शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

शहर स्वच्छतेसाठी महापालिकेचा २० कलमी कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 14:55 IST

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात शहराची रॅंकींग सुधारली असून देशातील प्रमुख १० शहरांमध्ये शहराचा समावेश व्हावा, यासाठी प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्वच्छतेवर भर देत २० कलमी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. 

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात शहराची रॅंकींग सुधारली असून देशातील प्रमुख १० शहरांमध्ये शहराचा समावेश व्हावा, यासाठी प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्वच्छतेवर भर देत २० कलमी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. 

यामध्ये सर्वाधिक भर महापालिकेच्या एसटीपी प्लांटमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा वापर कसा होईल, त्यातून महापालिकेचे उत्पन्न कसे वाढेल यावर देण्यात येत आहे. सुरतच्या मॉडेलचा अभ्यास केला जात असून अनेक नागरिकांनी नाल्यात कचरा टाकणे थांबवावे यासाठी नाल्याच्या दर्शनी भागावर लोखंडी जाळी लावण्यात येणार आहे. तसेच ई- कचरा जमा करण्यासाठी विविध ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जाईल. 

ज्या भागातून जास्त कचरा निघतो किंवा कचरा रस्त्यावर आणून टाकला जातो, तिथे फिक्स पाॅईंट तयार केले  जातील. सुक्या कचऱ्यावर  तात्काळ  प्रक्रिया केली जाईल, यासाठी कांचनवाडी, रामनगर, मध्यवर्ती जकात नाका येथे छोटे प्रकल्प सुरू करण्यात येतील आणि नागरिकांचा  या  मोहिमेत  सहभाग वाढावा यासाठी आय लव्ह औरंगाबाद हे अभियान सुरू करण्यात येईल, असेही महापालिका प्रशासकांनी सांगितले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMarathwadaमराठवाडा