शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनपाने आश्वासन पाळले नाही, आता १० कोटी भरा; अन्यथा छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:40 IST

जलसंपदा विभागाची मनपाला नोटीस : आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याने मनपाकडून पाणीबिलाचा नियमित भरणा केला जात नाही.

छत्रपती संभाजीनगर : शहराचा पाणीपुरवठा खंडित करू नये, यासाठी ३१ मार्चपूर्वी दीड कोटी रुपये भरतो, हे आश्वासन मनपा आयुक्तांनी पाळले नाही. यामुळे संतप्त झालेल्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता महापालिकेला नव्याने नोटीस बजावून १० कोटी रुपये २५ एप्रिलपर्यंत भरा, अन्यथा २८ एप्रिलपासून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे.

जायकवाडी प्रकल्पातून जुन्या आणि नवीन पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराला रोज १४० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. या पाणीवापरासाठी जलसंपदा विभागाकडून महापालिकेला दरवर्षी सुमारे ७ कोटी रुपयांचे बिल देण्यात येते. मात्र, आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याने मनपाकडून पाणीबिलाचा नियमित भरणा केला जात नाही. परिणामी, पाटबंधारे विभागाचे महापालिकेकडे तब्बल ५२ कोटी ४१ लाख रुपयांची पाणीपट्टी थकबाकी आहे. ३१ मार्चच्या पार्श्वभूमीवर मनपाने किमान सहा कोटी रुपयांचा भरणा करावा, यासाठी जायकवाडी पाटबंधारे विभागाने मनपा आयुक्तांकडे पाठपुरावा केला. पाणीपुरवठा खंडित करण्याच्या नोटिसाही बजावल्या. २४ फेब्रुवारी रोजी मनपा आयुक्तांसोबत बैठक झाल्यानंतर मनपाने साडेचार कोटी रुपये दिले.

३१ मार्चला काही दिवस उरले असताना पाटबंधारे विभागाचे मुख्य प्रशासक तथा मुख्य अभियंता जयंत गवळी यांनी मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्याशी उर्वरित पाणीपट्टीसंदर्भात चर्चा केली होती. तेव्हा आयुक्तांनी त्यांना मार्चअखेरपर्यत दीड कोटी रुपये देतो, असे आश्वासन दिले होते. यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला नाही. मात्र, आता एप्रिलचा तिसरा शेवटचा आठवडा सुरू झाला तरी मनपाने दीड कोटी दिले नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी मनपाला नव्याने नोटीस बजावून गत वर्षातील ३ कोटी, तसेच चालू वर्षाचे ७ कोटी असे एकूण १० कोटी रुपये २५ एप्रिलपर्यंत एकरकमी अदा करावेत, अन्यथा शहराचा पाणीपुरवठा २८ एप्रिलपासून बंद करण्याचा इशारा दिला आहे.

पाणीपुरवठा खंडित करण्यात येणारमनपाने आम्हाला आश्वासन देऊनही पाणीपट्टीची थकबाकी दिली नाही. यामुळे आता नव्याने नोटीस बजावून २५ एप्रिलपर्यंत १० कोटींचा भरणा करण्याचे सांगण्यात आले आहे. वेळेत रक्कम जमा न केल्यास २८ एप्रिलपासून छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.- दीपक डोंगरे, सहायक अधीक्षक अभियंता

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकरJayakwadi Damजायकवाडी धरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प