शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

महावितरणचे ‘कृत्रिम’ भारनियमन ! अगोदरच टंचाई त्यात पाणीपुरवठा सुरू होताच वीज होते गुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 11:42 IST

वसुलीतील आपले अपयश झाकण्यासाठी महावितरण सर्वच ग्राहकांना कसे काय वेठीस धरू शकते, असा संतप्त सवाल ग्राहकांकडून उपस्थित करण्यात येतोय.

औरंगाबाद : महावितरण कंपनीने मागील काही दिवसांपासून सकाळी ६ ते ७ या वेळेत भारनियमन सुरू केले आहे. अगोदरच पाणीटंचाईने औरंगाबादकर त्रस्त आहेत. त्यात पाणीपुरवठा सुरू झाला की, वीजपुरवठा बंद होतो. त्यामुळे महावितरणच्या ‘अघोषित’ भारनियमनाला नागरिक प्रचंड वैतागले आहेत.

रविवारी सकाळी शहरातील ११ फिडरवर महावितरणकडून सकाळी ६ ते ७ यावेळेत भारनियमन करण्यात आले. एका फिडरवर किमान १२०० ग्राहक असतात. १३ हजार २०० नागरिकांना भारनियमनाचा शॉक देण्यात आला. याचे कारणही अफलातून आहे. ज्या भागात वसुली कमी आहे, त्याच फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे. एका फिडरवरील किमान एक हजार ग्राहक प्रामाणिकपणे विजेचे बिल भरतात. २०० ग्राहक बिल भरतच नाहीत. त्यामुळे या २०० ग्राहकांची शिक्षा इतर एक हजार ग्राहकांना का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जे ग्राहक बिल भरत नाहीत, त्यांची थेट वीज कापण्यात यावी. वसुलीतील आपले अपयश झाकण्यासाठी महावितरण सर्वच ग्राहकांना कसे काय वेठीस धरू शकते, असा संतप्त सवाल ग्राहकांकडून उपस्थित करण्यात येतोय.

पाणीपुरवठा सुरू होताच महावितरणकडून सकाळी भारनियमन करण्यात येते. नागरिकांना मोटारीशिवाय एक थेंबही पाणी मिळत नाही. महापालिका वीजपुरवठा पूर्ववत झाल्यावर परत पाणीपुरवठाही करीत नाही. एकदा पाणी मिळाले नाही तर किमान ७ दिवस वाट पाहावी लागते. रविवारी भडकलगेट, टाऊन हॉल भागात पाणीपुरवठा सुरू होताच भारनियमन करण्यात आले.

आपले अपयश झाकण्यासाठी...पवित्र रमजान महिना सुरू झाला. लवकरच आंबेडकर जयंती येत आहे. महावितरण कंपनीने सुरू केलेले भारनियमन बंद करावे. अन्यथा लोकशाही मार्गाने महावितरणला धडा शिकवण्यात येईल.- खाजा शरफोद्दीन, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाmahavitaranमहावितरण