शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा शाॅक, दोन वर्षांत कर्मचाऱ्यांसह ८१ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 15:15 IST

Electricity Shock Death महावितरणच्या यंत्रणेतील त्रुटींबरोबर मानवी चुकांमुळे विजेचा धक्का लागून जखमी होणे, मृत्यू पावण्याच्या घटना घडत आहेत.

ठळक मुद्दे ६७ प्राण्यांचाही मृत्यू, काहीजण जखमी, दुर्घटनांत वाढ४ लाख रुपयांची मिळते आर्थिक मदत

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : वीज उपकरणातील दोष, खराब वायर्स, अपघातासह वीज उपकरणे हाताळताना झालेला निष्काळजीपणा, अतिधाडस, सुरक्षा साधनांचा वापर करण्याकडे दुर्लक्ष, अशा अनेक कारणांनी विजेचा धक्का बसण्याच्या घटनांत जिल्ह्यात गेल्या २ वर्षांत तब्बल ८१ जणांना प्राण गमवावे लागले. यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. गेल्या १० महिन्यांत विजेचा धक्का लागण्याच्या घटनांत विशेषत: ग्रामीण भागात काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात मूक प्राण्यांनाही विजेचा धक्का लागण्याच्या घटना घडल्या. गेल्या दोन वर्षांत ६७ प्राण्यांचा मृत्यू झाला. महावितरणच्या यंत्रणेतील त्रुटींबरोबर मानवी चुकांमुळे विजेचा धक्का लागून जखमी होणे, मृत्यू पावण्याच्या घटना घडत आहेत. विद्युत वाहिनी तुटणे, स्पार्किंग होणे, विद्युत प्रवाह उतरलेल्या खांबाला, ताण वायरला स्पर्श होणे, अशा कारणांनी अपघाताच्या घटना घडतात. घरांमध्ये एखाद्या उपकरणाच्या माध्यमातून विजेचा धक्का लागण्याच्या घटना होतात. तर देखभाल-दुरुस्ती करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही विजेच्या अपघाताला तोंड द्यावे लागत आहे. यात कोणी जखमी होतो, तर कोणाचा बळी जातो. गेल्या १० महिन्यांत १० जण विजेचा धक्का लागून जखमी झाले.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही शाॅकमहावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही विजेचा धक्का लागण्याच्या घटना समोर आल्या आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात विजेच्या धक्क्यामुळे एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला; तर गेल्या १० महिन्यांत महावितरणच्या एका कर्मचाऱ्याचा आणि २ आऊटसोर्सच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला; तर दोन आऊटसोर्स कर्मचारी विजेचा धक्का लागून जखमी झाले.

विद्युत सुरक्षेसंदर्भात ग्राहकांचे नियमित प्रबोधन केले जाते. नागरिकांना दर्जेदार उपकरणे वापरण्याचे आवाहन केले जात आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही सुरक्षा साधने वापरून काम केले पाहिजे. त्यांना ते अनिवार्य आहे. महावितरणच्या परवानगीशिवाय विद्युत यंत्रणेजवळ कोणीही जाता कामा नये.- महावितरण

४ लाख रुपयांची मिळते आर्थिक मदत१) महावितरणच्या एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यासंदर्भात नियमानुसार देय, मदत, तातडीची मदत केली जाते. त्याबरोबर मृताच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर नाेकरी दिली जाते.२) वीज ग्राहक, नागरिकाचा महावितरणच्या चुकीमुळे मृत्यू झाला, तर ४ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.३) विजेच्या धक्क्याने मृत पावणाऱ्या प्राण्यांसाठीही आर्थिक मदत दिली जाते. पण ही मदत कितीजणांना मिळाली, ही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

वर्ष                     मनुष्यबळी                      मदत मिळाली         पशुहानी              मदत मिळाली२०१९-२० -             ३५                         माहिती उपलब्ध नाही         ३४            माहिती उपलब्ध नाही

२०२०-२१ (जानेवारीपर्यंत)-  ४६           माहिती उपलब्ध नाही         ३३            माहिती उपलब्ध नाही

टॅग्स :mahavitaranमहावितरणDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद