शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

महावितरणचा शाॅक, दोन वर्षांत कर्मचाऱ्यांसह ८१ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 15:15 IST

Electricity Shock Death महावितरणच्या यंत्रणेतील त्रुटींबरोबर मानवी चुकांमुळे विजेचा धक्का लागून जखमी होणे, मृत्यू पावण्याच्या घटना घडत आहेत.

ठळक मुद्दे ६७ प्राण्यांचाही मृत्यू, काहीजण जखमी, दुर्घटनांत वाढ४ लाख रुपयांची मिळते आर्थिक मदत

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : वीज उपकरणातील दोष, खराब वायर्स, अपघातासह वीज उपकरणे हाताळताना झालेला निष्काळजीपणा, अतिधाडस, सुरक्षा साधनांचा वापर करण्याकडे दुर्लक्ष, अशा अनेक कारणांनी विजेचा धक्का बसण्याच्या घटनांत जिल्ह्यात गेल्या २ वर्षांत तब्बल ८१ जणांना प्राण गमवावे लागले. यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. गेल्या १० महिन्यांत विजेचा धक्का लागण्याच्या घटनांत विशेषत: ग्रामीण भागात काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात मूक प्राण्यांनाही विजेचा धक्का लागण्याच्या घटना घडल्या. गेल्या दोन वर्षांत ६७ प्राण्यांचा मृत्यू झाला. महावितरणच्या यंत्रणेतील त्रुटींबरोबर मानवी चुकांमुळे विजेचा धक्का लागून जखमी होणे, मृत्यू पावण्याच्या घटना घडत आहेत. विद्युत वाहिनी तुटणे, स्पार्किंग होणे, विद्युत प्रवाह उतरलेल्या खांबाला, ताण वायरला स्पर्श होणे, अशा कारणांनी अपघाताच्या घटना घडतात. घरांमध्ये एखाद्या उपकरणाच्या माध्यमातून विजेचा धक्का लागण्याच्या घटना होतात. तर देखभाल-दुरुस्ती करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही विजेच्या अपघाताला तोंड द्यावे लागत आहे. यात कोणी जखमी होतो, तर कोणाचा बळी जातो. गेल्या १० महिन्यांत १० जण विजेचा धक्का लागून जखमी झाले.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही शाॅकमहावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही विजेचा धक्का लागण्याच्या घटना समोर आल्या आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात विजेच्या धक्क्यामुळे एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला; तर गेल्या १० महिन्यांत महावितरणच्या एका कर्मचाऱ्याचा आणि २ आऊटसोर्सच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला; तर दोन आऊटसोर्स कर्मचारी विजेचा धक्का लागून जखमी झाले.

विद्युत सुरक्षेसंदर्भात ग्राहकांचे नियमित प्रबोधन केले जाते. नागरिकांना दर्जेदार उपकरणे वापरण्याचे आवाहन केले जात आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही सुरक्षा साधने वापरून काम केले पाहिजे. त्यांना ते अनिवार्य आहे. महावितरणच्या परवानगीशिवाय विद्युत यंत्रणेजवळ कोणीही जाता कामा नये.- महावितरण

४ लाख रुपयांची मिळते आर्थिक मदत१) महावितरणच्या एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यासंदर्भात नियमानुसार देय, मदत, तातडीची मदत केली जाते. त्याबरोबर मृताच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर नाेकरी दिली जाते.२) वीज ग्राहक, नागरिकाचा महावितरणच्या चुकीमुळे मृत्यू झाला, तर ४ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.३) विजेच्या धक्क्याने मृत पावणाऱ्या प्राण्यांसाठीही आर्थिक मदत दिली जाते. पण ही मदत कितीजणांना मिळाली, ही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

वर्ष                     मनुष्यबळी                      मदत मिळाली         पशुहानी              मदत मिळाली२०१९-२० -             ३५                         माहिती उपलब्ध नाही         ३४            माहिती उपलब्ध नाही

२०२०-२१ (जानेवारीपर्यंत)-  ४६           माहिती उपलब्ध नाही         ३३            माहिती उपलब्ध नाही

टॅग्स :mahavitaranमहावितरणDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद