शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

मनपाने आश्वासन पाळले नाही, आता १० कोटी भरा; अन्यथा छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:40 IST

जलसंपदा विभागाची मनपाला नोटीस : आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याने मनपाकडून पाणीबिलाचा नियमित भरणा केला जात नाही.

छत्रपती संभाजीनगर : शहराचा पाणीपुरवठा खंडित करू नये, यासाठी ३१ मार्चपूर्वी दीड कोटी रुपये भरतो, हे आश्वासन मनपा आयुक्तांनी पाळले नाही. यामुळे संतप्त झालेल्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता महापालिकेला नव्याने नोटीस बजावून १० कोटी रुपये २५ एप्रिलपर्यंत भरा, अन्यथा २८ एप्रिलपासून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे.

जायकवाडी प्रकल्पातून जुन्या आणि नवीन पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराला रोज १४० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. या पाणीवापरासाठी जलसंपदा विभागाकडून महापालिकेला दरवर्षी सुमारे ७ कोटी रुपयांचे बिल देण्यात येते. मात्र, आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याने मनपाकडून पाणीबिलाचा नियमित भरणा केला जात नाही. परिणामी, पाटबंधारे विभागाचे महापालिकेकडे तब्बल ५२ कोटी ४१ लाख रुपयांची पाणीपट्टी थकबाकी आहे. ३१ मार्चच्या पार्श्वभूमीवर मनपाने किमान सहा कोटी रुपयांचा भरणा करावा, यासाठी जायकवाडी पाटबंधारे विभागाने मनपा आयुक्तांकडे पाठपुरावा केला. पाणीपुरवठा खंडित करण्याच्या नोटिसाही बजावल्या. २४ फेब्रुवारी रोजी मनपा आयुक्तांसोबत बैठक झाल्यानंतर मनपाने साडेचार कोटी रुपये दिले.

३१ मार्चला काही दिवस उरले असताना पाटबंधारे विभागाचे मुख्य प्रशासक तथा मुख्य अभियंता जयंत गवळी यांनी मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्याशी उर्वरित पाणीपट्टीसंदर्भात चर्चा केली होती. तेव्हा आयुक्तांनी त्यांना मार्चअखेरपर्यत दीड कोटी रुपये देतो, असे आश्वासन दिले होते. यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला नाही. मात्र, आता एप्रिलचा तिसरा शेवटचा आठवडा सुरू झाला तरी मनपाने दीड कोटी दिले नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी मनपाला नव्याने नोटीस बजावून गत वर्षातील ३ कोटी, तसेच चालू वर्षाचे ७ कोटी असे एकूण १० कोटी रुपये २५ एप्रिलपर्यंत एकरकमी अदा करावेत, अन्यथा शहराचा पाणीपुरवठा २८ एप्रिलपासून बंद करण्याचा इशारा दिला आहे.

पाणीपुरवठा खंडित करण्यात येणारमनपाने आम्हाला आश्वासन देऊनही पाणीपट्टीची थकबाकी दिली नाही. यामुळे आता नव्याने नोटीस बजावून २५ एप्रिलपर्यंत १० कोटींचा भरणा करण्याचे सांगण्यात आले आहे. वेळेत रक्कम जमा न केल्यास २८ एप्रिलपासून छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.- दीपक डोंगरे, सहायक अधीक्षक अभियंता

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकरJayakwadi Damजायकवाडी धरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प