शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

रेल्वेने जिवाची मुंबई एका दिवसात नाहीच; प्रवाशांची दैना थांबवा, 'जनशताब्दी' जुन्या वेळेत सोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 14:30 IST

Janshatabdi Express from Aurangabad: बदललेल्या वेळापत्रकाचा प्रवाशांना भुर्दंड, मुक्कामच करावा लागतो

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : जनशताब्दी एक्स्प्रेसने पूर्वी मुंबईला गेल्यानंतर त्याच दिवशी इतर रेल्वेनेऔरंगाबादला परत येणे शक्य होत असे. कारण ही रेल्वे सकाळी ६ वाजता सुटून १ वाजेपर्यंत मुंबईत पोहोचत असे; मात्र कोरोना विळख्यात अचानक जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदलण्यात आली. त्यामुळे ही रेल्वे आता मुंबईला पोहोचेपर्यंत सायंकाळ होते. त्यामुळे मुंबईला मुक्काम करण्याची वेळ प्रवाशांवर ओढवत आहे. एका दिवसात जिवाची मुंबई करताच येत नसल्याची परिस्थिती आहे. (Janshatabdi Express from Aurangabad )

जनशताब्दी एक्स्प्रेस पूर्वी सकाळी ६ वाजता औरंगाबादहून सुटत असे. दुपारी १ वाजेपर्यंत मुंबईत ही रेल्वे पोहोचत असे. त्यामुळे मुंबईतील कामे आटोपून नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेसने त्याच दिवशी परतीचा प्रवास प्रवाशांना करता येत असे; परंतु आता जनशताब्दी एक्स्प्रेसने मुंबईत गेल्यानंतर मुक्काम केल्याशिवाय पर्याय उरत नाही. कारण ही रेल्वे आता औरंगाबादहून ९.२० वाजता सुटते आणि दुपारी ४.२० वाजता मुंबईत पोहोचते. याचा व्यावसायिक, व्यापाऱ्यांना सर्वाधिक फटका बसत आहे.

९० टक्के प्रवासी बसतात औरंगाबादेतूूनजनशताब्दी एक्स्प्रेसने जालन्याहून जवळपास १० टक्के प्रवासी बसतात. या रेल्वेने प्रवास करणारे ९० टक्के प्रवासी औरंगाबादहून बसतात. त्यामुळे जालन्याहून येताना ही रेल्वे ९० टक्के रिकामी असते, ही रेल्वे जालन्याला नेऊन काय फायदा झाला, असे रेल्वे संघटनांचे म्हणणे आहे.

पूर्वीच्या वेळेनुसार सोडाजनशताब्दी एक्स्प्रेस ही सध्या दुपारी ४.२० वाजता मुंबईला पोहोचते. या वेळेत गेल्यानंतर कोणतेही काम करता येत नाही. मुक्कामच करावा लागतो. पूर्वी एका दिवसात मुंबईला ये-जा करता येत होते. त्यामुळे जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ पूर्वीसारखी केली पाहिजे.- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती

प्रवाशांची दैना थांबवाजनशताब्दी एक्स्प्रेस जालना येथे नेल्याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला होत आहे. मुंबईला वेळेत पोहोचण्यासाठी धडपड लोकांना करावी लागत आहे. वेळेचे नियोजन चुकत आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेतून जनशताब्दी एक्स्प्रेस जुन्या वेळापत्रकानुसार सोडून प्रवाशांची दैना थांबवावी.- विकीराजे पाटील, मराठवाडा रेल्वे विकास मंच

टॅग्स :railwayरेल्वेtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद