शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील विद्यार्थी करिअरचे; औरंगाबादचा पदवीचे बोलतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 19:55 IST

मुंबई आणि औरंगाबादेतील विद्यार्थ्यांच्या विचारसरणीमध्ये मूलभूत फरक असल्याचे जाणवले.

- राम शिनगारे 

मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि औरंगाबाद येथील विद्यापीठांच्या कुलगुरूपदाचा कारभार पाहताना अनेक अनुभव आहेत. त्यात मुंबई आणि औरंगाबादेतील विद्यार्थ्यांच्या विचारसरणीमध्ये मूलभूत फरक असल्याचे जाणवले. मुंबईतील विद्यार्थी करिअरचे बोलतो. औरंगाबादेतील विद्यार्थी पदवीबद्दल बोलत असतो. हा विचारातील फरक बदलावा लागेल, असे मत कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केले.

चार विद्यापीठांचे कुलगुरूपद भूषविले आहे. या सर्व ठिकाणी आपणाला काय वेगळेपण जाणवले?  मुंबई विद्यापीठाला दीर्घ परंपरा आहे. त्याठिकाणी शिक्षणाचा मोठा वारसा आहे. जागतिक दर्जाचे शहर आहे. कोल्हापूरला शाहू महाराजांच्या राजवटीचा परिणाम अद्यापही जाणवतो. त्याठिकाणी शिक्षणाची एक परंपरा निर्माण झालेली आहे. त्याठिकाणी विद्यापीठांमध्ये कोणत्याही राजकीय पक्ष, संघटनांचा हस्तक्षेप नसतो. पुण्यातही विद्वत्तेची मोठी परंपरा आहे. महात्मा फुले यांचा वारसा आहे. मात्र औरंगाबादेतील निजाम राजवटीचा प्रभाव अद्यापही जाणवतो. यातून बाहेर यावे लागेल. 

जॉब रेडी युवक कसे तयार होतील? काहीच करता येत नाही म्हणून दुसरे शिक्षण घेतल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्या शिक्षणाला कौशल्याची जोड द्यावी लागेल. त्यातून उद्योगासह सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असलेले जॉब रेडी विद्यार्थी तयार करावे लागतील. त्यासाठी कौशल्य, संशोधन, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या चतु:सूत्रीवर अधिक भर द्यावा लागेल.

बदलत्या तंत्रज्ञानात विद्यापीठांना सुद्धा बदलावे लागेल. हा बदल कसा असावा?  तंत्रज्ञानातील बदलाचा वेग प्रचंड आहे. हा बदल टिपताना मूलभूत ज्ञानाला सोबतच घेऊन जावे लागते. मूलभूत ज्ञान आणि बदलत्या तंत्रज्ञानाची सांगड घालतानाच  विवेक वापरावा लागेल. हा विवेक मिळण्याचे दोन ठिकाण आहेत. त्यातील पहिले ठिकाण हे घर असून, दुसरे ठिकाण ही शाळा आहे.

विद्यापीठाची प्रतिमा सुधारण्यासाठी काय करावे?  प्रत्येक व्यक्तीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे आपले विद्यापीठ वाटले पाहिजे. त्यासाठी विद्यापीठालाही पुढे यावे लागेल. जनतेशी संवाद साधत नाळ जोडावी लागेल. त्याशिवाय होणार नाही. हे सगळे करण्यासाठी प्रशासनातील सुसंवाद महत्त्वाचा आहे. हा संवाद साधताना विद्यार्थी, कर्मचारी, अधिकारी आणि प्राध्यापक यातील प्रत्येकाच्या मताला मान-सन्मान कसा मिळेल याकडे लक्ष द्यावे लागेल. त्याशिवाय आपलेपणाची भावना निर्माण होणार नाही.

समाज एकाएकी बदलत नाही. त्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. गुलामीच्या मानसिकतेमुळे विषमता निर्माण होते. पाश्चात्त्य शिक्षण पद्धतीने ही गुलामीची पद्धती निर्माण केली. त्यामुळे स्वत:च्या विचाराने काम करावे लागेल. शाळा आणि घर या दोन्ही ठिकाणीच विवेकपूर्ण संस्कार होऊ शकतात.त्यासाठी ही ठिकाणे सक्षम असतील तर विद्यार्थी चांगले घडतील. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद