिती आयोगाच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली. 

आयोगाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, साधारणत: निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वी आरक्षण आणि प्रभाग (बहुसदस्यीय पद्धती) रचनेला सुरुवात केली जाते. त्यानुसार औरंगाबाद महापालिकेची निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणार असल्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पालिकेला प्रभाग, लोकसंख्या, आरक्षणाच्या अनुषंगाने पत्र देण्यात येईल. तीन किंवा चार वॉर्डांचा एक प्रभाग यानुसार रचना केली जाते. सम किंवा विषम संख्या, असा कुठलाही मुद्दा रचना आणि आखणीमध्ये नसतो. वॉर्डांच्या सीमा, लोकसंख्या याबाबत येत्या आठवड्यात आयोग पालिका प्रशासनाला पत्र देऊन अवगत करील. 

प्रभागरचनेचा एक फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यानुसारच रचना केली जाते. मुंबई महापालिका वगळता राज्यात सर्व मनपांच्या निवडणुका प्रभाग पद्धतीने घेण्याबाबत विधिमंडळाचा कायदा आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय नेत्यांनी कितीही दबाव आणला तरी त्यात बदल होऊन वॉर्डनिहाय रचना आता होणे शक्य नाही अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. ३ नोव्हेंबरपर्यंत राज्य निवडणूक ंआयोगाचे पत्र येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. सदरील पत्रासोबत प्रभाग रचना कशी करायची याचा नमुना पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

२०१५ मध्ये अशी झाली होती रचना २०१५ साली झालेल्या निवडणुकांसाठी जानेवारी २०१५ पर्यंत वॉर्डरचनेचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर सामाजिक आरक्षणानुसार वॉर्डांसाठी सोडत झाली होती. त्यामुळे यावेळीदेखील याच लगबगीने मनपा निवडणुका विभागाला काम करावे लागणार आहे. सध्या महापालिकेत ११५ वॉर्ड आहेत. यानुसार ३८ प्रभागांची रचना होईल. त्यात तीन सदस्यांचा एक प्रभाग असू शकेल.४ चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग करायचा म्हटल्यास २९ प्रभाग होणे शक्य आहे. २०१५ साली झालेल्या निवडणुकीसाठी २०११ च्या जनगणनेतील लोकसंख्येचा आधार घेण्यात आला होता. ११ लाख ७५ हजार ११६ एवढी लोकसंख्या त्यावर्षी समोर ठेवून वॉर्डांची आखणी झाली होती. मनपा निवडणुकीनंतर सातारा- देवळाई हे दोन वॉर्ड पालिकेत आले होते. त्यानंतर तिथे पोटनिवडणूक झाली होती.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबाद