शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

सावळागोंधळ... वायपर बिघडल्यानं तब्बल चार तास रखडलं एअर इंडियाचं विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 18:45 IST

मुंबई विमानतळावरून औरंगाबादसाठी एअर इंडियाचे AI 442 हे विमान दुपारी ३.२५ मिनिटांनी उड्डाण करणार होते.

मुंबई : एअर इंडिया आणि भोंगळ कारभार हे जणू समानार्थी शब्दच झाले आहेत. त्यांच्या नियोजनशून्यतेची अनेक उदाहरणं आपण ऐकतो, वाचतो. याच ढिसाळ कारभाराचा अनुभव आज मुंबई-औरंगाबाद (AI 442) विमानातील प्रवाशांना आला. तांत्रिक बिघाडामुळे उ्डडाण अर्धा तास उशिराने होईल, अशी उद्घोषणा पायलटने केली. पण, पुढचे तब्बल दोन तास विमान जागच्या जागी उभं होतं आणि प्रवासीही कुठल्याही सूचनेविना ताटकळत बसले होते. आता दुसरे विमान ६.५० वाजता उड्डाण करणार असल्याने प्रवाशांना चार तास विमानतळावरच थांबावे लागले आहे.

मुंबई-औरंगाबाद विमानाची नियोजित वेळ दुपारी ३.२५ ची होती. त्यानुसार, ३.१० वाजता प्रवाशांना विमानात प्रवेश देण्यात आला. सगळे जण स्थिरस्थावर होतात न होतात, तोच विमानात तांत्रिक बिघाड असल्याची उद्घोषणा पायलटने केली. विमानाचे वायपर नादुरुस्त झाल्याचं त्यानं सांगितलं. त्यामुळे ४ वाजेपर्यंत विमान टेक-ऑफ करेल, अशी आशा प्रवाशांना होती. परंतु, सव्वा पाच वाजले तरी विमान जागेवरून हलले नाही. नेमकं काय झालंय, हे सांगण्याचं सौजन्यही कुणी दाखवलं नाही. उलट, ग्राउंड स्टाफ आणि फ्लाईट स्टाफ यांच्यातच खटके उडत होते. नियोजनाचा पूर्णपणे अभाव होता. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले. संतापलेल्या प्रवाशांनी याबाबत वैमानिक व केबिन क्रू ना जाब विचारल्यावर साडेपाच वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या विमानातून औरंगाबाद प्रवास करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. 

हे दुसरे पर्यायी विमान आता ६.५० वाजता उड्डाण करणार असल्याने प्रवाशांना एक तासाच्या प्रवासासाठी तब्बल चार तास विमानतळावरच ताटकळत बसावे लागणार आहे. एअर इंडियाच्या या कारभाराबाबत प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दुसऱ्या घटनेत, एअर इंडियाच्याच दुपारी २.४५ वाजता भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला देखील विलंब झाल्याचे समोर आले आहे. हे विमान भोपाळहून दिल्ली जाण्यासाठी हे विमान भोपाळमध्ये आलेले नसल्याने प्रवासी विमानतळावर रखडले आहेत. हे विमान तांत्रिक अडचणींमुळे रात्री १० वाजता येईल, अशी माहिती व्यवस्थापकाने सुरुवातीला दिली होती. मात्र नंतर हे उड्डाण रद्द केल्याची माहिती प्रवाशांना देण्यात अली. विमानातून प्रवास करणाऱ्या ८० पेक्षा जास्त प्रवाशांना इतर ठिकाणी जायचे असल्याने त्यांचा पुढील विमान प्रवास देखील बारगळला आहे. प्रशासनाने पर्यायी विमानाची सोय करावी, अशी मागणी प्रवाशांमधून करण्यात येत आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAurangabadऔरंगाबादMumbaiमुंबई