शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे ‘कृत्रिम’ भारनियमन ! अगोदरच टंचाई त्यात पाणीपुरवठा सुरू होताच वीज होते गुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 11:42 IST

वसुलीतील आपले अपयश झाकण्यासाठी महावितरण सर्वच ग्राहकांना कसे काय वेठीस धरू शकते, असा संतप्त सवाल ग्राहकांकडून उपस्थित करण्यात येतोय.

औरंगाबाद : महावितरण कंपनीने मागील काही दिवसांपासून सकाळी ६ ते ७ या वेळेत भारनियमन सुरू केले आहे. अगोदरच पाणीटंचाईने औरंगाबादकर त्रस्त आहेत. त्यात पाणीपुरवठा सुरू झाला की, वीजपुरवठा बंद होतो. त्यामुळे महावितरणच्या ‘अघोषित’ भारनियमनाला नागरिक प्रचंड वैतागले आहेत.

रविवारी सकाळी शहरातील ११ फिडरवर महावितरणकडून सकाळी ६ ते ७ यावेळेत भारनियमन करण्यात आले. एका फिडरवर किमान १२०० ग्राहक असतात. १३ हजार २०० नागरिकांना भारनियमनाचा शॉक देण्यात आला. याचे कारणही अफलातून आहे. ज्या भागात वसुली कमी आहे, त्याच फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे. एका फिडरवरील किमान एक हजार ग्राहक प्रामाणिकपणे विजेचे बिल भरतात. २०० ग्राहक बिल भरतच नाहीत. त्यामुळे या २०० ग्राहकांची शिक्षा इतर एक हजार ग्राहकांना का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जे ग्राहक बिल भरत नाहीत, त्यांची थेट वीज कापण्यात यावी. वसुलीतील आपले अपयश झाकण्यासाठी महावितरण सर्वच ग्राहकांना कसे काय वेठीस धरू शकते, असा संतप्त सवाल ग्राहकांकडून उपस्थित करण्यात येतोय.

पाणीपुरवठा सुरू होताच महावितरणकडून सकाळी भारनियमन करण्यात येते. नागरिकांना मोटारीशिवाय एक थेंबही पाणी मिळत नाही. महापालिका वीजपुरवठा पूर्ववत झाल्यावर परत पाणीपुरवठाही करीत नाही. एकदा पाणी मिळाले नाही तर किमान ७ दिवस वाट पाहावी लागते. रविवारी भडकलगेट, टाऊन हॉल भागात पाणीपुरवठा सुरू होताच भारनियमन करण्यात आले.

आपले अपयश झाकण्यासाठी...पवित्र रमजान महिना सुरू झाला. लवकरच आंबेडकर जयंती येत आहे. महावितरण कंपनीने सुरू केलेले भारनियमन बंद करावे. अन्यथा लोकशाही मार्गाने महावितरणला धडा शिकवण्यात येईल.- खाजा शरफोद्दीन, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाmahavitaranमहावितरण