शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

महावितरणचे ‘कृत्रिम’ भारनियमन ! अगोदरच टंचाई त्यात पाणीपुरवठा सुरू होताच वीज होते गुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 11:42 IST

वसुलीतील आपले अपयश झाकण्यासाठी महावितरण सर्वच ग्राहकांना कसे काय वेठीस धरू शकते, असा संतप्त सवाल ग्राहकांकडून उपस्थित करण्यात येतोय.

औरंगाबाद : महावितरण कंपनीने मागील काही दिवसांपासून सकाळी ६ ते ७ या वेळेत भारनियमन सुरू केले आहे. अगोदरच पाणीटंचाईने औरंगाबादकर त्रस्त आहेत. त्यात पाणीपुरवठा सुरू झाला की, वीजपुरवठा बंद होतो. त्यामुळे महावितरणच्या ‘अघोषित’ भारनियमनाला नागरिक प्रचंड वैतागले आहेत.

रविवारी सकाळी शहरातील ११ फिडरवर महावितरणकडून सकाळी ६ ते ७ यावेळेत भारनियमन करण्यात आले. एका फिडरवर किमान १२०० ग्राहक असतात. १३ हजार २०० नागरिकांना भारनियमनाचा शॉक देण्यात आला. याचे कारणही अफलातून आहे. ज्या भागात वसुली कमी आहे, त्याच फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे. एका फिडरवरील किमान एक हजार ग्राहक प्रामाणिकपणे विजेचे बिल भरतात. २०० ग्राहक बिल भरतच नाहीत. त्यामुळे या २०० ग्राहकांची शिक्षा इतर एक हजार ग्राहकांना का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जे ग्राहक बिल भरत नाहीत, त्यांची थेट वीज कापण्यात यावी. वसुलीतील आपले अपयश झाकण्यासाठी महावितरण सर्वच ग्राहकांना कसे काय वेठीस धरू शकते, असा संतप्त सवाल ग्राहकांकडून उपस्थित करण्यात येतोय.

पाणीपुरवठा सुरू होताच महावितरणकडून सकाळी भारनियमन करण्यात येते. नागरिकांना मोटारीशिवाय एक थेंबही पाणी मिळत नाही. महापालिका वीजपुरवठा पूर्ववत झाल्यावर परत पाणीपुरवठाही करीत नाही. एकदा पाणी मिळाले नाही तर किमान ७ दिवस वाट पाहावी लागते. रविवारी भडकलगेट, टाऊन हॉल भागात पाणीपुरवठा सुरू होताच भारनियमन करण्यात आले.

आपले अपयश झाकण्यासाठी...पवित्र रमजान महिना सुरू झाला. लवकरच आंबेडकर जयंती येत आहे. महावितरण कंपनीने सुरू केलेले भारनियमन बंद करावे. अन्यथा लोकशाही मार्गाने महावितरणला धडा शिकवण्यात येईल.- खाजा शरफोद्दीन, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाmahavitaranमहावितरण