शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा शाॅक, दोन वर्षांत कर्मचाऱ्यांसह ८१ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 15:15 IST

Electricity Shock Death महावितरणच्या यंत्रणेतील त्रुटींबरोबर मानवी चुकांमुळे विजेचा धक्का लागून जखमी होणे, मृत्यू पावण्याच्या घटना घडत आहेत.

ठळक मुद्दे ६७ प्राण्यांचाही मृत्यू, काहीजण जखमी, दुर्घटनांत वाढ४ लाख रुपयांची मिळते आर्थिक मदत

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : वीज उपकरणातील दोष, खराब वायर्स, अपघातासह वीज उपकरणे हाताळताना झालेला निष्काळजीपणा, अतिधाडस, सुरक्षा साधनांचा वापर करण्याकडे दुर्लक्ष, अशा अनेक कारणांनी विजेचा धक्का बसण्याच्या घटनांत जिल्ह्यात गेल्या २ वर्षांत तब्बल ८१ जणांना प्राण गमवावे लागले. यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. गेल्या १० महिन्यांत विजेचा धक्का लागण्याच्या घटनांत विशेषत: ग्रामीण भागात काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात मूक प्राण्यांनाही विजेचा धक्का लागण्याच्या घटना घडल्या. गेल्या दोन वर्षांत ६७ प्राण्यांचा मृत्यू झाला. महावितरणच्या यंत्रणेतील त्रुटींबरोबर मानवी चुकांमुळे विजेचा धक्का लागून जखमी होणे, मृत्यू पावण्याच्या घटना घडत आहेत. विद्युत वाहिनी तुटणे, स्पार्किंग होणे, विद्युत प्रवाह उतरलेल्या खांबाला, ताण वायरला स्पर्श होणे, अशा कारणांनी अपघाताच्या घटना घडतात. घरांमध्ये एखाद्या उपकरणाच्या माध्यमातून विजेचा धक्का लागण्याच्या घटना होतात. तर देखभाल-दुरुस्ती करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही विजेच्या अपघाताला तोंड द्यावे लागत आहे. यात कोणी जखमी होतो, तर कोणाचा बळी जातो. गेल्या १० महिन्यांत १० जण विजेचा धक्का लागून जखमी झाले.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही शाॅकमहावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही विजेचा धक्का लागण्याच्या घटना समोर आल्या आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात विजेच्या धक्क्यामुळे एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला; तर गेल्या १० महिन्यांत महावितरणच्या एका कर्मचाऱ्याचा आणि २ आऊटसोर्सच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला; तर दोन आऊटसोर्स कर्मचारी विजेचा धक्का लागून जखमी झाले.

विद्युत सुरक्षेसंदर्भात ग्राहकांचे नियमित प्रबोधन केले जाते. नागरिकांना दर्जेदार उपकरणे वापरण्याचे आवाहन केले जात आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही सुरक्षा साधने वापरून काम केले पाहिजे. त्यांना ते अनिवार्य आहे. महावितरणच्या परवानगीशिवाय विद्युत यंत्रणेजवळ कोणीही जाता कामा नये.- महावितरण

४ लाख रुपयांची मिळते आर्थिक मदत१) महावितरणच्या एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यासंदर्भात नियमानुसार देय, मदत, तातडीची मदत केली जाते. त्याबरोबर मृताच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर नाेकरी दिली जाते.२) वीज ग्राहक, नागरिकाचा महावितरणच्या चुकीमुळे मृत्यू झाला, तर ४ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.३) विजेच्या धक्क्याने मृत पावणाऱ्या प्राण्यांसाठीही आर्थिक मदत दिली जाते. पण ही मदत कितीजणांना मिळाली, ही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

वर्ष                     मनुष्यबळी                      मदत मिळाली         पशुहानी              मदत मिळाली२०१९-२० -             ३५                         माहिती उपलब्ध नाही         ३४            माहिती उपलब्ध नाही

२०२०-२१ (जानेवारीपर्यंत)-  ४६           माहिती उपलब्ध नाही         ३३            माहिती उपलब्ध नाही

टॅग्स :mahavitaranमहावितरणDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद