शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

खासदार दत्तक आडगावला पाच वर्षांपासून विकासाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:07 AM

विजय थोरात नाचणवेल : साधारण सहा वर्षांपूर्वी तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांनी कन्नड तालुक्यातील आडगाव (पि.) गावाला दत्तक घेतले. ...

विजय थोरात

नाचणवेल : साधारण सहा वर्षांपूर्वी तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांनी कन्नड तालुक्यातील आडगाव (पि.) गावाला दत्तक घेतले. मात्र, सहा वर्षांपासून या गावाला विकासाची प्रतीक्षा आहे. गावात जी काही कामे झाली तीदेखील अर्धवटच आहेत. रस्ता, चोकअप झालेली ड्रेनेज लाइन, अशुद्ध पिण्याचे पाणी या समस्यांनी आडगाववासीय त्रस्त झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार दत्तक ग्राम योजना जाहीर केली. त्याअंतर्गत प्रत्येक खासदारांनी आपल्या मतदारसंघातील दोन गावे दत्तक घेऊन त्याचा विकास करावा, असा उद्देश होता. तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांना अनेक कार्यकर्त्यांनी आपले गाव या योजनेसाठी निवडावे. अशी गळ घातली. त्यामुळे खासदार दत्तक गाव निवडण्यासाठीच कित्येक महिन्यांचा कालावधी लागला. चर्चेची गुऱ्हाळे, खलबते व रुसवे-फुगवे पार पडल्यानंतर अखेर सैनिकांचे गाव म्हणून कन्नड तालुक्यातील आडगाव (पि.) हे गाव दत्तक घेतले गेले.

विकासाबरोबरच रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन अच्छे दिन येतील, असे स्वप्न उराशी बाळगलेल्या आडगाववासीयांच्या पदरी मात्र सहा वर्षांनंतरही निराशाच पडलेली आहे. गावाचा आदर्श गाव योजनेत समावेश झाल्यानंतर सरकारकडून गावविकासासाठी मोठ्या योजनांची घोषणा केली. खासदार, आमदार व जिल्हाधिकारी यांचे दौरेही झाले. मोठमोठी आश्वासने दिली गेली. मात्र एकही आदर्श योजना या गावात राबविली गेली नाही.

------------

तुंबलेल्या गटारी, ब्लॉक झालेली ड्रेनेज लाइन

आदर्श ग्राम योजनेत आडगावचा समावेश झाला आहे. काही ठिकाणी अजूनही विकास पोहोचलाच नाही. तत्कालीन अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी गावातील काही कामे केली. मात्र, त्या निकृष्ट कामाची झळ आता गावकऱ्यांना बसू लागली आहे. एव्हाना त्याचा त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे. हगणदारीमुक्त गाव करण्यासाठी टाकण्यात आलेल्या ड्रेनेज लाइनमधील पाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने ती जागोजागी ब्लॉक होऊन फुटू लागली आहे. ड़्रेनेज लाइनचे घाण पाणी पेयजलवाहिनीत मिसळू लागले आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

नागरिक म्हणतात !

शौचालयाच्या पाण्याचा निचरा करणारी ड्रेनेज लाइन जागोजागी ब्लॉक झाली आहे. आमच्या घरासमोरचे चेंबर वारंवार उघडावे लागते. ड्रेनेज लाइन जवळूनच पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन गेली असून, दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत आहे. आमचे आरोग्य धोक्यात आले आहे. - मीनाबाई तायडे, ग्रामस्थ

चोकअप झालेल्या ड्रेनेज लाइनच्या दुर्गंधीमुळे गावकरी त्रस्त आहेत. मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे, तर गावातून तशा तक्रारीदेखील येऊ लागल्या आहेत. वेळोवेळी तक्रारी करूनही दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नाही. गाव आदर्श नाही तरी कमीतकमी पूर्वीप्रमाणे स्वच्छ व नीटनेटके व्हायला हवे. - अशोक भोसले, ग्रामस्थ

--------------

फोटो :