शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

महावितरणचे ‘कृत्रिम’ भारनियमन ! अगोदरच टंचाई त्यात पाणीपुरवठा सुरू होताच वीज होते गुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 11:42 IST

वसुलीतील आपले अपयश झाकण्यासाठी महावितरण सर्वच ग्राहकांना कसे काय वेठीस धरू शकते, असा संतप्त सवाल ग्राहकांकडून उपस्थित करण्यात येतोय.

औरंगाबाद : महावितरण कंपनीने मागील काही दिवसांपासून सकाळी ६ ते ७ या वेळेत भारनियमन सुरू केले आहे. अगोदरच पाणीटंचाईने औरंगाबादकर त्रस्त आहेत. त्यात पाणीपुरवठा सुरू झाला की, वीजपुरवठा बंद होतो. त्यामुळे महावितरणच्या ‘अघोषित’ भारनियमनाला नागरिक प्रचंड वैतागले आहेत.

रविवारी सकाळी शहरातील ११ फिडरवर महावितरणकडून सकाळी ६ ते ७ यावेळेत भारनियमन करण्यात आले. एका फिडरवर किमान १२०० ग्राहक असतात. १३ हजार २०० नागरिकांना भारनियमनाचा शॉक देण्यात आला. याचे कारणही अफलातून आहे. ज्या भागात वसुली कमी आहे, त्याच फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे. एका फिडरवरील किमान एक हजार ग्राहक प्रामाणिकपणे विजेचे बिल भरतात. २०० ग्राहक बिल भरतच नाहीत. त्यामुळे या २०० ग्राहकांची शिक्षा इतर एक हजार ग्राहकांना का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जे ग्राहक बिल भरत नाहीत, त्यांची थेट वीज कापण्यात यावी. वसुलीतील आपले अपयश झाकण्यासाठी महावितरण सर्वच ग्राहकांना कसे काय वेठीस धरू शकते, असा संतप्त सवाल ग्राहकांकडून उपस्थित करण्यात येतोय.

पाणीपुरवठा सुरू होताच महावितरणकडून सकाळी भारनियमन करण्यात येते. नागरिकांना मोटारीशिवाय एक थेंबही पाणी मिळत नाही. महापालिका वीजपुरवठा पूर्ववत झाल्यावर परत पाणीपुरवठाही करीत नाही. एकदा पाणी मिळाले नाही तर किमान ७ दिवस वाट पाहावी लागते. रविवारी भडकलगेट, टाऊन हॉल भागात पाणीपुरवठा सुरू होताच भारनियमन करण्यात आले.

आपले अपयश झाकण्यासाठी...पवित्र रमजान महिना सुरू झाला. लवकरच आंबेडकर जयंती येत आहे. महावितरण कंपनीने सुरू केलेले भारनियमन बंद करावे. अन्यथा लोकशाही मार्गाने महावितरणला धडा शिकवण्यात येईल.- खाजा शरफोद्दीन, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाmahavitaranमहावितरण