शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

सावळागोंधळ... वायपर बिघडल्यानं तब्बल चार तास रखडलं एअर इंडियाचं विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 18:45 IST

मुंबई विमानतळावरून औरंगाबादसाठी एअर इंडियाचे AI 442 हे विमान दुपारी ३.२५ मिनिटांनी उड्डाण करणार होते.

मुंबई : एअर इंडिया आणि भोंगळ कारभार हे जणू समानार्थी शब्दच झाले आहेत. त्यांच्या नियोजनशून्यतेची अनेक उदाहरणं आपण ऐकतो, वाचतो. याच ढिसाळ कारभाराचा अनुभव आज मुंबई-औरंगाबाद (AI 442) विमानातील प्रवाशांना आला. तांत्रिक बिघाडामुळे उ्डडाण अर्धा तास उशिराने होईल, अशी उद्घोषणा पायलटने केली. पण, पुढचे तब्बल दोन तास विमान जागच्या जागी उभं होतं आणि प्रवासीही कुठल्याही सूचनेविना ताटकळत बसले होते. आता दुसरे विमान ६.५० वाजता उड्डाण करणार असल्याने प्रवाशांना चार तास विमानतळावरच थांबावे लागले आहे.

मुंबई-औरंगाबाद विमानाची नियोजित वेळ दुपारी ३.२५ ची होती. त्यानुसार, ३.१० वाजता प्रवाशांना विमानात प्रवेश देण्यात आला. सगळे जण स्थिरस्थावर होतात न होतात, तोच विमानात तांत्रिक बिघाड असल्याची उद्घोषणा पायलटने केली. विमानाचे वायपर नादुरुस्त झाल्याचं त्यानं सांगितलं. त्यामुळे ४ वाजेपर्यंत विमान टेक-ऑफ करेल, अशी आशा प्रवाशांना होती. परंतु, सव्वा पाच वाजले तरी विमान जागेवरून हलले नाही. नेमकं काय झालंय, हे सांगण्याचं सौजन्यही कुणी दाखवलं नाही. उलट, ग्राउंड स्टाफ आणि फ्लाईट स्टाफ यांच्यातच खटके उडत होते. नियोजनाचा पूर्णपणे अभाव होता. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले. संतापलेल्या प्रवाशांनी याबाबत वैमानिक व केबिन क्रू ना जाब विचारल्यावर साडेपाच वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या विमानातून औरंगाबाद प्रवास करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. 

हे दुसरे पर्यायी विमान आता ६.५० वाजता उड्डाण करणार असल्याने प्रवाशांना एक तासाच्या प्रवासासाठी तब्बल चार तास विमानतळावरच ताटकळत बसावे लागणार आहे. एअर इंडियाच्या या कारभाराबाबत प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दुसऱ्या घटनेत, एअर इंडियाच्याच दुपारी २.४५ वाजता भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला देखील विलंब झाल्याचे समोर आले आहे. हे विमान भोपाळहून दिल्ली जाण्यासाठी हे विमान भोपाळमध्ये आलेले नसल्याने प्रवासी विमानतळावर रखडले आहेत. हे विमान तांत्रिक अडचणींमुळे रात्री १० वाजता येईल, अशी माहिती व्यवस्थापकाने सुरुवातीला दिली होती. मात्र नंतर हे उड्डाण रद्द केल्याची माहिती प्रवाशांना देण्यात अली. विमानातून प्रवास करणाऱ्या ८० पेक्षा जास्त प्रवाशांना इतर ठिकाणी जायचे असल्याने त्यांचा पुढील विमान प्रवास देखील बारगळला आहे. प्रशासनाने पर्यायी विमानाची सोय करावी, अशी मागणी प्रवाशांमधून करण्यात येत आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAurangabadऔरंगाबादMumbaiमुंबई