शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

महावितरणचा शाॅक, दोन वर्षांत कर्मचाऱ्यांसह ८१ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 15:15 IST

Electricity Shock Death महावितरणच्या यंत्रणेतील त्रुटींबरोबर मानवी चुकांमुळे विजेचा धक्का लागून जखमी होणे, मृत्यू पावण्याच्या घटना घडत आहेत.

ठळक मुद्दे ६७ प्राण्यांचाही मृत्यू, काहीजण जखमी, दुर्घटनांत वाढ४ लाख रुपयांची मिळते आर्थिक मदत

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : वीज उपकरणातील दोष, खराब वायर्स, अपघातासह वीज उपकरणे हाताळताना झालेला निष्काळजीपणा, अतिधाडस, सुरक्षा साधनांचा वापर करण्याकडे दुर्लक्ष, अशा अनेक कारणांनी विजेचा धक्का बसण्याच्या घटनांत जिल्ह्यात गेल्या २ वर्षांत तब्बल ८१ जणांना प्राण गमवावे लागले. यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. गेल्या १० महिन्यांत विजेचा धक्का लागण्याच्या घटनांत विशेषत: ग्रामीण भागात काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात मूक प्राण्यांनाही विजेचा धक्का लागण्याच्या घटना घडल्या. गेल्या दोन वर्षांत ६७ प्राण्यांचा मृत्यू झाला. महावितरणच्या यंत्रणेतील त्रुटींबरोबर मानवी चुकांमुळे विजेचा धक्का लागून जखमी होणे, मृत्यू पावण्याच्या घटना घडत आहेत. विद्युत वाहिनी तुटणे, स्पार्किंग होणे, विद्युत प्रवाह उतरलेल्या खांबाला, ताण वायरला स्पर्श होणे, अशा कारणांनी अपघाताच्या घटना घडतात. घरांमध्ये एखाद्या उपकरणाच्या माध्यमातून विजेचा धक्का लागण्याच्या घटना होतात. तर देखभाल-दुरुस्ती करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही विजेच्या अपघाताला तोंड द्यावे लागत आहे. यात कोणी जखमी होतो, तर कोणाचा बळी जातो. गेल्या १० महिन्यांत १० जण विजेचा धक्का लागून जखमी झाले.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही शाॅकमहावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही विजेचा धक्का लागण्याच्या घटना समोर आल्या आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात विजेच्या धक्क्यामुळे एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला; तर गेल्या १० महिन्यांत महावितरणच्या एका कर्मचाऱ्याचा आणि २ आऊटसोर्सच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला; तर दोन आऊटसोर्स कर्मचारी विजेचा धक्का लागून जखमी झाले.

विद्युत सुरक्षेसंदर्भात ग्राहकांचे नियमित प्रबोधन केले जाते. नागरिकांना दर्जेदार उपकरणे वापरण्याचे आवाहन केले जात आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही सुरक्षा साधने वापरून काम केले पाहिजे. त्यांना ते अनिवार्य आहे. महावितरणच्या परवानगीशिवाय विद्युत यंत्रणेजवळ कोणीही जाता कामा नये.- महावितरण

४ लाख रुपयांची मिळते आर्थिक मदत१) महावितरणच्या एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यासंदर्भात नियमानुसार देय, मदत, तातडीची मदत केली जाते. त्याबरोबर मृताच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर नाेकरी दिली जाते.२) वीज ग्राहक, नागरिकाचा महावितरणच्या चुकीमुळे मृत्यू झाला, तर ४ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.३) विजेच्या धक्क्याने मृत पावणाऱ्या प्राण्यांसाठीही आर्थिक मदत दिली जाते. पण ही मदत कितीजणांना मिळाली, ही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

वर्ष                     मनुष्यबळी                      मदत मिळाली         पशुहानी              मदत मिळाली२०१९-२० -             ३५                         माहिती उपलब्ध नाही         ३४            माहिती उपलब्ध नाही

२०२०-२१ (जानेवारीपर्यंत)-  ४६           माहिती उपलब्ध नाही         ३३            माहिती उपलब्ध नाही

टॅग्स :mahavitaranमहावितरणDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद