शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रेल्वेने जिवाची मुंबई एका दिवसात नाहीच; प्रवाशांची दैना थांबवा, 'जनशताब्दी' जुन्या वेळेत सोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 14:30 IST

Janshatabdi Express from Aurangabad: बदललेल्या वेळापत्रकाचा प्रवाशांना भुर्दंड, मुक्कामच करावा लागतो

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : जनशताब्दी एक्स्प्रेसने पूर्वी मुंबईला गेल्यानंतर त्याच दिवशी इतर रेल्वेनेऔरंगाबादला परत येणे शक्य होत असे. कारण ही रेल्वे सकाळी ६ वाजता सुटून १ वाजेपर्यंत मुंबईत पोहोचत असे; मात्र कोरोना विळख्यात अचानक जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदलण्यात आली. त्यामुळे ही रेल्वे आता मुंबईला पोहोचेपर्यंत सायंकाळ होते. त्यामुळे मुंबईला मुक्काम करण्याची वेळ प्रवाशांवर ओढवत आहे. एका दिवसात जिवाची मुंबई करताच येत नसल्याची परिस्थिती आहे. (Janshatabdi Express from Aurangabad )

जनशताब्दी एक्स्प्रेस पूर्वी सकाळी ६ वाजता औरंगाबादहून सुटत असे. दुपारी १ वाजेपर्यंत मुंबईत ही रेल्वे पोहोचत असे. त्यामुळे मुंबईतील कामे आटोपून नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेसने त्याच दिवशी परतीचा प्रवास प्रवाशांना करता येत असे; परंतु आता जनशताब्दी एक्स्प्रेसने मुंबईत गेल्यानंतर मुक्काम केल्याशिवाय पर्याय उरत नाही. कारण ही रेल्वे आता औरंगाबादहून ९.२० वाजता सुटते आणि दुपारी ४.२० वाजता मुंबईत पोहोचते. याचा व्यावसायिक, व्यापाऱ्यांना सर्वाधिक फटका बसत आहे.

९० टक्के प्रवासी बसतात औरंगाबादेतूूनजनशताब्दी एक्स्प्रेसने जालन्याहून जवळपास १० टक्के प्रवासी बसतात. या रेल्वेने प्रवास करणारे ९० टक्के प्रवासी औरंगाबादहून बसतात. त्यामुळे जालन्याहून येताना ही रेल्वे ९० टक्के रिकामी असते, ही रेल्वे जालन्याला नेऊन काय फायदा झाला, असे रेल्वे संघटनांचे म्हणणे आहे.

पूर्वीच्या वेळेनुसार सोडाजनशताब्दी एक्स्प्रेस ही सध्या दुपारी ४.२० वाजता मुंबईला पोहोचते. या वेळेत गेल्यानंतर कोणतेही काम करता येत नाही. मुक्कामच करावा लागतो. पूर्वी एका दिवसात मुंबईला ये-जा करता येत होते. त्यामुळे जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ पूर्वीसारखी केली पाहिजे.- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती

प्रवाशांची दैना थांबवाजनशताब्दी एक्स्प्रेस जालना येथे नेल्याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला होत आहे. मुंबईला वेळेत पोहोचण्यासाठी धडपड लोकांना करावी लागत आहे. वेळेचे नियोजन चुकत आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेतून जनशताब्दी एक्स्प्रेस जुन्या वेळापत्रकानुसार सोडून प्रवाशांची दैना थांबवावी.- विकीराजे पाटील, मराठवाडा रेल्वे विकास मंच

टॅग्स :railwayरेल्वेtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद